शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

आजचा अग्रलेख: आरोग्यसेवा 'व्हेंटिलेटरवर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:50 IST

Healthcare News: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच ढासळलेली असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) तब्बल ३८ हजार कंत्राटी कर्मचान्यांनी पुकारलेला बेमुदत संप हा जनतेच्या आयुष्याशी थेट खेळ आहे. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्सेस उपलब्ध नाहीत, तंत्रज्ञ व पॅरामेडिकल कर्मचारी संपावर गेले आहेत. परिणामी, राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालये अक्षरशः ठप्प पडली आहेत.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच ढासळलेली असताना राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) तब्बल ३८ हजार कंत्राटी कर्मचान्यांनी पुकारलेला बेमुदत संप हा जनतेच्या आयुष्याशी थेट खेळ आहे. रुग्णालयात डॉक्टर नाहीत, नर्सेस उपलब्ध नाहीत, तंत्रज्ञ व पॅरामेडिकल कर्मचारी संपावर गेले आहेत. परिणामी, राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालये अक्षरशः ठप्प पडली आहेत. ही परिस्थिती कोणत्याही जबाबदार सरकारला शोभा देणारी नाही. आरोग्यसेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

वास्तविक, मार्च महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाने दहा वर्षांहून अधिक सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय काढला होता. जवळपास १४ हजार कर्मचारी यासाठी पात्र ठरले; पण जीआर काढल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य। राज्यातील चार विभागांमध्ये मिळून ४९,५०० पदे मंजूर असताना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी न देणे म्हणजे शासनाचे वेळकाढू धोरण होय. यापूर्वी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, तेव्हा आश्वासने मिळाली; पण त्यानंतर नेहमीप्रमाणे धूळफेकच झाली. त्यामुळेच संपाचे हत्यार उचलले गेले; पण हा संप केवळ सरकारविरोधी आंदोलन नाही; तो थेट जनतेच्या जिवावर उठलेला आहे. गर्भवती महिलांची प्रसूती थांबली आहे, नवजात बालकांची काळजी घेणारे कर्मचारी नाहीत, आपत्कालीन उपचार अडकले आहेत. ग्रामीण भागात तर परिस्थिती अधिक बिकट आहे. जेथे कंत्राटी परिचारिका गर्भवतींची जबाबदारी सांभाळतात, त्या संपावर गेल्यावर महिलांना खासगी रुग्णालयांचा दरवाजा दाखवला जात आहे. गरीब कुटुंबांना महागडे बिल भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते. श्रीमंत वर्गाकडे पर्याय आहेत; पण शेतकरी, मजूर, गरीब कुटुंब या संपाचे थेट बळी ठरत आहेत.

आरोग्यसेवा ही विलासिता नाही, ती मानवी हक्क आहे. आज जे रुग्ण तत्काळ उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचे जीव धोक्यात आले आहेत. सरकारचे वारंवार होणारे दुर्लक्ष, आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्ष कृती शून्या यामुळेच हा चक्रव्यूह उभा राहिला आहे. प्रत्येक संपानंतर त्याचे राजकीय निराकरण केले जाते आणि पुन्हा काही महिन्यांनी तोच गोंधळ सुरू होतो. हे चित्र बदलले नाही, तर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कायमची खिळखिळी होईल आणि खासगी रुग्णालयांच्या मक्तेदारीत सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी वाढत जाईल. आज राज्याला तातडीने दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्वरित ठोस निर्णय घेणे. कामगारांच्या स्थैर्याशिवाय कोणतीही आरोग्य योजना यशस्वी होऊ शकत नाही. दुसरी म्हणजे, संपासारख्या टोकाच्या मार्गाचा अवलंब होणार नाही, यासाठी संघटनांनाही जबाबदार ठरवावे लागेल. मागण्या मांडण्यासाठी रुग्णांच्या जिवाशी खेळणे हा कुठलाही संवेदनशील किंवा लोकशाहीचा मार्ग नव्हे. आरोग्यसेवा ही संप, आंदोलने आणि राजकारणाच्या पलीकडची बाब आहे. ती थेट जनतेच्या जिवाशी निगडित आहे. म्हणूनच शासनाने केवळ तात्पुरते उपाय न करता दीर्घकालीन आराखडा तयार करावा. अन्यथा प्रत्येक संप हा धोरणकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचा पुरावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी केलेला अन्याय ठरेल. सरकारी रुग्णालयातील गलथानपणा अनेकदा रुग्णांच्या जिवावर उठतो. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे इन्क्युबेटरमध्ये ठेवलेले दहा नवजात जीव होरपळून गेल्याची एका जिल्हा रुग्णालयातील घटना ताजी आहे. सरकारी रुग्णालयात काम करणारे काही डॉक्टर्स खासगी रुग्णालयांकडे रुग्ण कसे रेफर करतात, याच्याही बातम्या येत असतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्यांची वानवा नाही.

कोरोनाकाळात याच सरकारी आरोग्य यंत्रणेने हजारो-लाखो जिवांचे प्राण वाचिवले आहेत; परंतु कंत्राटीकरणामुळे ही आरोग्यसेवा खिळखिळी झाली आहे. प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे सरकारच्या प्राधान्यक्रमाचे विषय ठरायला हवेत. ग्रामीण भागातील शाळा आणि रुग्णालयांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. त्याच्या डागडुजीसाठी निधी मिळत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींचा विकास निधी कशावर आणि किती खर्च होतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दरवर्षी वैद्यकीय शिक्षणावर करोडो रुपये खर्च होतात. त्या तुलनेत प्रत्यक्ष आरोग्यसेवेवर मात्र 'जीडीपी'च्या केवळ ४.४ टक्केच खर्च होतो. हे चित्र बदलले तरच पुन्हा अशा कुठल्या संपाची गरज पडणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर