शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तितिक्षा

By admin | Updated: January 16, 2015 00:35 IST

येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते.

ज्ञानसाधू वा.गो. चोरघडे - परमार्थ साधकांसाठी, अध्यात्म ज्ञानाच्या जिज्ञासूंसाठी साधना चतुष्ट्य सांगितले गेले आहे. विवेक, वैराग्य आणि मुक्तीच्या जिज्ञासेसोबत असलेल्या आवश्यक असलेल्या गुणवैशिष्ट्यात तितिक्षा हा महत्त्वाचा गुणविशेष आहे. तितिक्षा या शब्दाचा अर्थ सहनशक्ती, क्षमा करण्याची वृत्ती, धीर धरणे इत्यादी. ज्ञानवंताच्या क्षमाशील वृत्तीत, ज्ञानदेवांनी तितिक्षेची सर्व लक्षणे सांगितली आहेत.जो मानापमानाते साहे।तो सुखदु:ख जेथ समाये। निंदास्तुती नोहे। दुखंडु जो।।उन्हाळेनि जो न तापे।हिमवंती न कापे। कायसेनिही न वासिपे। पातलेया।।नाना चराचरी भूती।दाटणी नव्हे क्षिती।तैसा नाना द्वंद्वी। घामेजेना।।(ज्ञाने. १६. ३४४.७५)जीवनात आपल्याला अनेक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. मान, अपमान, गरिबी-श्रीमंती, निंदा-स्तुती, ऊन-पाऊस या स्थितीत चित्ताचे समत्व राखणे, आलेली स्थिती सहन करणे हे इथे अपेक्षित आहे. आयुष्यात येणारी द्वंद्वात्मक अवस्था बिनतक्रार सहन करणे म्हणजे तितिक्षा. केवळ सहन करणेच नव्हे तर ती सहन करीत असल्याचे भानही नसणे.तैसा जयाचिया ठायी।न साहणे काहीच नाही।आणि साहतु हेमेही। स्मरण नुरे।।कायिक, वाचिक, मानसिक दु:खे अप्रतिकारपूर्वक सहन करणे म्हणजे तितिक्षा, अशी शंकराचार्यांनी त्याची व्याख्या केली आहे.सहनं सर्व दु:खानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते!येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते. प्रतिकूल अनुभवांना दूर सारणे किंवा सुखी क्षणांना ठेवून घेणे आपल्या हातातही नसते. त्याच्या चिंता वाहत बसणे, त्यात मिळालेले आयुष्य खर्ची घातल्याने जीवनाची यथार्थता शोधण्याचा, सत्य शोधण्याचा प्रयत्न कसा घडणार? मिळालेले जीवन कृतार्थ व्हावे, त्याचा हेतू लक्षात यावा. प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्संग, सद्विचारांचे श्रवण, त्याचे चिंतन करीत मी कोण आहे; माझे स्वरूप काय आहे, याचा बोध करून घेणे यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. उन्हाळा आला की उन्हाचा त्रास होणार, हिवाळ्यात थंडीचा. प्रत्येक ऋतूत बदलणाऱ्या हवामानाचा बरा-वाईट परिणाम होणारच आहे. ज्येष्ठांनी विशेषत: हे लक्षात ठेवावे.