शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आजचा अग्रलेख: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पत्रावळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 09:03 IST

Loan Waiver For Farmers: अर्थकारणाचे सिद्धांत राजकीय डावानुसार अंमलात आणता येत नाहीत. पैशांचे सोंग करून लोकांना फसविता येत नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी निवडणुकीची स्पर्धा खेळताना हातात पैसा नसताना सोंग घेऊन मतदारांना फसवून पाहिले. आता त्यांना महाराष्ट्रातील तेरा कोटी लोकांची काळजी घ्यायची आहे, याची आठवण झाली.

महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन पुढील वर्ष सुख, समाधान आणि समृद्धीचे जावो, अशी आशा करीत असताना आपले राजकारणी विशेषतः सत्ताधारी कोणत्या पात्रतेचे राजकारण करीत आहेत. ते पाहता सुख-समाधान मिळेल याची खात्री नाही. समृद्धीची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, कारण महाराष्ट्राच्या अर्थाची व्यवस्थाच खिळखिळी करून ठेवण्यात आली आहे. अर्थकारणाचे सिद्धांत राजकीय डावानुसार अंमलात आणता येत नाहीत. पैशांचे सोंग करून लोकांना फसविता येत नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी निवडणुकीची स्पर्धा खेळताना हातात पैसा नसताना सोंग घेऊन मतदारांना फसवून पाहिले. आता त्यांना महाराष्ट्रातील तेरा कोटी लोकांची काळजी घ्यायची आहे, याची आठवण झाली. निवडणुकीचे डाव जिंकण्यासाठी कोणत्याही बहिणीची मागणी नसताना लाडकी बहीण योजना आणली. आर्थिक परिस्थिती न पाहता अर्ज करणाऱ्या प्रत्येक बहिणीला दरमहा पंधराशे रुपये दिले. असे सुमारे ३३ हजार कोटी रुपये वाटून तिजोरी मोकळी केली.

उधारीचेदेखील असेच एक आश्वासन दिले होते की, सत्तेवर येताच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. खरीप हंगामात ३८ लाख ७० हजार शेतकऱ्यांना ४० हजार ३६३ कोटी रुपये आणि रब्बी हंगामात १७ हजार ७४२ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही ५८ हजार १०७कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा हवा ! तिजोरी आधीच लाडक्या बहिर्णीसाठी खुली केली होती. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातही ३६ हजार कोटी रुपये बाजूला काढून ठेवण्याची तरतूद आहे. कोणत्याही उद्देशाविना राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकार सर्वाधिक तरतूद करते. निवडणुकीनंतर १५०० रुपये प्रतिमाहचे २१०० रुपये करू, असे सांगितले होते. इंडिया आघाडी तर तीन हजार रुपये देऊ, असे सांगत होते. आजचे जेवण पत्रावळीवर उरकून टाकू, उद्याचे उद्या पाहता येईल, अशा विचारांमुळे राज्याची ही कोंडी झाली आहे.  

निवडणुकीत बहिणींच्या मतांची तरतूद केली. शेतकरी भावांचीही मते हवीत, म्हणून कर्जमाफीचे उधारीचे आश्वासन दिले गेले. कर्जमाफी होणार असल्याने शेतकऱ्यांनी कर्जेच भरली नाहीत. परतफेड थांबताच पतपुरवठा करणाऱ्या बँका अडचणीत आल्या आहेत. अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर कारवाई करण्याची वेळ येईल. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य बँकेला प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याचाही सोहळा मंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. आता अर्थमंत्री अजित पवार रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असल्याचा (गैर) फायदा घेत कर्जमाफी होणार नाही. पुढील वर्षीदेखील होणार नाही. ३१ मार्चच्या आत मुकाट्याने पैसे भरा, असेच त्यांनी सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांनीदेखील आढेवेढे घेत तेच सरकारचे धोरण असल्याचे सांगून टाकले. एकनाथ शिंदे यांन यांनी थेट भूमिका स्पष्ट न करता समृद्ध महाराष्ट्राचा निर्धार असल्याचे सांगून टाकले. स्टीलच्या ताटात जेवता येईल एवढी तरी प्रगती महाराष्ट्राने साधली होती. आता परत पत्रावळ्या शोधाव्या लागणार आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. पायाभूत सुविधांसाठी लोकांच्या डोक्यावर टोलसारखे कर मारून पैसा कमवून रिकामे होणार आणि 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी