शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
2
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
3
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
5
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
6
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
7
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
8
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
9
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
10
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
11
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
12
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
13
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
14
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
15
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
16
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
17
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
18
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
19
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार

‘कम्युनिटी सर्विस’रुपी शिक्षेचा विचार व्हावा!

By रवी टाले | Updated: January 29, 2020 21:25 IST

किमान जामिनासाठी पात्र असलेल्या आरोपींना जामीन मंजूर करताना ‘कम्युनिटी सर्विस’ची अट घालण्याचा तर तातडीने विचार व्हायला हवा.

ठळक मुद्देआरोपींद्वारा संवर्धन होत असलेले हे छोटेखानी जंगल मुरैना जिल्ह्यातील देवरी पंचायत अंतर्गत आहे. आतापर्यंत आरोपींनी २०० वृक्षांची लागवड करून ते वाढविले आहेत. वृक्षांचे संवर्धन व्यवस्थित करत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कल्पवृक्ष सेवा समिती आणि पोलिसांची आहे.

मध्य प्रदेशमधील मुरैना शहरातून एक खूप छान बातमी आली आहे. मुरैना जिल्ह्यात एक छोटेसे पण आगळेवेगळे जंगल आहे. त्या जंगलाचे वैशिष्ट्य हे आहे, की ते विविध गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळालेल्या आरोपींनी निर्माण केले आहे आणि ते आरोपीच त्या जंगलाचे संगोपन व संवर्धन करीत आहेत. आरोपींना ही उपरती कशी झाली, असा प्रश्न कुणाच्याही मनात डोकावणे स्वाभाविक आहे. त्या प्रश्नाचे उत्तर हे आहे, की त्या आरोपींना उपरती वगैरे काही झालेली नसून, जामीन रद्द होऊन तुरुंगाची वारी करावी लागू नये, यासाठी त्यांना वृक्ष संवर्धनाचा खटाटोप करावा लागत आहे.आरोपींद्वारा संवर्धन होत असलेले हे छोटेखानी जंगल मुरैना जिल्ह्यातील देवरी पंचायत अंतर्गत आहे. पितृवन असे नामकरण करण्यात आलेले ते जंगल निर्माण होण्यामागची प्रेरणा आहेत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद पाठक! न्या. पाठक यांच्यापुढे जामिनासाठीच्या जेवढ्या याचिका सुनावणीकरिता येतात, त्या याचिकांवर निर्णय देताना, आरोपीला जामीन द्यायचा असल्यास, ते आरोपीला वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्याची अट घालतात! वृक्ष लावणे, त्यांना जिवंत ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे आणि प्रत्येक महिन्यात वृक्षांची छायाचित्रे न्यायालयासमक्ष पेश करणे, अशी ती अट असते. आरोपीला जेवढे वृक्ष लावण्यास सांगितले त्यापैकी एकही जळल्यास आरोपीचा जामीन रद्द होतो. अशाप्रकारे आतापर्यंत आरोपींनी २०० वृक्षांची लागवड करून ते वाढविले आहेत. आरोपी वृक्षांचे संवर्धन व्यवस्थित करत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कल्पवृक्ष सेवा समिती आणि पोलिसांची आहे.आरोपी अथवा गुन्हेगारांना शिक्षा म्हणून अशा तºहेने ‘कम्युनिटी सर्विस’ करायला सांगण्याचा हा प्रकार आपल्या देशात नवा असला तरी, पाश्चात्य देशांमध्ये बराच रूढ आहे. आपल्या देशातही शीख समुदायात धार्मिक स्वरुपाच्या गुन्ह्यांसाठी गुरूद्वारात येणाऱ्या भाविकांची पादत्राणे स्वच्छ करणे, लंगरसाठी वापरली जाणारी भांडी स्वच्छ करणे अशा प्रकारच्या शिक्षा देण्याची प्रथा आहेच; पण न्यायपालिकेद्वारा अशा शिक्षा सुनावण्याचे प्रसंग विरळाच!अनेक गुन्हे किरकोळ स्वरुपाचे असतात आणि त्यामधील दोषी व्यक्तींनी ते हेतुपुरस्सर केलेलेही नसतात. कधी कधी अनावधानाने अथवा निष्काळजीपणामुळेही गुन्हे घडतात. त्यामधील दोषी व्यक्तींचा इतर कुणाला इजा अथवा नुकसान पोहचविण्याचा उद्देशही नसतो; पण कायद्याच्या नजरेत गुन्हा हा गुन्हाच असतो. अशा गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा म्हणून तुरुंगात पाठविल्याने निर्ढावलेल्या गुन्हेगारांची संगत लाभून त्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. विशेषत: कोवळ्या वयातील मुलांसंदर्भात हा धोका अधिक संभवतो. अशा वेळी त्यांना कायद्यांचे पालन करण्याच्या जबाबदारीची जाणीवही व्हावी आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोकाही संभवू नये, यासाठी ‘कम्युनिटी सर्विस’रुपी शिक्षेच्या पर्यायावर विचार व्हायला हवा.सध्याच्या घडीला कायद्यामध्ये ‘कम्युनिटी सर्विस’रुपी शिक्षेची तरतूद नसल्याने, एखाद्या वेळी एखाद्या धाडसी न्यायाधीश अथवा दंडाधिकाºयाने तसा निकाल दिलाच, तरी तो वरच्या न्यायालयाद्वारा रद्दबातल ठरविल्या जाण्याचीच दाट शक्यता असते. त्यामुळे सरकारने अशा शिक्षांना कायद्याचे अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा विचार करायला हवा. अर्थात तसे करताना त्या तरतुदीचा गैरवापर होणार नाही, याचीही काळजी घेणे अत्यावश्यक आहे; अन्यथा काही वर्षांपूर्वीच्या संजीव नंदा प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याचा धोका नाकारता येणार नाही. शिक्षा म्हणून ‘कम्युनिटी सर्विस’चा विचार होईल तेव्हा होईल; परंतु किमान जामिनासाठी पात्र असलेल्या आरोपींना जामीन मंजूर करताना ‘कम्युनिटी सर्विस’ची अट घालण्याचा तर तातडीने विचार व्हायला हवा. त्यातून किमान समाजाचे थोडेफार भले होईल आणि आधीच ओसंडून वाहत असलेल्या तुरुंगांवरील भारही थोडा हलका होण्यास मदत होईल! 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSocialसामाजिक