शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
4
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
5
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
6
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
7
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
8
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
9
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
10
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
11
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
12
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
13
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
15
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
16
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
17
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
18
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
19
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
20
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध

आजचा अग्रलेख: भुजबळ खरे ते बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:12 IST

Chhagan Bhujbal News: अजित पवारांसोबत जाऊन भुजबळांनी मंत्रिपद मिळविले. त्या लाल दिव्यापेक्षाही त्यांना काही जास्तीचे मिळाले का, ही उत्सुकता सगळ्यांना होती आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला देत प्रकाशित झालेल्या बातम्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरावर साचलेली धूळ बाजूला सारली गेली आहे.

‘तिकडं काय चाललंय ते जरा बघून येतो’, असे शरद पवारांना सांगून निघून गेलेले हेवीवेट नेते छगन भुजबळ तिकडचेेच झाले. गोफण तिकडे अन् धोंडाही तिकडेच, अशी गत झाली. अजित पवारांसोबत जाऊन भुजबळांनी मंत्रिपद मिळविले. त्या लाल दिव्यापेक्षाही त्यांना काही जास्तीचे मिळाले का, ही उत्सुकता सगळ्यांना होती आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला देत प्रकाशित झालेल्या बातम्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरावर साचलेली धूळ बाजूला सारली गेली आहे. केवळ आपणच नव्हे तर खुद्द अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजणांना ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या केंद्रीय यंत्रणांची भीती होती. साखर कारखान्याच्या भानगडीत पत्नी सुनेत्रा पवार यांना अटक होऊ शकते, या भीतीने अजित पवारांना तर घाम फुटला होता. याच कारणाने सगळ्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारमध्ये सामील झाले, असा या गाैप्यस्फोटाचा साधारण आशय आहे. स्वत: छगन भुजबळ यांनी लागलीच याविषयीच्या बातम्यांचा इन्कार केला आहे. सरदेसाई यांचे पुस्तक अद्याप आपण वाचलेले नाही, निवडणुकीची रणधुमाळी आटोपेपर्यंत ते वाचताही येणार नाही. त्यानंतर ते वाचू, वकिलांनाही वाचायला देऊ आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ, असे भुजबळ म्हणतात.

खरे पाहता भुजबळांनी जे काही म्हटलेय तो गाैप्यस्फोट नाही आणि धक्कादायक तर अजिबात नाही. असेच काहीतरी असल्याशिवाय केवळ विकासाच्या नावाखाली पंचवीस वर्षांची एकी संपवून थोरल्या पवारांचा नवरत्न दरबार शोभेल असे हे सरदार अचानक वेगळी भूमिका घेतील हे शक्यच नव्हते. अर्थात, या गोष्टी नेमक्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना बाहेर याव्यात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहेच. गेल्या तीन दिवसांतील घटनाक्रम त्याहून अधिक खास आहे. नवाब मलिक म्हणतात की, निवडणुकीच्या निकालानंतर चित्र वेगळे असेल, अजित पवार हे नव्या सरकारमध्ये किंगमेकर असतील. पाठोपाठ दिलीप वळसे-पाटील म्हणतात की, निकालानंतर नवी राजकीय समीकरणे तयार होतील. थोडक्यात, राष्ट्रवादीच्या धाकट्या पातीत काहीतरी वेगळे शिजते आहे. निवडणुकीसाठी धारण केलेला गुलाबी अवतार म्हणूनच अधिक मोहक आहे. या घटनाक्रमाची वेळ अधिक महत्त्वाची आहे. पालघरचे श्रीनिवास वनगा यांची नाराजी, बेपत्ता होणे, कुटुंबीयांचा संताप यामुळे शिवसेनेतील फुटीचा मुद्दा चर्चेत आला. बारामतीत शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना काका अजित पवारांच्या विरोधात उतरविल्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीच्या चर्चेला पुन्हा धुमारे फुटले. सारंगी प्रवीण महाजन व पूनम महाजन यांच्या आरोपांमुळे प्रमोद महाजन हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले. इतके सारे एकापाठोपाठ एक असे घडत आहे. परिणामी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेसेना तसेच राज्यातील राजकारणाची सूत्रे हलविणारा भारतीय जनता पक्ष अशा तिन्ही गोटांमध्ये अनामिक अस्वस्थता आहे. महायुतीमधील जागावाटपावेळी ती दृश्यमान झाली होती.

दीडशेपेक्षा अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेऊन भाजपने ती अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये झिरपणार नाही, याची काळजी घेतली. विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर निर्माण झालेला महाराष्ट्राच्या राजकारणातील चिखल, दलदल पुन्हा चर्चेत आली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे आहेत. ते सगळे कंगोरे उजेडात, स्पष्टपणे नजरेसमाेर आले आहेत असे नाही. निवडणूक प्रचाराच्या उरलेल्या दहा दिवसांत आणि कदाचित निकालानंतर आणखी बरेच काही उजेडात येईल. आतापर्यंत जे काही घडले आहे तेच मुळी जनतेच्या, मतदारांच्या डोक्याला झिणझिण्या आणणारे आहे आणि जे दिसते ते केवळ हिमनगाचे टाेक वाटावे, अशी स्थिती असेल तर बधीर होण्याशिवाय दुसरा पर्याय सामान्यांच्या हाती उरत नाही. असो! राजकारणाच्या तळाशी सुरू असलेली ही खदखद, अस्वस्थता मतदारांपर्यंत पोहोचू न देण्याची काळजी झाडून सारे नेते घेताहेत. परंपरेने सुसंस्कृत, स्वच्छ, पारदर्शी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय चालले आहे ते एका दमात सांगायला कोणीच तयार नाही. त्याऐवजी लाडकी बहीण, लाडके बेरोजगार, शेतकरी, ओबीसी, आरक्षण, जातगणना, संविधान बचाव अशा मुद्द्यांमध्ये मतदारांना गुंतवून ठेवण्याचे धोरण राजकारणी मंडळींनी स्वीकारले आहे. ही स्थिती निकालानंतरही पूर्वपदावर येईल, याची खात्री नाही. तोपर्यंत कोणत्या तरी निमित्ताने बाहेर येणारे छगन भुजबळांसारखे किस्सेच जनतेने गाैप्यस्फोट म्हणून स्वीकारायचे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ