शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: आरोग्यसेवा 'व्हेंटिलेटरवर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:50 IST

Healthcare News: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच ढासळलेली असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) तब्बल ३८ हजार कंत्राटी कर्मचान्यांनी पुकारलेला बेमुदत संप हा जनतेच्या आयुष्याशी थेट खेळ आहे. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्सेस उपलब्ध नाहीत, तंत्रज्ञ व पॅरामेडिकल कर्मचारी संपावर गेले आहेत. परिणामी, राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालये अक्षरशः ठप्प पडली आहेत.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच ढासळलेली असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) तब्बल ३८ हजार कंत्राटी कर्मचान्यांनी पुकारलेला बेमुदत संप हा जनतेच्या आयुष्याशी थेट खेळ आहे. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्सेस उपलब्ध नाहीत, तंत्रज्ञ व पॅरामेडिकल कर्मचारी संपावर गेले आहेत. परिणामी, राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालये अक्षरशः ठप्प पडली आहेत. ही परिस्थिती कोणत्याही जबाबदार सरकारला शोभा देणारी नाही. आरोग्यसेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

वास्तविक, मार्च महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाने दहा वर्षांहून अधिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय काढला होता. जवळपास १४ हजार कर्मचारी यासाठी पात्र ठरले; पण जीआर काढल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य। राज्यातील चार विभागांमध्ये मिळून ४९,५०० पदे मंजूर असताना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी न देणे म्हणजे शासनाचे वेळकाढू धोरण होय. यापूर्वी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, तेव्हा आश्वासने मिळाली; पण त्यानंतर नेहमीप्रमाणे धूळफेकच झाली. त्यामुळेच संपाचे हत्यार उचलले गेले; पण हा संप केवळ सरकारविरोधी आंदोलन नाही; तो थेट जनतेच्या जिवावर उठलेला आहे. गर्भवती महिलांची प्रसूती थांबली आहे, नवजात बालकांची काळजी घेणारे कर्मचारी नाहीत, आपत्कालीन उपचार अडकले आहेत. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिक बिकट आहे. जेथे कंत्राटी परिचारिका गर्भवतींची जबाबदारी सांभाळतात, त्या संपावर गेल्यावर महिलांना खासगी रुग्णालयांचा दरवाजा दाखवला जात आहे. गरीब कुटुंबांना महागडे बिल भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. श्रीमंत वर्गाकडे पर्याय आहेत; पण शेतकरी, मजूर, गरीब कुटुंब या संपाचे थेट बळी ठरत आहेत.

आरोग्यसेवा ही विलासिता नाही, ती मानवी हक्क आहे. आज जे रुग्ण तत्काळ उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचे जीव धोक्यात आले आहेत. सरकारचे वारंवार होणारे दुर्लक्ष, आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्ष कृती शून्या यामुळेच हा चक्रव्यूह उभा राहिला आहे. प्रत्येक संपानंतर त्याचे राजकीय निराकरण केले जाते आणि पुन्हा काही महिन्यांनी तोच गोंधळ सुरू होतो. हे चित्र बदलले नाही, तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कायमची खिळखिळी होईल आणि खासगी रुग्णालयांच्या मक्तेदारीत सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी वाढत जाईल. आज राज्याला तातडीने दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित ठोस निर्णय घेणे. कामगारांच्या स्थैर्याशिवाय कोणतीही आरोग्य योजना यशस्वी होऊ शकत नाही. दुसरी म्हणजे, संपासारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब होणार नाही, यासाठी संघटनांनाही जबाबदार ठरवावे लागेल. मागण्या मांडण्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळणे हा कुठलाही संवेदनशील किंवा लोकशाहीचा मार्ग नव्हे. आरोग्यसेवा ही संप, आंदोलने आणि राजकारणाच्या पलीकडची बाब आहे. ती थेट जनतेच्या जिवाशी निगडित आहे. म्हणूनच शासनाने केवळ तात्पुरते उपाय न करता दीर्घकालीन आराखडा तयार करावा. अन्यथा प्रत्येक संप हा धोरणकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी केलेला अन्याय ठरेल. सरकारी रुग्णालयातील गलथानपणा अनेकदा रुग्णांच्या जिवावर उठतो. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले दहा नवजात जीव होरपळून गेल्याची एका जिल्हा रुग्णालयातील घटना ताजी आहे. सरकारी रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर्स खासगी रुग्णालयांकडे रुग्ण कसे रेफर करतात, याच्याही बातम्या येत असतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्यांची वानवा नाही.

कोरोनाकाळात याच सरकारी आरोग्य यंत्रणेने हजारो-लाखो जिवांचे प्राण वाचिवले आहेत; परंतु कंत्राटीकरणामुळे ही आरोग्यसेवा खिळखिळी झाली आहे. प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे सरकारच्या प्राधान्यक्रमाचे विषय ठरायला हवेत. ग्रामीण भागातील शाळा आणि रुग्णालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच्या डागडुजीसाठी निधी मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचा विकास निधी कशावर आणि किती खर्च होतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दरवर्षी वैद्यकीय शिक्षणावर करोडो रुपये खर्च होतात. त्या तुलनेत प्रत्यक्ष आरोग्यसेवेवर मात्र 'जीडीपी'च्या केवळ ४.४ टक्केच खर्च होतो. हे चित्र बदलले तरच पुन्हा अशा कुठल्या संपाची गरज पडणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर