शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

तितिक्षा

By admin | Updated: January 16, 2015 00:35 IST

येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते.

ज्ञानसाधू वा.गो. चोरघडे - परमार्थ साधकांसाठी, अध्यात्म ज्ञानाच्या जिज्ञासूंसाठी साधना चतुष्ट्य सांगितले गेले आहे. विवेक, वैराग्य आणि मुक्तीच्या जिज्ञासेसोबत असलेल्या आवश्यक असलेल्या गुणवैशिष्ट्यात तितिक्षा हा महत्त्वाचा गुणविशेष आहे. तितिक्षा या शब्दाचा अर्थ सहनशक्ती, क्षमा करण्याची वृत्ती, धीर धरणे इत्यादी. ज्ञानवंताच्या क्षमाशील वृत्तीत, ज्ञानदेवांनी तितिक्षेची सर्व लक्षणे सांगितली आहेत.जो मानापमानाते साहे।तो सुखदु:ख जेथ समाये। निंदास्तुती नोहे। दुखंडु जो।।उन्हाळेनि जो न तापे।हिमवंती न कापे। कायसेनिही न वासिपे। पातलेया।।नाना चराचरी भूती।दाटणी नव्हे क्षिती।तैसा नाना द्वंद्वी। घामेजेना।।(ज्ञाने. १६. ३४४.७५)जीवनात आपल्याला अनेक द्वंद्वांना सामोरे जावे लागते. मान, अपमान, गरिबी-श्रीमंती, निंदा-स्तुती, ऊन-पाऊस या स्थितीत चित्ताचे समत्व राखणे, आलेली स्थिती सहन करणे हे इथे अपेक्षित आहे. आयुष्यात येणारी द्वंद्वात्मक अवस्था बिनतक्रार सहन करणे म्हणजे तितिक्षा. केवळ सहन करणेच नव्हे तर ती सहन करीत असल्याचे भानही नसणे.तैसा जयाचिया ठायी।न साहणे काहीच नाही।आणि साहतु हेमेही। स्मरण नुरे।।कायिक, वाचिक, मानसिक दु:खे अप्रतिकारपूर्वक सहन करणे म्हणजे तितिक्षा, अशी शंकराचार्यांनी त्याची व्याख्या केली आहे.सहनं सर्व दु:खानां अप्रतिकारपूर्वकं चिंता विलापरहितं सा तितिक्षा निगद्यते!येणारी दु:खे न बोलावता येतात. कधी कधी ती दु:खे दूर करणे आपल्या हातात नसते. ती न घालवता जातातही. सुखाच्या क्षणांचेही तसेच आहे. प्रारब्ध कर्मानुसार सुखदु:खांच्या या घटनांचे चक्र चालू असते. प्रतिकूल अनुभवांना दूर सारणे किंवा सुखी क्षणांना ठेवून घेणे आपल्या हातातही नसते. त्याच्या चिंता वाहत बसणे, त्यात मिळालेले आयुष्य खर्ची घातल्याने जीवनाची यथार्थता शोधण्याचा, सत्य शोधण्याचा प्रयत्न कसा घडणार? मिळालेले जीवन कृतार्थ व्हावे, त्याचा हेतू लक्षात यावा. प्रत्येक क्षणाचा उपयोग सत्संग, सद्विचारांचे श्रवण, त्याचे चिंतन करीत मी कोण आहे; माझे स्वरूप काय आहे, याचा बोध करून घेणे यातच मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आहे. उन्हाळा आला की उन्हाचा त्रास होणार, हिवाळ्यात थंडीचा. प्रत्येक ऋतूत बदलणाऱ्या हवामानाचा बरा-वाईट परिणाम होणारच आहे. ज्येष्ठांनी विशेषत: हे लक्षात ठेवावे.