शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘हे’ येतील, ‘ते’ येतील.. की दोघेही लटकतील?

By यदू जोशी | Updated: October 18, 2024 10:49 IST

महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या महिन्यात कमालीचा जातीयवादी बनतो. या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे.

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत -

लोकसभा निवडणुकीत जातिपातीच्या जाणिवा तीव्र होत्या; विधानसभेलाही त्या तशाच दिसत आहेत. मराठा, ओबीसी, दलित, मुस्लीम आणि लहान-लहान जाती कोणासोबत जातील, यावर बरेच काही अवलंबून असेल. मनोज जरांगे- पाटील काय निर्णय घेतात, यावर निवडणूक इकडे किंवा तिकडे फिरेल. अपक्ष आणि लहान पक्षांचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीलाही मतदारसंघनिहाय बसेल; पण एकूण विचार केला तर जास्त फटका हा महाविकास आघाडीला बसेल. मतविभाजनाचा भाजपला फायदा होतो हा याआधीचाही अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत जिथे विभाजन झाले (अकोला, बुलढाणा, हातकणंगले आदी) तिथे महायुतीला फायदा झाला. लहान पक्ष वा अपक्षांना यावेळी कोणाची, कुठे, कशी रसद मिळते, ते कळेलच अन् त्यातून त्यांना कोणी उभे केले आहे, तेही समजेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी झाली आहे. बंडखोरीचे पेव सर्वत्र फुटेल असे दिसत आहे. जात समीकरणांचे ध्रुवीकरण कसेे होते हेही महत्त्वाचे आहे.  बरेच मतदारसंघ असे आहेत की, जिथे तीन ते चार जाती अत्यंत प्रभावी आहेत. त्यातील दोन तगड्या जाती ज्या पक्षाच्या वा उमेदवाराच्या मागे उभ्या राहतील त्यांनी उरलेल्या जातींमध्ये विभाजन घडवून आणले की मोहीम फत्ते होईल. महाराष्ट्र ४ वर्षे ११ महिने पुरोगामी असतो आणि निवडणुकीच्या शेवटच्या महिन्यात तो कमालीचा जातीयवादी  बनतो या अनुभवाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे.  कोणाचीही लाट नाही, ‘जिंकू की नाही’ याची धास्ती इकडेही आहे आणि तिकडेही आहे. दोन-चार हजारांच्या फरकाने अनेक ठिकाणचे फैसले होतील. पैशांचा पाऊस पडेल. बंडखोर आणि अपक्ष मुख्य पक्षांच्या जय-पराजयाचे पारडे वरखाली करतील. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या प्रचंड धक्क्यातून महायुती जरा सावरल्यासारखी दिसत आहे. ‘लाडक्या बहिणी’सह सरकारच्या लोकाभिमुख निर्णयांचा महायुतीला टेकू मिळाला आहे. तरीही ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी दिसते; पण अनेकांशी चर्चा करताना असा सूर दिसतो, की आजच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची विधानसभा ही त्रिशंकू असेल. सरकार स्थापन करायला काही आमदार दोघांनाही कमी पडतील. त्यामुळे निकालानंतर चार दिवसांत नवीन सरकार आले असे होणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार आणि राज्यपाल हे फॅक्टर त्यावेळी महायुतीच्या मदतीला धावून येऊ शकतात. लोकसभेत झालेल्या धुलाईनंतर त्रिशंकूच्या चर्चेपर्यंत महायुतीला आणून ठेवले हे शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे यश आहे. हेच येतील की तेच येतील असे आज सांगता येत नाही. महामंडळे अचानक कशी? आचारसंहितेच्या आधी लहान-लहान समाजांसाठी वीसएक महामंडळांची घोषणा अचानक झालेली नाही. निवडणूक समोर ठेवून निर्णय झाला असे नक्कीच म्हणता येईल. भाजपला साथ देणाऱ्या मायक्रो ओबीसींसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान-लहान ओबीसी, मागास जातीवार बैठका सागर बंगल्यावर घेतल्या. बहुतेक समाजांनी त्यांच्या कल्याणासाठी महामंडळाची मागणी केली आणि त्यानुसार महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. पाच जागा रिकाम्या का? विधानपरिषदेच्या १२ पैकी सातच जागा महायुती सरकारने भरल्या. पाच रिकाम्या का ठेवल्या असतील? टाॅपच्या काही नेत्यांना विचारले. या प्रश्नावर त्यांनी  एक तर उत्तर दिले नाही किंवा ‘तुम्हीच समजून  घ्या’ म्हणाले. महायुतीला सत्ता परत मिळविण्याची खात्री वाटते म्हणून जागा रिकाम्या ठेवल्या असतील हा एक तर्क झाला. त्यापेक्षा महत्त्वाचे हे की, आता पाच जागांच्या आड पंचवीस जणांना आश्वासन देता येते. ‘निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी झोकून द्या, मग तुमचा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी विचार करू’, असे गाजर दाखवता येते. पाच रिकाम्या जागांच्या आड २५ नेत्यांना सक्रिय ठेवण्याची ही रणीनीती दिसते. विधानसभेसाठी एखाद्या तगड्या इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी नाकारली तर ‘तू दोन महिने थांब, आपले सरकार आले की विधान परिषदेवर पाठवू’ असा  डोस पाजता येतो. मंत्रिमंडळात दोनचार जागा गाजर म्हणून रिकाम्या ठेवतात ना, बस! हा फॉर्म्युला तसाच आहे. चार ओळींची हेडलाइन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यागाची करून दिलेली आठवण, त्यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदारांचे दिलेले उदाहरण असे सगळे याच ठिकाणी गेल्या आठवड्यात लिहिले होते. तीन दिवसांनी चॅनेलवाल्यांनी त्याच्या हेडलाइन्स केल्या. मग दुसऱ्या दिवशी काही वृत्तपत्रांनी त्या फॉलो केल्या. ‘लोकमत’च्या लेखातील चार ओळींच्या अशा धमाकेदार बातम्या होतात हे बघून छान वाटले.    yadu.joshi@lokmat.com

 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती