शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जगावे की मरावे? मानवी अस्तित्वच पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 09:46 IST

देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे.

मानवी प्रगती आणि समृद्धी याला केवळ तंत्रज्ञानाचा विकास कारणीभूत नसतो. पर्यावरण आणि या पर्यावरणाला माणूस कशा पद्धतीने जपतो, पर्यावरणाची समृद्धी कशा पद्धतीने करतो, यावर खरा विकास अवलंबून असतो. मानवी समुदायाची गोष्ट पाहिली म्हणजे याची खात्रीच पटते! विकासाची व्याख्या बदलत असताना, आज मानवी हस्तक्षेपाने निसर्गाची जी वाताहत सुरू आहे, त्यावरून, येणारा काळ सर्वांसाठी संकटाचा असणार आहे! अवकाळी पाऊस, वाढणारे उष्ण दिवस, बदलते तापमान याचीच तर साक्ष देत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. कमी किंवा जास्त पाऊस, उष्णतेचे जास्त दिवस यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये एल-निनो आणि ला-निना हे आहेत. भारतातील सर्व शेतकऱ्यांना खरे तर याची जाणीव असायला हवी. ‘एल निनो’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगा.

दक्षिण अमेरिकेतील एका मच्छीमाराने समुद्राच्या वरच्या थराचे तापमान कमी-जास्त होत असल्याचे प्रथम पाहिले. ही घटना सोळाव्या शतकामधील. डिसेंबरमध्ये ‘एल-निनो’चा प्रभाव सर्वाधिक असतो. ‘ला निना’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगी. ‘एल-निनो’च्या अगदी उलट परिणाम ‘ला-निना’मुळे होतो. पाऊस जास्त पडण्यास ‘ला-निना’ कारण ठरतो. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी किंवा जास्त झाले, तर वाऱ्याची दिशा बदलते. एरव्ही आशिया खंडाकडे वाहणारे वारे दक्षिण अमेरिकेकडे वाहतात आणि हवामानाचा पूर्ण पॅटर्नच बदलतो. याचा परिणाम आपल्याकडे भारतात पाऊस कमी होण्यावर होतो. याउलट ‘ला-निना’मध्ये अधिकाधिक वारे आशिया खंडाकडे वाहतात. एल-निनोच्या टप्प्यानंतर सर्वसाधारणपणे ‘एनसो’चा (एल-निनो सदर्न ऑसिलेशन) टप्पा येतो आणि बहुतांश वेळा एल-निनोनंतर ला-निनाची स्थिती येते. या तांत्रिक बाबी सांगण्याचे कारण म्हणजे देशात सध्या एल-निनो उतरणीच्या मार्गावर आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे.

अर्थात यामुळे दोन गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात एल-निनोचा प्रभाव अद्याप असल्यामुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार आहे आणि दुसरी म्हणजे जूनपर्यंत एल-निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने येणारा पावसाळा सुखद असणार आहे. पावसाच्या दृष्टीने आणखी अचूक अंदाज एप्रिल महिन्याच्या मध्यातच समजेल. त्यामुळे तूर्तास उन्हाळा सर्वांसाठी कठीण राहणार आहे, हे अधिक महत्त्वाचे. उन्हाळ्यात सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करीत असतात. पण, हा उन्हाळा आणखी एका कारणासाठी वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे पुढील दोन महिने देशभरात होणार असलेल्या मध्यावधी निवडणुका आणि त्यासाठीचा जोरदार प्रचार. उमेदवारांसोबतच कार्यकर्तेही या काळात घरोघरी प्रचार करणार. हवामानाच्या अंदाजानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. रात्रीचेही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत हवामानाच्या या अंदाजाची दखल किती जणांनी घेतली असेल? एखाद्या सभेच्या ठिकाणी हवामानाचा हा अंदाज पाहून कुठला उमेदवार लोकांच्या बसण्याची आणि आवश्यक त्या इतर सुविधांची सोय करील? एखादा अपघात झाल्यानंतरच जाग येऊ नये, ही अपेक्षा.

प्रचाराबरोबरच मतदानही ऐन उन्हाळ्यात होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांसह सर्व ठिकाणी उन्हाळ्याची दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा जागोजागी उभारण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित इतक्या मोठ्या घटकाबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते, त्याबद्दल ते जागरूकही नसतात... पर्यावरण, ई-कचऱ्याचे संकलन, तापमानबदल, बेकायदा वृक्षतोड, टेकड्यांची होणारी कत्तल, पर्यावरणाचा विनाश करून होणाऱ्या विकासाच्या व्याख्या यांसारखे मुद्देही निवडणुकीत दिसत नाहीत. लोकशाहीत लोक जेवढे जागरूक, तेवढी तिथली प्रशासन व्यवस्था सुनियोजित आणि कार्यक्षम. एल-निनो आणि ला-निनाबाबत जागरूक राहून त्यानुसार शेतकरी पीक घेत असतील, अशी स्थिती नाही. हवामानाबरोबरच पर्यावरणाच्या बाबतीत अधिक साक्षर होणे अपरिहार्य आहे. मानवी अस्तित्वच पणाला लागले आहे. जगावे की मरावे, असा हा सवाल आहे. पण, निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्यांना त्याचे भान तरी आहे का?

टॅग्स :Temperatureतापमान