शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

आजचा अग्रलेख: केजरीवाल यांना झालेली अटक आणि आंतरराष्ट्रीय चोंबडेपणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 09:28 IST

Today's Editorial: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक, तसेच आयकर खात्याने काँग्रेस पक्षाला बजावलेल्या नोटिसीसंदर्भात जर्मनी, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रे म्हणजेच यूएनने केलेल्या टिपण्णीवरून सध्या बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याने तातडीने दखल घेत त्यांना फटकारले आहे आणि ते योग्यच आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक, तसेच आयकर खात्याने काँग्रेस पक्षाला बजावलेल्या नोटिसीसंदर्भात जर्मनी, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रे म्हणजेच यूएनने केलेल्या टिपण्णीवरून सध्या बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार खात्याने तातडीने दखल घेत त्यांना फटकारले आहे आणि ते योग्यच आहे. मुळात भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये विदेशी शक्तींनी नाक खुपसण्याचे काही कारणच नाही. भारत हा काही हुकूमशाही देश नाही. या देशात तब्बल पाऊण शतकापासून लोकशाही व्यवस्था अखंडित कार्यरत आहे. ७५ वर्षांच्या कालावधीत जनतेने अनेकदा सत्तांतरे घडवून प्रगल्भतेचा परिचय दिला आहे. शिवाय देशात निष्पक्ष न्याय प्रणाली आहे. स्व. इंदिरा गांधी यांच्यासारख्या अत्यंत शक्तिशाली पंतप्रधान सत्तेत असताना, त्यांचा निवडणुकीतील विजय रद्द करण्याचा निकाल देण्याएवढी, न्यायप्रणाली स्वतंत्र आणि प्रभावी आहे. त्या निकालानंतरची आणीबाणी, पुढील सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव आणि त्यानंतरच्या मध्यावधी निवडणुकीतील मोठा विजय, हा इतिहास सर्वज्ञात आहे.

भारतात लोकशाहीची पाळेमुळे किती घट्ट रुजली आहेत आणि न्याय प्रणाली कशी निस्पृह बाण्याची आहे, याचे प्रत्यंतर त्या एकाच दशकात संपूर्ण जगाला आले. भारताच्या आगेमागे स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक देशांमध्ये लोकशाहीची एकापेक्षा जास्त वेळा हत्या झाल्याचे जगाने बघितले आहे. स्वतःला लोकशाहीचे पाईक समजणाऱ्या अमेरिका आणि युरोपातील देशांना भारताच्या अंतर्गत भानगडींमध्ये नाक खुपसून उपदेशाचे डोस पाजण्याची लहर अधूनमधून येतच असते. जर्मनी, अमेरिका आणि यूएनने केलेल्या ताज्या टिपण्णी हे त्याचेच उदाहरण! मुळात खरेच लोकशाहीची चाड असल्याने ते असे करीत असतात, की भारतात लोकशाही रुजल्याचा त्यांना पोटशूळ आहे, हाच प्रश्न पडतो. केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ते काही अटक झालेले पहिलेच मुख्यमंत्री नाहीत. यापूर्वीही लालूप्रसाद यादव, हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती. त्यांनी केजरीवाल यांच्याप्रमाणे कोठडीतून सरकार चालविण्याचा अट्टाहास न करता, अटकेपूर्वीच राजीनामा दिला होता, एवढाच काय तो फरक! मुरासोली मारन यांनाही ते केंद्रीय मंत्री पदावर असताना अटक झाली होती. माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्र्यांनाही अटक झाली आहे. अशा एकाही प्रसंगी जर्मनी, अमेरिका किंवा यूएनला भारतातील घडामोडींवर नजर ठेवण्याची गरज वाटली नव्हती. पण, यावेळी मात्र वाटली! त्यासाठी कारणीभूत ठरला तो मुश्फिकुल फजल अन्सारी हा बांगलादेशी पत्रकार अन राजकीय कार्यकर्ता! हा गृहस्थ बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचा सदस्य आणि वॉशिंग्टनमध्ये ‘एसए पर्स्पेक्टिव्हज’ व ‘जस्ट न्यूज बीडी’साठी व्हाइट हाऊस आणि यूएन बातमीदार म्हणून काम करतो.

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी भारताची किती घोर विरोधक आहे, हे वेगळे सांगायला नको! बांगलादेश सरकारने त्याला फरार घोषित केले आहे आणि त्याच्या ‘पोर्टल’वर बंदी आणली आहे. अमेरिका सरकारच्या प्रवक्त्यांना भारतातील मुद्यांमध्ये तोंड खुपसण्यासाठी उद्युक्त करण्याचा त्याचा इतिहास आहे. यावेळीही त्याच्या प्रश्नांना उत्तरे देतानाच, अमेरिका सरकार आणि यूएन प्रवक्त्यांनी ते भारतातील परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची विधाने केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, प्रत्येक बातमीदाराच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे बंधनकारक नसते. तो अधिकार वापरून अमेरिका सरकार आणि यूएनचे प्रवक्ते अन्सारीचे प्रश्न नक्कीच टाळू शकले असते. उद्या एखाद्या बातमीदाराने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील सुमारे  ९० खटले, तसेच त्यांची आर्थिक कोंडी करण्याच्या प्रयत्नांसंदर्भात, भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याला प्रश्न केला आणि त्यावर आम्ही अमेरिकेतील लोकशाहीच्या गळचेपीसंदर्भात लक्ष ठेवून आहोत, असे विधान प्रवक्त्याने केले, तर ते अमेरिकेला रूचेल का? राहता राहिला प्रश्न यूएनचा, तर जिथे लक्ष घालण्याची खरी गरज आहे, तिथे तर ही संघटना काहीच करू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. कोणतीही व्यवस्था परिपूर्ण कधीच नसते. ती राबविणाऱ्या लोकांनुसार व्यवस्थेत चढउतार येत असतात. भारतात तसे चढउतार आल्यास, आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यासाठी भारतीय सक्षम आहेत. इतिहासात तसे दाखले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय चोंबडेपणा करण्यापेक्षा, स्वतःच्या बुडाखाली काय जळत आहे, याची चिंता जर्मनी, अमेरिका आणि यूएनने केलेली बरी!

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालArrestअटकIndiaभारतdemocracyलोकशाहीInternationalआंतरराष्ट्रीय