शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

बँकांची स्थिती सुधारण्याबाबत गेल्या सहा वर्षात मोदींना आलेले अपयश नाकारता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 4:36 AM

कर्जावरील व्याज माफ केले तर सध्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही कमी करावे लागेल. याचा फटका सर्वच नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नारिकांना अधिक बसेल, त्यांचे मासिक उत्पन्न कमी होईल.

कोरोना विषाणू रोखताना आर्थिक आघाडीवर होणाऱ्या दमछाकीमुळे निर्णय घेणे मोदी सरकारला कठीण होत आहे. कर्ज-हफ्त्यांच्या परफेडीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला विचारलेला प्रश्न हे याचे ताजे उदाहरण, कोरोना टाळेबंदीनंतर अर्थव्यवहार थंडावले, उद्योजक व नागरिकांना यातून दिलासा मिळावा म्हणून बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीला केंद्र सरकारने प्रथम तीन महिन्यांची स्थगिती दिली. कोरोना न हटल्यामुळे ती सहा महिन्यांपर्यंत वाढवली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. ती आणखी वाढणार का, याबद्दल केंद्र सरकारने अजूनही निर्णय घेतलेला नाही.

कर्ज हफ्त्यांच्या परतफेडीला स्थगिती दिली गेली असली तरी या सहा महिन्याच्या काळातील व्याजाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हफ्ते भरले नसले तरी कर्जावरील व्याज भरलेच पाहिजे हे रिझर्व्ह बँकेने जून महिन्यातच स्पष्ट केले. जे कर्जदार व्याज भरणार नाहीत. त्यांच्या व्याजावर व्याज लावले जाईल असेही बँका सांगत आहेत. हफ्ते भरण्यास मुदतवाढ असूनही जर व्याज आकारले जाणार असेल तर दिलासा कसा, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे. हा मामला न्यायालयात गेला, केंद्र सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे असं निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जून महिन्यातच दिले होते मात्र केंद्राने चालढकल केली. यामुळे न्यायालय नाराज झाले आणि बुधवारी न्यायालयाने सरकारला खडेबोल ऐकविले.

रिझर्व्ह बँकेच्या आड दरी मारुन केंद्र सरकार लोकांच्या आर्थिक कोंडीबाबत उदासीनता दाखवीत आहे. असे न्यायालयाने म्हटलं असून सरकारने टाळेबंदी लागू केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे व बँकाच्या व्यवसायाला महत्त्व देऊन नागरिकांच्या हालअपेष्टांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे अशी टीप्पणी न्यायलयाने केली. आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली अनेक अधिकार हाती असताना सरकार निर्णय का घेत नाही, हा न्यायालयाचा मुख्य सवाल होता. सरकारच्या अनास्थेबद्दल न्यायालयाने व्यक्त केलेला संताप रास्त आहे. कोरोनामुळे सरकारची सर्व बाजूंनी कोंडी झाली असून त्यातून हमखास सुटका होईल असा मार्ग सरकारला अद्याप मिळालेला नाही. त्यातच स्वतंत्र बुद्धीच्या सल्लागारांचे सरकारला वावडे आहे. यामुळे केवळ नोकरशाहीवर विसंबून मोदी सरकारचा कारभार सुरु आहे.

मुळात देशातील सार्वजनिक बँकांची स्थिती ठीक नाही, अनुत्पादक कर्जे भरमसाट वाढली आहेत, बँकांची दीनवाणी स्थिती होण्यास २०११ पासून सुरुवात झाली असली आणि त्याला आधीचे काँग्रेस सरकारही जबाबदार असले तरी ही स्थिती सुधारण्यात गेल्या सहा वर्षात मोदींना आलेले अपयश नाकारता येत नाही. कर्ज हफ्त्यांच्या परतफेडीला स्थगिती दिल्यामुळे बँकांच्या ताळेबंदावर परिणाम होणार आहे. व्याज माफ केले तर बँकांची स्थिती आणखी वाईट होईल. हफ्ते फेडण्यास स्थगिती म्हणजे कर्जमाफी नव्हे असे रिझर्व्ह बँकेने पूर्वीच स्पष्ट केले आणि त्याला केंद्र सरकारचे अनुमोदनही आहे.

मात्र आता साथीचा फटका सर्वांनाच बसल्यामुळे लोकांच्या अडचणीचा विचार आधी करा. हिशेबवहीचा नको, असे सर्वोच्च न्यायालयाला सुचवायचे असावे. लोकांच्या अडचणीचा विचार करताना सरकारसमोर आणखी एक पेच आहे. टाळेबंदीमुळे नागरिक आणि उद्योजकांना आलेल्या अडचणींचा विचार करुन कर्जावरील व्याज माफ केले तर सध्या बँकांमध्ये असलेल्या ठेवींवर दिले जाणारे व्याजही कमी करावे लागेल. याचा फटका सर्वच नागरिकांना, विशेषत: ज्येष्ठ नारिकांना अधिक बसेल, त्यांचे मासिक उत्पन्न कमी होईल. कारण कर्जदारांकडून मिळणाऱ्या व्याजातून ठेवीदार व्याज दिले जाते. यातून एक मार्ग दिसतो. एकतर टाळेबंदीचा जोरदार फटका ज्या क्षेत्रांना बसला त्यांनाच फक्त व्याजदरातून सूट देणे, म्हणजेच सेक्टरनुसार धोरण आखणे आणि थकीत व्याजावरील व्याज आकारणे बंद करणे. यातही बँकांचा तोटा असला तरी त्याचे परिणाम कमी असतील. शिवाय सेक्टरनुसार व्याजमाफी देण्यास बरीच यातायात करावी लागेल. मात्र मुख्य बाब निर्णय घेण्याची आहे. मोदी सरकारच्या निर्णय क्षमतेवरच न्यायालयाने बोट ठेवले असल्याने सरकारला १ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावाच लागेल

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्थाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय