शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: ४१ मजूर सुखरूप सुटले, पण काही गोष्टींचा विचार होणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:44 IST

Uttarkashi Tunnel Rescue: सलग सतरा दिवस, सुमारे चारशे तास मृत्यूशी झुंज सुरू होती. खडतर आव्हानांशी सामना सुरू होता. सिलक्यारा बोगद्यातील बचाव मोहिमेला अखेर यश आले आणि साऱ्या देशवासीयांच्या आनंदाला परिसीमा उरली नाही. सुटका केलेल्या ४१ मजुरांसह बचाव मोहिमेतील सर्वांच्या घरी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली.

सलग सतरा दिवस, सुमारे चारशे तास मृत्यूशी झुंज सुरू होती. खडतर आव्हानांशी सामना सुरू होता. सिलक्यारा बोगद्यातील बचाव मोहिमेला अखेर यश आले आणि साऱ्या देशवासीयांच्या आनंदाला परिसीमा उरली नाही. सुटका केलेल्या ४१ मजुरांसह बचाव मोहिमेतील सर्वांच्या घरी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. या बोगद्याच्या आसपासच्या हॉटेल्समध्ये या मजुरांचे नातेवाईक आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर अगदी अवर्णनीय आहे. १२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या बचाव मोहिमेत विविध राज्यांतील आणि परदेशांतील तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. एनडीआरएफसह इतर पाच संस्था बचाव मोहिमेत सहभागी होत्या. लष्करही दाखल झाले होते. बचाव पथकांतील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विलोभनीय होता. बोगदातज्ज्ञ ख्रिस कूपर, लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त), ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनिंग तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स, रस्ते- वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल.

बोगद्यात अडकलेले मजूरही देशातील विविध राज्यांतील रहिवासी आहेत. भाषा, प्रांत, धर्म, देश वेगवेगळे असतानाही मानव धर्माला जागून सारे एकटवले. त्याचा परिणाम मानवी सहृदयतेच्या विजयात झाला. सारे जग युद्धाच्या बातम्यांनी चिंताक्रांत आहे. अशा वेळी माणुसकीचे आगळे रूप दाखविणाऱ्या घटनेची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली. पर्वताला हलवून जगण्याची लढाई यशस्वी झाल्याच्या उपमा दिल्या गेल्या. माणूसपण शिल्लक असल्याची झुळूक युद्धांच्या नकारात्मक बातम्यांमध्येही या घटनेने सर्वांना दिली. बचाव पथकासमोर आणि आतील अडकलेल्या मजुरांसमोर अनेक संकटे समोर होती. जीवन-मृत्यूमध्ये चाललेली ही लढाई होती. मजुरांच्या सुटकेची शक्यता दिसत असतानाच जीवनासाठीचा संघर्ष लांबत चालला होता. अखेर ‘रॅट-होल माइनर्स’ अर्थात प्रत्यक्ष माणसानेच आत जाऊन उरलेला मलबा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. ५७ मीटर लांब मलबा पडला होता. त्यातील शेवटचा दहा ते बारा मीटर मलबा ‘रॅट-होल माइनर्स’नी काढला आणि दिवाळीचा आनंद देशवासीयांच्या घराघरांत साजरा झाला. ‘मॅन बिहाइंड द मशीन’ महत्त्वाचा असतो, हे पुन्हा अधोरेखित झाले. युद्धामध्ये कुणाकडे कुठली शस्त्रे आहेत, यापेक्षा ती शस्त्रे चालविणारे किती कुशल आहेत, यावर युद्धातील जय-पराजय ठरतो. या संज्ञेची प्रचिती ‘रॅट-होल माइनर्स’मुळे पुन्हा आली. वास्तविक अशा प्रकारच्या माइनिंगला हरित लवादाने बंदी घातली आहे; पण या ठिकाणी अपवादात्मक स्थितीत त्याचा वापर करण्यात आला.

मजुरांच्या यशस्वी सुटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही मजुरांची विचारपूस केली. सर्व मजुरांना आता हृषीकेश येथे पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे. ४१ मजुरांची सुटका हा साऱ्या देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व यंत्रणा एकत्रित आल्या आणि त्यांच्यात उत्तम समन्वय झाला, तर अशक्यही शक्य होते, हे पुन्हा दिसले. या ठिकाणी मजुरांची यशस्वी सुटका करून आनंदाचा क्षण साजरा करीत असतानाच चार धाम मार्गातील पर्यावरण आणि तेथे होणारा विकास यावरही एक नजर टाकली पाहिजे. चार धाम महामार्ग परियोजनेंतर्गत सिलक्यारा येथे साडेचार किलोमीटर लांबीचा दुहेरी मार्ग असलेला बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्यामुळे चार धाम यात्रेकरूंचा वेळ वाचणार आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री अक्ष याद्वारे जोडला जाणार आहे. त्यामुळे बर्फाळ प्रदेशातून पन्नास मिनिटांचे अंतर कापण्याऐवजी यात्रेकरू केवळ पाच मिनिटांत हे अंतर पार करतील. सर्व प्रकारच्या हवामानात ही संपर्क यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प अतिशय आकर्षक असला, तरी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा विचार पूर्णपणे केला गेल्याचे दिसत नाही.

तसेच, बोगदा बांधताना सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले होते का, हेदेखील पाहणे गरजेचे आहे. कारण मलबा पडल्यानंतर मजुरांना सुरक्षितस्थळी जाण्याचा मार्गच उपलब्ध नव्हता. साऱ्या देशासाठी अत्यंत पवित्र असलेल्या चार धाम यात्रामार्गाचा विकास हा तेथील भूगोलावर परिणाम करणारा नसावा, अशी रास्त अपेक्षा आहे. जोशीमठ येथील घटना ताजी आहे. तेथील भूमी खचून रस्त्यांसह इमारतींना तडे गेले आहेत. स्थानिक नागरिक विकासकामांना दोष देत आहेत. स्थानिक पातळीवर यात्रेकरूंची सोय करण्याच्या नावाखाली होत असलेले नियमांचे उल्लंघन, यात्रेला पर्यटनाचे आलेले स्वरूप यावरही मंथन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत