शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

आजचा अग्रलेख: भ्रष्टाचाराचे इमले !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 7:02 AM

Supertech Twin Towers demolition: नोएडासारख्या आधुनिक विकसित झालेल्या नागरीकरणात बत्तीस मजल्यांच्या दोन मोठ्या इमारती उभ्या राहतात आणि त्याविषयी तक्रारी होऊनही संपूर्ण सरकारी यंत्रणा काहीच कारवाई करत नाही! अखेरीस रहिवाशांना न्यायालयात जावे लागते. न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही इमारती पाडून टाकण्यात येतात.

नवी दिल्लीचे उपनगर असल्याप्रमाणे विकसित झालेले आधुनिक शहर नोएडामध्ये सातशे कोटी रुपये खर्चून प्रत्येक मजल्यावर प्रशस्त चौदा फ्लॅट असणारी बत्तीस मजली इमारत पाडण्यात आली. या जुळ्या इमारती होत्या. त्या पाडण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची वाहवा करायची की, जगभर पसरणाऱ्या बातमीने व्याकूळ होऊन शरमेने मान खाली घालायची? नोएडासारख्या आधुनिक विकसित झालेल्या नागरीकरणात बत्तीस मजल्यांच्या दोन मोठ्या इमारती उभ्या राहतात आणि त्याविषयी तक्रारी होऊनही संपूर्ण सरकारी यंत्रणा काहीच कारवाई करत नाही! अखेरीस रहिवाशांना न्यायालयात जावे लागते. न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही इमारती पाडून टाकण्यात येतात. आजच्या बाजारपेठेच्या भावाप्रमाणे या इमारतींची किंमत काही हजार कोटी रुपयांमध्ये होईल. न्यायालयाने आदेश दिला नसता तर संपूर्ण सरकारी यंत्रणा विकत घेऊन भ्रष्टाचाराचे इमले चढविलेल्या या इमारती कायम राहिल्या असत्या. या इमारती पाडण्यासाठी केवळ बारा सेकंद लागले. त्यासाठी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर करण्यात आला, पण याचे कौतुक तरी कसे करायचे.

देशाच्या राजधानीच्या वेशीवरील नोएडा या शहरात अनेक वर्षे हे बांधकाम चालू असताना कोणाला रोखता आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या आधारेच हे बांधकाम बेकायदा ठरवून पाडून टाकण्याचा आदेश दिला. अलीकडेच भारतीय विद्यापीठ आयोगाने देशभरात चाळीस विद्यापीठे बेकायदा चालविण्यात येत असल्याचे सांगत त्या विद्यापीठांची यादीच जाहीर केली होती. पैसा  आणि सत्तेला कसेही वाकविता येते, अशी घमेंड असणाऱ्या वर्गाला बेकायदा विद्यापीठ चालविण्यात गैर वाटत नाही. हे फार भयानक आहे. मुंबईजवळच्या कल्याण शहरात ४० हजार घरांची आणि पुण्याजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १ लाख ४० हजार घरांची बेकायदा बांधकामे करण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात नवी घरे एखाद्या शहरात उभी राहत असताना महापालिका प्रशासनास थांगपत्ता लागू नये, याचे आश्चर्य वाटते. किंबहुना माहीत असूनही कारवाई करण्यात येत नाही. याचे एकमेव कारण भ्रष्टाचाराने बरबटलेली शासकीय यंत्रणा !

कल्याण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ही हजारो घरे पाडण्याऐवजी ती कायम करण्यासाठी ज्या कायद्याखाली बेकायदा ठरत होती, तो कायदाच बदलण्यात आला. त्या घरांच्या मालकांना अभय देण्यात आले. संपूर्ण समाजाचे हातच भ्रष्टाचाराने बरबटून गेल्यावर काय करायचे, असा सवाल करीत आपल्या लोकप्रतिनिधींनी कायदाच बदलून टाकला. सगळी यंत्रणाच भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. महाराष्ट्रात दरवर्षी बेकायदा शाळा, विनापरवानगी चालविलेली हायस्कूल किंवा महाविद्यालये यांची यादी जाहीर करण्यात येते. विद्यादानाचे कार्य करणाऱ्या संस्थाच योग्य ती रीतसर परवानगी न घेता चालविल्या जातात. त्यांच्यावर कारवाई होत नाही.

बिहारमधील एका जिल्ह्यात पोलीस ठाणेच बनावट निघाले. त्या पोलीस ठाण्याला मंजुरी नाही. मात्र, काही टग्यांनी पोलिसांचा वेश धारण करून चक्क पोलीस ठाणेच चालविले होते. आपल्या लोकशाही शासन व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारे हे सर्व प्रकार आहेत. कोविडसारख्या मानवी जीवनाला हादरवून सोडणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होताना त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत भ्रष्टाचार करण्यात आल्याची प्रकरणे घडली. माणसांनी आपल्या सत्वाची पातळी सोडून शासकीय यंत्रणाच विकायला काढली, असे वाटू लागले. हिंदी चित्रपटात खलनायकांचे अनेक कारनामे दाखवितात. ते पाहताना माणूस इतक्या खालच्या स्तराला कसा जाईल, असे वाटते. हिंदी चित्रपटात बऱ्याचदा अतिशयोक्ती करण्यात येते, असे वाटते; पण नोएडा ते महाराष्ट्रातील अनेक प्रकरणे पाहिली तर असे वाटते की, आपले हिंदी चित्रपट खरेच वास्तव दाखवितात! नोएडामधील दोन्ही टॉवरच्या उभारणीसाठी ज्यांनी मदत केली, परवानग्या दिल्या, काम पूर्ण झाल्याचे दाखले दिले या साऱ्यांना पकडले पाहिजे. म्हातारी गेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावता कामा नये. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेणारे कडक कायदे करायला हवेत. ते मोडणाऱ्यांना अटकाव करण्यासाठीही हे कायदे केले पाहिजेत. रोज तयार होणारे भ्रष्टाचाराचे हे इमलेच इमले पाडून टाकायचे असतील तर यात गुंतलेल्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारत