शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

जगाला भारताचा ‘आधार’ वाटतो, ‘भीती’ नाही; कुशल मनुष्यबळ ही जगासाठी एक संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 11:14 IST

भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधांना २५ वर्षे झाल्याने पंतप्रधान मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त ‘लेस इकोस’ या फ्रेंच दैनिकाला त्यांनी दिलेली मुलाखत.

भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. त्यामुळे जागतिक पटलावर देशाची स्थिती कशी बदलेल?भारत ही हजारो वर्षे जुनी समृद्ध संस्कृती आहे. आज भारत जगातील सर्वात युवा राष्ट्र आहे. जगातील अनेक देश वृद्धत्वाकडे झुकत असताना येणाऱ्या दशकांमध्ये भारताचे युवा आणि कुशल मनुष्यबळ ही संपूर्ण जगासाठी एक संपत्ती असेल. हे कुशल मनुष्यबळ खुलेपणाने विचार करणारे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करणारे, नवीन तंत्रज्ञानाला आपलेसे करणारे आणि बदलत्या जगाशी जुळवून घेणारे आहे. आर्थिक मंदी, अन्न सुरक्षा, महागाई, सामाजिक क्लेश यामुळे जागतिक स्तरावर आलेले  मळभ पाहता मला भारतीयांमध्ये  एक नवी दुर्दम्य ऊर्जा, भविष्याबद्दल आशावाद आणि जगात आपले योग्य स्थान मिळवण्यासाठीची उत्सुकता दिसते. जग अशांतता आणि विखंडनाच्या उंबरठ्यावर असताना एकता, अखंडत्व, शांतता व समृद्धीसाठी भारत अपरिहार्य आहे, अशी भावना संपूर्ण जगाच्या मनात आहे. शांतता, सौहार्द्र आणि सहअस्तित्व यांची खोलवर रुजलेली मूल्ये, आमच्या चैतन्यदायी लोकशाहीची यशस्विता, भारतीय संस्कृतीची श्रीमंती, परंपरा आणि तत्त्वज्ञान, आंतरराष्ट्रीय कायदा आणि शांततेप्रती  बांधिलकी या गोष्टींमुळे जगाला भारताचा आधार वाटतो, हे मला फार महत्त्वाचे वाटते. 

‘ग्लोबल साउथ’चे नेतृत्व अपापत: भारताकडेच येते असे तुम्हाला वाटते का?भारताने कोणत्याही पदाचा अहंकार करू नये.  ‘ग्लोबल साउथ’ला बळकटी येण्यासाठी   सामूहिक शक्ती आणि सामूहिक नेतृत्वाची गरज आहे.  ग्लोबल साउथचे अधिकार फार पूर्वीपासून नाकारले गेले आहेत. जागतिक व्यासपीठांवर ग्लोबल साउथला समान आदर, समान अधिकार मिळाले  असते तर जग अधिक शक्तिशाली, मजबूत बनू शकले असते, हे खरेच आहे. या प्रांतात भारताचे स्थान इतके मजबूत आहे की, भारताच्या बळकट खांद्यावरून ग्लोबल साउथला उंच उडी मारता यावी. ग्लोबल साउथच्या वतीने  भारत ग्लोबल नॉर्थशी उत्तम संबंध निर्माण करू शकतो. त्या अर्थाने हा खांदा हा एक प्रकारचा पूल होऊ शकतो. 

२०४७ मधील भारताविषयी तुमचा दृष्टिकोन काय आहे? जागतिक संतुलनामध्ये भारताच्या योगदानाकडे तुम्ही कसे पाहता?२०४७ साली आमच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे होतील. तोवर भारत हे एक  विकसित राष्ट्र झालेले असावे, अशी आमची महत्त्वाकांक्षा आहे.  सर्व नागरिकांसाठी  शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संधी यांच्याशी संबंधित सर्व गरजांची पूर्तता करू शकणारा भारत एक क्रियाशील आणि समावेशक संघीय लोकशाही बनेल. सर्व नागरिकांना त्यांच्या अधिकारांची हमी मिळेल, देशातील त्यांच्या स्थानाबाबत ते आश्वस्त असतील आणि त्यांच्या भविष्याबाबत आशादायी असतील. इथे शाश्वत जीवनशैली, स्वच्छ नद्या, निळे आकाश, जैवविविधतेने सचेतन असलेली जंगले असतील. भारतीय अर्थव्यवस्था हे  संधींचे केंद्र, जागतिक वृद्धीचे इंजिन असेल आणि कौशल्य आणि गुणवत्ता हे त्याचे स्रोत असतील. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आधार असलेल्या आणि बहुपक्षवादाच्या नियमांनुसार चालणाऱ्या एका  अधिक संतुलित बहुध्रुवीय जगाच्या निर्मितीला आम्ही पाठबळ देऊ.   

पाश्चिमात्य मूल्यांना अजूनही सार्वत्रिक आयाम आहे, असे तुम्ही मानता का? जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील विचार प्रक्रिया आणि  तत्त्वज्ञान हे  त्या-त्या कालखंडात विशेष महत्त्वाचे होते. त्याच आधाराने आपण इथवर आलो आहोत. पश्चिम चांगली की पूर्व, हा विचार चांगला की तो; अशा दृष्टिकोनातून मी पाहत नाही. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आमचे वेद, सर्व बाजूंनी येणाऱ्या उदात्त विचारांचा स्वीकार करण्याची शिकवण देतात. आम्ही स्वतःला एका चौकटीत अडकवत नाही. जगामध्ये जे काही चांगले आहे, त्याचा स्वीकार आणि अंगीकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणूनच आमच्या ‘जी-२०’ परिषदेची संकल्पना आहे,  ‘वसुधैव कुटुंबकम!’ आम्ही ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ म्हटले आहे; पण एक तत्त्वज्ञान म्हटलेले नाही.

भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला यंदा २५ वर्षे होत आहेत. या दोन देशांमधील नातेसंबंधाचे वर्णन तुम्ही कसे कराल?भारत आणि फ्रान्स यांच्यातील भागीदारी राजकीय, संरक्षण, सुरक्षा, आर्थिक, मानव-केंद्री विकास आणि शाश्वतताविषयक सहकार्य अशा सर्वच क्षेत्रांना सामावून घेणारी व्यापक आणि सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. ज्यावेळी समान दृष्टिकोन आणि मूल्ये असलेले देश द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय व्यवस्थेत किंवा प्रादेशिक संस्थांतर्गत  एकत्र काम करतात, त्यावेळी ते कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम असतात. हिंद-प्रशांत क्षेत्रासह आमची भागीदारी कोणत्याही देशाच्या विरोधात किंवा कोणत्याही देशाच्या बळावर नाही. या प्रदेशातील आमच्या आर्थिक आणि संरक्षणविषयक हितसंबंधांचे रक्षण करणे, व्यापारी-प्रवासी वाहतूक आणि व्यापारासाठी दिशादर्शन सुनिश्चित करणे, या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय कायदा कायम राखणे, हाच आमचा उद्देश आहे. आम्ही इतर देशांसोबत त्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांना मुक्त सार्वभौमत्वाची निवड करण्यामध्ये मदत करण्यासाठी काम करत आहोत.  आमचे द्विपक्षीय संबंध दृढ, विश्वासार्ह आणि उत्तम आहेत. अत्यंत नकारात्मक परिस्थितीतही ते टिकून राहिले आणि सतत नव्या संधींच्या शोधात राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदेपालनाबाबत दोन्ही देश वचनबद्ध आहेत. जग बहुध्रुवीय असावे, यावर दोघांचेही एकमत आहे.

मुलाखत : निकोलस बर्रे आणि क्लेमेंच पेरुचे,नवी दिल्ली प्रतिनिधी, ‘लेस इकोस’

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत