शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

...ते शल्य अडवाणी कधीच सांगणार नाहीत

By गजानन जानभोर | Published: October 05, 2017 3:22 AM

ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे?

ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना...आपल्या घरात कुणी मोठी माणसे आली तर आपण त्यांना बसायला जागा देतो. ते आदरातिथ्य असते. सार्वजनिक ठिकाणी असा मान दिला तर तो संस्काराचा भाग ठरतो. आजची मुले विनम्र नाहीत, अशी चर्चा एरवी घराघरांत सुरू असते. आपले सार्वजनिक जीवन संस्कारशून्य होत असल्याचे ते निदर्शक आहे.

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना परवा नागपुरात येताना विमानात आलेला अनुभव असाच दु:खद आणि वेदना देणारा आहे. म्हटले तर ही घटना तशी साधी. त्यात फार काय, असेही म्हणता येईल. पण, ज्येष्ठांचा मानसन्मान जेव्हा समाजाच्या चिंतेचा विषय ठरतो तेव्हा या घटनेची नोंद घेणे गरजेचे वाटते. दिल्लीहून नागपूरला येताना अडवाणी दुसºया रांगेत बसले होते. आयुष्यभर देशाची सेवा केलेला एक ज्येष्ठ नेता या ठिकाणी बसलेला पाहून काही संवेदनशील प्रवाशांना वाईट वाटले. त्यांनी पहिल्या रांगेतील एका तरुणाला अडवाणींना त्याच्या जागेवर बसू देण्याची विनंती केली. तो प्रवासी तरुण आनंदाने उठेल आणि अडवाणींना जागा देईल, असे त्यांना वाटले. पण, तो उठला नाही. ‘ही जागा मला मिळाली आहे, त्यामुळे दुस-याला बसू देण्याचा प्रश्नच नाही’, असे म्हणत त्याने तुच्छपणे नकार दिला. त्या तरुणाने अडवाणींना जागा दिलीच पाहिजे असा काही कायदा नाही. पण, ज्येष्ठांचा आपण सन्मान राखला पाहिजे ही आपल्या संस्काराची पहिली शिकवण असते. अडवाणी कोण आहेत हे आपण क्षणभर विसरून जाऊ. पण, आपल्या आजोबाच्या वयाच्या ज्येष्ठ नागरिकाचा असा अनादर करणे ही गोष्ट कोणत्या संस्कारात बसते?

अडवाणींऐवजी कुण्या सामान्य मंत्र्याच्याबाबतीत असे घडले असते तर त्या तरुणाच्या स्वातंत्र्याचे व ठामपणाचे स्वागतच केले असते. पण, वय, देशसेवा, तपस्या यातून जी माणसे श्रद्धेय ठरतात, त्यांच्या बाबतीत अशी विनम्रता दाखवणे ही कायद्याची मागणी नाही तर आपण संस्कारशील असण्याचे ते द्योतक ठरते. विनयशीलता हा मनुष्य धर्माचा भाग आहे. अशावेळी त्या तरुणाला असे का सुचले नाही? दोष केवळ त्या एकट्या तरुणाला देणेही योग्य नाही. विमानातील पहिल्या रांगेत इतरही प्रवासी होते. अडवाणींचा मोठेपणा न उमगण्याइतपत तेसुद्धा एवढ्या खुज्या मनाचे होते?

अडवाणी आज ९० वर्षांचे आहेत. या वयाची माणसे हळवी असतात, आपल्या आत्मसन्मानाबाबत संवेदनशील असतात. आपल्या घरातील वृद्ध आई-वडील एखाद्या कारणामुळे अस्वस्थ झाल्यानंतरची त्यांची अवस्था अशावेळी आपण अडवाणींना डोळयासमोर ठेवून समजून घेतली पाहिजे. या दु:खद प्रसंगाबद्दल अडवाणी कधीच बोलणार नाहीत. पण, त्यांच्या मनात हे शल्य अखेरच्या श्वासापर्यंत राहील. माणसाचे आयुष्य स्मरण-विस्मरणाच्या हिंदोळयावर असते तेव्हा अशा जखमा त्याच्या मनात खोलवर रुतून बसतात. ज्यांना बोट धरून संघसंस्कारात वाढवले, ती माणसे कधीचीच कृतघ्न झालीत, विमानातील तरुण तर अनोळखी! त्याच्या वागण्याचे मनाला एवढे काय वाटून घ्यायचे? अशी स्वत:चीच समजूत अडवाणींनी घातली असेल का? भारतीय राजकारणातील एका तपस्वी नेत्याच्या आयुष्याच्या संध्याकाळची ही वेदना आपल्या साºयांच्याच संस्कारातील डागाळलेपण सांगणारी आहे.

(gajanan.janbhor@lokmat.com)

टॅग्स :BJPभाजपाLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी