शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जगावे की मरावे? मानवी अस्तित्वच पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 09:46 IST

देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे.

मानवी प्रगती आणि समृद्धी याला केवळ तंत्रज्ञानाचा विकास कारणीभूत नसतो. पर्यावरण आणि या पर्यावरणाला माणूस कशा पद्धतीने जपतो, पर्यावरणाची समृद्धी कशा पद्धतीने करतो, यावर खरा विकास अवलंबून असतो. मानवी समुदायाची गोष्ट पाहिली म्हणजे याची खात्रीच पटते! विकासाची व्याख्या बदलत असताना, आज मानवी हस्तक्षेपाने निसर्गाची जी वाताहत सुरू आहे, त्यावरून, येणारा काळ सर्वांसाठी संकटाचा असणार आहे! अवकाळी पाऊस, वाढणारे उष्ण दिवस, बदलते तापमान याचीच तर साक्ष देत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. कमी किंवा जास्त पाऊस, उष्णतेचे जास्त दिवस यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये एल-निनो आणि ला-निना हे आहेत. भारतातील सर्व शेतकऱ्यांना खरे तर याची जाणीव असायला हवी. ‘एल निनो’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगा.

दक्षिण अमेरिकेतील एका मच्छीमाराने समुद्राच्या वरच्या थराचे तापमान कमी-जास्त होत असल्याचे प्रथम पाहिले. ही घटना सोळाव्या शतकामधील. डिसेंबरमध्ये ‘एल-निनो’चा प्रभाव सर्वाधिक असतो. ‘ला निना’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगी. ‘एल-निनो’च्या अगदी उलट परिणाम ‘ला-निना’मुळे होतो. पाऊस जास्त पडण्यास ‘ला-निना’ कारण ठरतो. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी किंवा जास्त झाले, तर वाऱ्याची दिशा बदलते. एरव्ही आशिया खंडाकडे वाहणारे वारे दक्षिण अमेरिकेकडे वाहतात आणि हवामानाचा पूर्ण पॅटर्नच बदलतो. याचा परिणाम आपल्याकडे भारतात पाऊस कमी होण्यावर होतो. याउलट ‘ला-निना’मध्ये अधिकाधिक वारे आशिया खंडाकडे वाहतात. एल-निनोच्या टप्प्यानंतर सर्वसाधारणपणे ‘एनसो’चा (एल-निनो सदर्न ऑसिलेशन) टप्पा येतो आणि बहुतांश वेळा एल-निनोनंतर ला-निनाची स्थिती येते. या तांत्रिक बाबी सांगण्याचे कारण म्हणजे देशात सध्या एल-निनो उतरणीच्या मार्गावर आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे.

अर्थात यामुळे दोन गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात एल-निनोचा प्रभाव अद्याप असल्यामुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार आहे आणि दुसरी म्हणजे जूनपर्यंत एल-निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने येणारा पावसाळा सुखद असणार आहे. पावसाच्या दृष्टीने आणखी अचूक अंदाज एप्रिल महिन्याच्या मध्यातच समजेल. त्यामुळे तूर्तास उन्हाळा सर्वांसाठी कठीण राहणार आहे, हे अधिक महत्त्वाचे. उन्हाळ्यात सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करीत असतात. पण, हा उन्हाळा आणखी एका कारणासाठी वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे पुढील दोन महिने देशभरात होणार असलेल्या मध्यावधी निवडणुका आणि त्यासाठीचा जोरदार प्रचार. उमेदवारांसोबतच कार्यकर्तेही या काळात घरोघरी प्रचार करणार. हवामानाच्या अंदाजानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. रात्रीचेही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत हवामानाच्या या अंदाजाची दखल किती जणांनी घेतली असेल? एखाद्या सभेच्या ठिकाणी हवामानाचा हा अंदाज पाहून कुठला उमेदवार लोकांच्या बसण्याची आणि आवश्यक त्या इतर सुविधांची सोय करील? एखादा अपघात झाल्यानंतरच जाग येऊ नये, ही अपेक्षा.

प्रचाराबरोबरच मतदानही ऐन उन्हाळ्यात होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांसह सर्व ठिकाणी उन्हाळ्याची दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा जागोजागी उभारण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित इतक्या मोठ्या घटकाबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते, त्याबद्दल ते जागरूकही नसतात... पर्यावरण, ई-कचऱ्याचे संकलन, तापमानबदल, बेकायदा वृक्षतोड, टेकड्यांची होणारी कत्तल, पर्यावरणाचा विनाश करून होणाऱ्या विकासाच्या व्याख्या यांसारखे मुद्देही निवडणुकीत दिसत नाहीत. लोकशाहीत लोक जेवढे जागरूक, तेवढी तिथली प्रशासन व्यवस्था सुनियोजित आणि कार्यक्षम. एल-निनो आणि ला-निनाबाबत जागरूक राहून त्यानुसार शेतकरी पीक घेत असतील, अशी स्थिती नाही. हवामानाबरोबरच पर्यावरणाच्या बाबतीत अधिक साक्षर होणे अपरिहार्य आहे. मानवी अस्तित्वच पणाला लागले आहे. जगावे की मरावे, असा हा सवाल आहे. पण, निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्यांना त्याचे भान तरी आहे का?

टॅग्स :Temperatureतापमान