शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काळ सोकावेल !

By admin | Updated: April 13, 2016 03:45 IST

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह

केंद्र सरकार कापसाच्या बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण तर ठेवेलच शिवाय बीजोत्पादक कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करू दिली जाणार नाही, असा सज्जड इशारा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी थेट मोन्सँटो या बहुराष्ट्रीय कंपनीचे नाव घेऊनच दिला आहे. मोन्सँटोचा संयुक्त उपक्रम असलेली महिको मोन्सँटो बायोटेक लिमिटेड (एमएमबीएल) ही कंपनी भारतात बीटी कॉटन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कपाशीच्या बियाणाचे उत्पादन व विक्री करते. एमएमबीएलने इतर २८ भारतीय कंपन्यांनाही उत्पादनाचा परवाना दिला आहे. कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या बोंडअळीला अटकाव करणारी ही जात जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. मोन्सँटोकडे या तंत्रज्ञानाचे एकस्व (पेटंट) असल्यामुळे ती कंपनी कपाशीच्या इतर वाणांच्या तुलनेत किती तरी चढ्या दराने विक्री करीत आहे. केंद्राने त्यालाच लगाम घालण्याचा निर्धार केला आहे. बीटी बियाणाची ४५० ग्रॅम वजनाची पिशवी मोन्सँटो आतापर्यंत एक हजार रुपयांहून अधिक किमतीला विकत होती; मात्र गेल्याच महिन्यात भारत सरकारने त्यासाठी ८०० रुपयांपेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही, असे फर्मान काढले. बीटी बियाणाच्या किमतीत, मोन्सँटो आकारत असलेल्या एक प्रकारच्या स्वामीत्वशुल्काचाही अंतर्भाव आहे. आतापर्यंत बीटी बोलगार्ड-१ साठी १२२.९६ रुपये, तर बीटी बोलगार्ड -२ साठी १८३.४६ रुपये स्वामीत्वशुल्क आकारले जात होते; मात्र आता त्यावरही मर्यादा घालण्यात आली आहे. कपाशी लागवडीच्या वाढत्या भांडवली खर्चामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राचा हा निर्णय नक्कीच मोठा दिलासा देणारा आहे. मोन्सँटोच्या मात्र तो स्वाभाविकच पचनी पडलेला नाही. किंमतीमध्ये पुरेशी वाढ करण्यास परवानगी दिली नाही, तर भारतातील कारभार गुंडाळावा लागेल आणि या देशात नवे तंत्रज्ञान आणता येणार नाही, असा इशाराच त्या कंपनीने दिला आहे. हा इशारा भारतासाठी धोकादायक आहे. वाढती लोकसंख्या आणि घटत चाललेले लागवडीखालील क्षेत्र, या पार्श्वभूमीवर भारताला कृषी उत्पादनात वाढ करणाऱ्या तंत्रज्ञानाची, विशेषत: नवनव्या बियाणांची नितांत गरज आहे. देशातील कृषी विद्यापीठे आणि इतर संस्थांमध्ये उपयुक्त संशोधनाच्या बाबतीत आनंदीआनंदच आहे. मोन्सँटोचे बीटी बियाणे २००२ मध्ये भारतात दाखल झाले. तेव्हापासून देशी बीटी वाण विकसित करण्याच्या गप्पा सुरू आहेत; पण प्रत्यक्षात अद्यापही केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर)चे बीटी बियाणे बाजारात आलेले नाही. उद्या मोन्सँटो निघून गेली, तर जगातील इतर कंपन्याही भारतात आपले तंत्रज्ञान आणण्यापूर्वी दहादा विचार करतील. भीती त्याची आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावला तर काय?