शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

जगावे की मरावे? मानवी अस्तित्वच पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 09:46 IST

देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे.

मानवी प्रगती आणि समृद्धी याला केवळ तंत्रज्ञानाचा विकास कारणीभूत नसतो. पर्यावरण आणि या पर्यावरणाला माणूस कशा पद्धतीने जपतो, पर्यावरणाची समृद्धी कशा पद्धतीने करतो, यावर खरा विकास अवलंबून असतो. मानवी समुदायाची गोष्ट पाहिली म्हणजे याची खात्रीच पटते! विकासाची व्याख्या बदलत असताना, आज मानवी हस्तक्षेपाने निसर्गाची जी वाताहत सुरू आहे, त्यावरून, येणारा काळ सर्वांसाठी संकटाचा असणार आहे! अवकाळी पाऊस, वाढणारे उष्ण दिवस, बदलते तापमान याचीच तर साक्ष देत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. कमी किंवा जास्त पाऊस, उष्णतेचे जास्त दिवस यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये एल-निनो आणि ला-निना हे आहेत. भारतातील सर्व शेतकऱ्यांना खरे तर याची जाणीव असायला हवी. ‘एल निनो’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगा.

दक्षिण अमेरिकेतील एका मच्छीमाराने समुद्राच्या वरच्या थराचे तापमान कमी-जास्त होत असल्याचे प्रथम पाहिले. ही घटना सोळाव्या शतकामधील. डिसेंबरमध्ये ‘एल-निनो’चा प्रभाव सर्वाधिक असतो. ‘ला निना’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगी. ‘एल-निनो’च्या अगदी उलट परिणाम ‘ला-निना’मुळे होतो. पाऊस जास्त पडण्यास ‘ला-निना’ कारण ठरतो. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी किंवा जास्त झाले, तर वाऱ्याची दिशा बदलते. एरव्ही आशिया खंडाकडे वाहणारे वारे दक्षिण अमेरिकेकडे वाहतात आणि हवामानाचा पूर्ण पॅटर्नच बदलतो. याचा परिणाम आपल्याकडे भारतात पाऊस कमी होण्यावर होतो. याउलट ‘ला-निना’मध्ये अधिकाधिक वारे आशिया खंडाकडे वाहतात. एल-निनोच्या टप्प्यानंतर सर्वसाधारणपणे ‘एनसो’चा (एल-निनो सदर्न ऑसिलेशन) टप्पा येतो आणि बहुतांश वेळा एल-निनोनंतर ला-निनाची स्थिती येते. या तांत्रिक बाबी सांगण्याचे कारण म्हणजे देशात सध्या एल-निनो उतरणीच्या मार्गावर आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे.

अर्थात यामुळे दोन गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात एल-निनोचा प्रभाव अद्याप असल्यामुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार आहे आणि दुसरी म्हणजे जूनपर्यंत एल-निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने येणारा पावसाळा सुखद असणार आहे. पावसाच्या दृष्टीने आणखी अचूक अंदाज एप्रिल महिन्याच्या मध्यातच समजेल. त्यामुळे तूर्तास उन्हाळा सर्वांसाठी कठीण राहणार आहे, हे अधिक महत्त्वाचे. उन्हाळ्यात सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करीत असतात. पण, हा उन्हाळा आणखी एका कारणासाठी वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे पुढील दोन महिने देशभरात होणार असलेल्या मध्यावधी निवडणुका आणि त्यासाठीचा जोरदार प्रचार. उमेदवारांसोबतच कार्यकर्तेही या काळात घरोघरी प्रचार करणार. हवामानाच्या अंदाजानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. रात्रीचेही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत हवामानाच्या या अंदाजाची दखल किती जणांनी घेतली असेल? एखाद्या सभेच्या ठिकाणी हवामानाचा हा अंदाज पाहून कुठला उमेदवार लोकांच्या बसण्याची आणि आवश्यक त्या इतर सुविधांची सोय करील? एखादा अपघात झाल्यानंतरच जाग येऊ नये, ही अपेक्षा.

प्रचाराबरोबरच मतदानही ऐन उन्हाळ्यात होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांसह सर्व ठिकाणी उन्हाळ्याची दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा जागोजागी उभारण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित इतक्या मोठ्या घटकाबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते, त्याबद्दल ते जागरूकही नसतात... पर्यावरण, ई-कचऱ्याचे संकलन, तापमानबदल, बेकायदा वृक्षतोड, टेकड्यांची होणारी कत्तल, पर्यावरणाचा विनाश करून होणाऱ्या विकासाच्या व्याख्या यांसारखे मुद्देही निवडणुकीत दिसत नाहीत. लोकशाहीत लोक जेवढे जागरूक, तेवढी तिथली प्रशासन व्यवस्था सुनियोजित आणि कार्यक्षम. एल-निनो आणि ला-निनाबाबत जागरूक राहून त्यानुसार शेतकरी पीक घेत असतील, अशी स्थिती नाही. हवामानाबरोबरच पर्यावरणाच्या बाबतीत अधिक साक्षर होणे अपरिहार्य आहे. मानवी अस्तित्वच पणाला लागले आहे. जगावे की मरावे, असा हा सवाल आहे. पण, निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्यांना त्याचे भान तरी आहे का?

टॅग्स :Temperatureतापमान