शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: भुजबळ खरे ते बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:12 IST

Chhagan Bhujbal News: अजित पवारांसोबत जाऊन भुजबळांनी मंत्रिपद मिळविले. त्या लाल दिव्यापेक्षाही त्यांना काही जास्तीचे मिळाले का, ही उत्सुकता सगळ्यांना होती आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला देत प्रकाशित झालेल्या बातम्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरावर साचलेली धूळ बाजूला सारली गेली आहे.

‘तिकडं काय चाललंय ते जरा बघून येतो’, असे शरद पवारांना सांगून निघून गेलेले हेवीवेट नेते छगन भुजबळ तिकडचेेच झाले. गोफण तिकडे अन् धोंडाही तिकडेच, अशी गत झाली. अजित पवारांसोबत जाऊन भुजबळांनी मंत्रिपद मिळविले. त्या लाल दिव्यापेक्षाही त्यांना काही जास्तीचे मिळाले का, ही उत्सुकता सगळ्यांना होती आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकाचा हवाला देत प्रकाशित झालेल्या बातम्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरावर साचलेली धूळ बाजूला सारली गेली आहे. केवळ आपणच नव्हे तर खुद्द अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजणांना ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या केंद्रीय यंत्रणांची भीती होती. साखर कारखान्याच्या भानगडीत पत्नी सुनेत्रा पवार यांना अटक होऊ शकते, या भीतीने अजित पवारांना तर घाम फुटला होता. याच कारणाने सगळ्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारमध्ये सामील झाले, असा या गाैप्यस्फोटाचा साधारण आशय आहे. स्वत: छगन भुजबळ यांनी लागलीच याविषयीच्या बातम्यांचा इन्कार केला आहे. सरदेसाई यांचे पुस्तक अद्याप आपण वाचलेले नाही, निवडणुकीची रणधुमाळी आटोपेपर्यंत ते वाचताही येणार नाही. त्यानंतर ते वाचू, वकिलांनाही वाचायला देऊ आणि कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ, असे भुजबळ म्हणतात.

खरे पाहता भुजबळांनी जे काही म्हटलेय तो गाैप्यस्फोट नाही आणि धक्कादायक तर अजिबात नाही. असेच काहीतरी असल्याशिवाय केवळ विकासाच्या नावाखाली पंचवीस वर्षांची एकी संपवून थोरल्या पवारांचा नवरत्न दरबार शोभेल असे हे सरदार अचानक वेगळी भूमिका घेतील हे शक्यच नव्हते. अर्थात, या गोष्टी नेमक्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना बाहेर याव्यात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहेच. गेल्या तीन दिवसांतील घटनाक्रम त्याहून अधिक खास आहे. नवाब मलिक म्हणतात की, निवडणुकीच्या निकालानंतर चित्र वेगळे असेल, अजित पवार हे नव्या सरकारमध्ये किंगमेकर असतील. पाठोपाठ दिलीप वळसे-पाटील म्हणतात की, निकालानंतर नवी राजकीय समीकरणे तयार होतील. थोडक्यात, राष्ट्रवादीच्या धाकट्या पातीत काहीतरी वेगळे शिजते आहे. निवडणुकीसाठी धारण केलेला गुलाबी अवतार म्हणूनच अधिक मोहक आहे. या घटनाक्रमाची वेळ अधिक महत्त्वाची आहे. पालघरचे श्रीनिवास वनगा यांची नाराजी, बेपत्ता होणे, कुटुंबीयांचा संताप यामुळे शिवसेनेतील फुटीचा मुद्दा चर्चेत आला. बारामतीत शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना काका अजित पवारांच्या विरोधात उतरविल्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीच्या चर्चेला पुन्हा धुमारे फुटले. सारंगी प्रवीण महाजन व पूनम महाजन यांच्या आरोपांमुळे प्रमोद महाजन हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले. इतके सारे एकापाठोपाठ एक असे घडत आहे. परिणामी, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेसेना तसेच राज्यातील राजकारणाची सूत्रे हलविणारा भारतीय जनता पक्ष अशा तिन्ही गोटांमध्ये अनामिक अस्वस्थता आहे. महायुतीमधील जागावाटपावेळी ती दृश्यमान झाली होती.

दीडशेपेक्षा अधिक जागा आपल्या पदरात पाडून घेऊन भाजपने ती अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये झिरपणार नाही, याची काळजी घेतली. विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर निर्माण झालेला महाराष्ट्राच्या राजकारणातील चिखल, दलदल पुन्हा चर्चेत आली आहे. या चर्चेला अनेक कंगोरे आहेत. ते सगळे कंगोरे उजेडात, स्पष्टपणे नजरेसमाेर आले आहेत असे नाही. निवडणूक प्रचाराच्या उरलेल्या दहा दिवसांत आणि कदाचित निकालानंतर आणखी बरेच काही उजेडात येईल. आतापर्यंत जे काही घडले आहे तेच मुळी जनतेच्या, मतदारांच्या डोक्याला झिणझिण्या आणणारे आहे आणि जे दिसते ते केवळ हिमनगाचे टाेक वाटावे, अशी स्थिती असेल तर बधीर होण्याशिवाय दुसरा पर्याय सामान्यांच्या हाती उरत नाही. असो! राजकारणाच्या तळाशी सुरू असलेली ही खदखद, अस्वस्थता मतदारांपर्यंत पोहोचू न देण्याची काळजी झाडून सारे नेते घेताहेत. परंपरेने सुसंस्कृत, स्वच्छ, पारदर्शी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय चालले आहे ते एका दमात सांगायला कोणीच तयार नाही. त्याऐवजी लाडकी बहीण, लाडके बेरोजगार, शेतकरी, ओबीसी, आरक्षण, जातगणना, संविधान बचाव अशा मुद्द्यांमध्ये मतदारांना गुंतवून ठेवण्याचे धोरण राजकारणी मंडळींनी स्वीकारले आहे. ही स्थिती निकालानंतरही पूर्वपदावर येईल, याची खात्री नाही. तोपर्यंत कोणत्या तरी निमित्ताने बाहेर येणारे छगन भुजबळांसारखे किस्सेच जनतेने गाैप्यस्फोट म्हणून स्वीकारायचे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळ