शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यात कायदा आहे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 03:38 IST

राज्यात पोलीस यंत्रणा, गुप्तचर विभाग, गृहमंत्रालय आणि सरकार यापैकी कशाचाही प्रभाव उरला नसल्याचे ताजे उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची स्थानिक निवडणुकीत उसळलेल्या हिंसाचारात झालेल्या हत्येचे आहे.

राज्यात पोलीस यंत्रणा, गुप्तचर विभाग, गृहमंत्रालय आणि सरकार यापैकी कशाचाही प्रभाव उरला नसल्याचे ताजे उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची स्थानिक निवडणुकीत उसळलेल्या हिंसाचारात झालेल्या हत्येचे आहे. या प्रकरणात भाजपच्या एका व राष्ट्रवादीच्या दुसऱ्या आमदाराला अटक झाली असून ते आता जामिनावर मोकळे झाले आहेत. ते दोघे एकमेकांचे सख्खे नातेवाईकही आहेत. नगर जिल्ह्यात याआधी घडलेल्या हिंसाकांडांनी त्या जिल्ह्याला थेट हिंसाचारक्षेत्राच्या पातळीवर नेऊन बसविले आहे. उसाच्या चरकात टाकून एका दलित तरुणाची झालेली हत्याही या जिल्ह्यातली. नगरसारखीच स्थिती नागपूर या राज्याच्या उपराजधानीचीही आहे. मुन्ना यादव या नावाचा अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेला एक गुंड गेली कित्येक महिने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतरही तो पोलिसांना सापडत नाही हे विशेष आहे. या प्रकरणातील गुंड व त्यांचा हिंसाचार एवढा क्षुद्र की त्याची फारशी दखल कुणी घेऊ नये. मात्र अशा प्रकरणातील पोलिसांच्या व सरकारच्या प्रभावशून्यतेची परिणती मोठ्या हत्याकांडात होत असते. समाजातील मान्यवरांच्या हत्याही मग समाजाच्या विस्मरणात जातात. शिवाय हा जगरहाटीचाच एक भाग असल्याची मानसिकता समाजात निर्माण होते. सडकछाप गुंड ज्या गोष्टी करतात त्या मग आमदार किंवा राज्यमंत्रिपदावर असलेली माणसेही करताना दिसतात. ती केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची अधोगती नसते, ती साºया समाजव्यवस्थेच्या घसरणीची लक्षणे असतात. यवतमाळ जिल्ह्यात कुख्यात गुंडाची टोळी तेथील सर्वसामान्य जनतेला छळते आहे, आणि एका मंत्र्याचा या टोळीला आश्रय आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते चक्क विधानसभेत करतात आणि या मंत्र्याचे नावही जाहीर करण्याचा दावा करतात पण या आरोपाची साधी चौकशी करण्याची तयारीही सरकार दाखवत नाही. राजकीय गुंडांना तेथे अभय मिळते तेथे दाभोळकर किंवा पानसरे यांच्यासारख्या विचारवंतांचे खून करणाºया संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांना सरकारचे भय कितीसे वाटणार? दिवसाढवळ्या आणि भररस्त्यावर हत्या होतात, त्यात राजकीय म्हणविणारे कार्यकर्ते सहभागी असतात, त्यांचे सरकारदरबारी चांगले वजन असते आणि तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात खुनाची सत्रे सुरू राहात असतील तर खुनी गुन्हेगारांचे सरकारातील माणसांशी निश्चितच लागेबांधे असणार अशी शंका लोकांना येत असते आणि तीत सामान्यपणे तथ्यही असते. मंत्री बेफिकीर असतात, त्यांच्या चर्यांवर या प्रकाराचा साधा परिणामही कधी दिसत नाही. राज्यातील फरार गुंडांची व विशेषत: खून आणि बलात्कारासारखे गुन्हे करून पसार झालेल्यांची जिल्हावार यादी आता एका आगळ्या श्वेतपत्रिकेच्या रूपाने प्रकाशित होणे गरजेचे आहे. मंत्री सुरक्षित असले आणि आमदारांच्या सोबत मशीनगनधारी पोलीस हिंडताना दिसले की लोक सुरक्षित होतात असे समजण्याचे कारण नाही. शिवसेनेची माणसे मारली गेली आणि भाजप व राष्ट्रवादीचे पुढारी पकडून सोडून दिले गेले ही घटना आणि तिच्याकडे पाहण्याची माध्यमांसकट सगळ्या राजकारण्यांची दृष्टीच अशावेळी वेंधळी आणि काहीएक न पाहणारी बनली आहे की काय असेच मग वाटू लागते. ज्या सरकारचे नेतृत्व असे बेफिकीर आणि जनतेच्या जीविताविषयी एवढे बेपर्वा असेल त्यातील जनतेची राखण मग ‘आंधळ्याच्या गायी, देव पाही’ अशी होत असते. शिवाय या अवस्थेचा शेवटही कुणाला सांगता येणारा नसतो. काँग्रेसची राजवट असतानाही तीत गुन्हेगारी होती. मात्र त्या गुन्हेगारीला राजकारणाचे उघड संरक्षण मिळत असल्याचे तेव्हा कधी दिसले नाही. आताची राजकीय संरक्षणातील गुन्हेगारी पाहिली की आपण राज्यात राहतो की अराजकात असाच प्रश्न आपल्यालाही पडतो.