शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन - देशात वाघ वाढले; अधिवासाचे क्षेत्र कसे वाढविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:33 IST

सध्या जंगल वाढविणे दूरच, वेगवेगळ्या कारणांमुळे ते कमी होत आहे.

गजानन दिवाण 

देशात सोमवारी सर्वत्र व्याघ्र दिन साजरा केला जात असतानाच वाघांची संख्या वाढल्याची शुभवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिली. राष्ट्रीय व्याघ्र गणना २०१८ नुसार देशात २९६७ वाघांचा अधिवास आहे. भारतात २००६ मध्ये १४११ वाघ होते. २०१० मध्ये ते १७०६ झाले. २०१४ मध्ये ती संख्या २२२६ इतकी झाली. यात गेल्या चार वर्षांत ७१४ वाघांची (२० टक्के) भर पडली आहे. जगभरातील एकूण संख्येपैकी तब्बल ७० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. वाघांची संख्या वाढल्याचा आनंद आहेच. सोबत गेल्या काही वर्षांत वाघांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे, याचेही दु:ख आहे.

निसर्गसाखळीत वाघाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. खरे तर वाघामुळेच जंगल टिकून आहे. २०१४ मध्ये भारतात वाघांसाठी संरक्षित प्रकल्पांची संख्या ६९२ इतकी होती. ती २०१९ मध्ये ८६० पेक्षा अधिक झाली. याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. महाराष्टÑाचाच विचार केल्यास २००६ मध्ये आपल्याकडे केवळ १०३ वाघ होते. २०१० मध्ये ते १६८ वर पोहोचले. २०१४ ला १९० झालेली वाघांची संख्या २०१८ साली ३१२ वर पोहोचली आहे. आता वाढलेल्या या वाघांनी राहायचे कोठे? सध्याच्या स्थितीत उपलब्ध असलेले जंगल त्यांना पुरेसे आहे काय, याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तो न केल्यास आधीच वाढलेला मानव-वन्यजीव संघर्ष आणखी टोकाला जाण्याची भीती आहे. पुढे त्याचा परिणाम जंगलावर आणि एकूणच वन्यजीवांवर होणार आहे. त्यामुळे वाघांचे अधिवासक्षेत्र कसे वाढवायचे, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे.

सध्या जंगल वाढविणे दूरच, वेगवेगळ्या कारणांमुळे ते कमी होत आहे. अशा स्थितीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, सुनील लिमये यांनी सुचविलेला पर्याय विचार करण्यासारखा आहे. मोठे होत असलेल्या वाघांच्या नर / मादी पिल्लांना दुसरीकडे हलवून संबंधित क्षेत्रातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करता येऊ शकतो. यासाठी लिमये यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार, गडचिरोली जिल्ह्यात १०० चौरस कि.मी. परिसर वाघांचे संवर्धन करण्यासाठी उपयुक्त आहे. याच जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागात १३० चौ.कि.मी.पेक्षाही जास्त असलेला परिसर वाघांसाठी उपयुक्त आहे. नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुमारे ६५० चौ. कि.मी.वर पसरलेला आहे. हे जंगल कान्हा (मध्य प्रदेश) आणि ताडोबा (महाराष्टÑ) या व्याघ्र प्रकल्पांना जोडणारे आहे. त्यामुळे या ठिकाणीदेखील वाघ सोडले जाऊ शकतात. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा अभयारण्य ३२५ चौ.कि.मी.वर विस्तारले आहे. जवळच टिपेश्वर अभयारण्य आणि तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्प आहे. वाघांच्या संवर्धनासाठी हेदेखील योग्य ठिकाण आहे. पश्चिम महाराष्टÑातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प १४०० चौ.कि.मी.पेक्षाही जास्त क्षेत्रावर विस्तारला आहे. हा अधिवासही वाघांना उपयुक्त आहे. ही पाच क्षेत्रे मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे लिमये यांचे म्हणणे आहे. भारताशिवाय बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, थायलंड, व्हिएतनाम, उत्तर कोरिया आणि रशियामध्ये वाघ आढळतात. २०१० साली असलेली वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे ध्येय या सर्वच देशांनी उराशी बाळगले. आश्चर्य म्हणजे भारताने हे ध्येय २०१८ सालीच गाठले आहे. 

व्याघ्र संवर्धनासाठी भारताने केलेल्या नियोजनपूर्वक प्रयत्नाचे हे फलित म्हणावे लागेल. वाघांची ही वाढलेली संख्या आनंदासोबत अनेक आव्हान देणारी आहे. विविध माध्यमांतून जंगलांवर म्हणजे वन्यजीवांच्या अधिवासावर वाढलेले अतिक्रमण, त्यातून वन्यजीवांचा गावपरिसरात वाढलेला वावर यातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. वाढत्या शिकारी डोकेदुखी ठरत असतानाच वाढलेले हे वाघ आहे त्या जंगलात कसे राहणार? त्यांचा अंतर्गत संघर्ष वाढेलच, सोबत जंगलाशेजारी राहणाऱ्या माणसांनादेखील ते धोक्याचे ठरणारे आहे. त्यामुळे संरक्षित जंगल आणि त्याच्या बाजूचे जंगल वाचविणे व ते वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. विकासाच्या कोणत्याही किमतीत या जंगलावर कुºहाड चालविणे आम्हाला परवडणारे नाही. वाढीव वाघांची माहिती देत असताना पंतप्रधानांनी व्यक्त केलेली अपेक्षा फार महत्त्वाची आहे. ‘‘एक था टायगर’पासून सुरू झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’पर्यंत पोहोचला आहे. मात्र, हा प्रवास थांबता कामा नये. व्याघ्र संवर्धनाशी जोडलेल्या प्रयत्नांचा अधिक विस्तार व्हायला हवा, तसेच त्यांचा वेग अधिक वाढायला हवा.’’ त्यांची ही अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी शासनासोबतच आपल्या प्रत्येकाची आहे.( लेखक लोकमतच्या औरंगाबाद विभागात वृत्त उपसंपादक आहेत )

टॅग्स :TigerवाघNarendra Modiनरेंद्र मोदी