शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

संतांनी ‘विचार’ दिला, आपण फक्त ‘पुतळे’ उभारले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 08:13 IST

आज प्रत्येकाच्या शैक्षणिक पदव्यांच्या भेंडोळ्या वाढताहेत, पण त्यातून व्यक्तिमत्व विकासापेक्षा अहंकार वाढत चालला आहे. आपण कुठून कुठे चाललो आहोत?...

- ज्ञानेश्वर रक्षक, नागपूर

भारतीय समाजात विवाह जुळवणीचा प्रवास फार मोठा असतो. आज तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात. दोघांनाही आपल्याला शोभेल, असे स्थळ हवे असते. मुलाला शासकीय नोकरी किंवा खासगी कंपनीत गडगंज पगाराची नोकरी असेल तर उत्तमच. दोघेही नोकरी करणारे असतील, तर दुधात साखर, पण आपले स्वभाव जुळताहेत की नाही, हे पाहण्यापेक्षा पत्रिका जुळते की नाही, यावर दोन्ही बाजूंनी भर दिला जातो. त्यासाठी अनेक व्रतं करण्यास सांगितली जातात. 

सध्या कोणत्याही लग्नात अशी व्रतवैकल्ये वाढीस लागलेली दिसतात. जसजसे आपण ‘शिक्षित’ होत चाललोय, तसतसे ‘विचार’ मागे पडत चाललेत की काय, असे वाटते. विकासाच्या वाटेवर जाण्यापेक्षा आपण स्वत:च आपले पाय मागे ओढतो आहोत, इतरांनाही तसे करायला भाग पाडतो आहोत. समाजाला योग्य वाटेवर नेण्यासाठी आपल्या संतांनी आजवर कठोर परिश्रम केले आहेत. त्यांचा विचार कालच्यापेक्षाही आज अधिक सुसंगत आणि गरजेचा वाटतो.

इव्हेंट मॅनेजमेंट, श्रीमंतीचा देखावा, मेकअपचा मुलामा, सुंदर चेहरे खराब करत मेकअप उतरला तर मुला-मुलींचे प्रेमही उतरताना दिसते. ‘मी जी मुलगी लग्नासाठी पाहिली, ती ही नाही’, इथपर्यंत मजल जात कोर्टाची पायरी चढली जाते. लग्नाच्या देखाव्यात पैशाचा चुराडा कर्जबाजारीपणा माथी मारून जातो. मनोरंजन आणि संस्कार यातील फरक संपुष्टात येत असल्यामुळे आज लग्न आणि काही दिवसात घटस्फोट... ही संस्कृती समाजात वाढताना दिसते आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात...‘‘कितीतरी मुली असती सुंदर परि हुंड्यासाठी राहती कुवार तैसाचि मुलांचा व्यवहार जातीत भासे कित्येक॥६॥ग्रा.अ. २१’’

आज प्रत्येकाच्या शैक्षणिक पदव्यांच्या भेंडोळ्या वाढल्या, पण त्यातून व्यक्तिमत्व विकासापेक्षा अहंकार वाढत चालला आहे. प्रेमाची भाषा बदलली आहे. लग्नानंतर काहीच दिवसात संसाराची घडी विस्कटताना दिसते. प्रेमातील आणाभाका सिनेमा-नाटकांपुरत्याच मर्यादित ठरतात. ज्योतिष, कुंडलीने ग्रह-तारे पाहून मुहूर्त काढून लग्नाच्या वेळा ठरवल्या जातात. लग्न जुळल्यावर शुभकार्य नर्विघ्नपणे पार पडावे म्हणून प्राण्यांचा बळी दिला जातो, लग्नाची तिथी मुहूर्त काढण्यासाठी भली मोठी दक्षिणा दिली जाते. आपण कुठून कुठे चाललो आहोत?...राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत लिहिले आहे...

‘‘काही मुलींना खपवू पाहती ध्यानी न घेता नीति-अनीतिऐसी लाचार केली स्थिती नाना रूढ्यांनी ॥७६॥ ग्रा.अ. २१’’ ‘‘ज्योतिषासी देऊन-घेऊनमनासारिखे काढविती गुण ।प्रसंगी नावही सांगती बदलून दंभ दारुन वाढला ॥ ७७॥ ग्रा.अ. २१’’ 

या साऱ्या गोष्टी आज शिकलेल्या कुटुंबात मोठ्या प्रमाणात दिसतात. संत, महात्म्यांनी समाजासाठी खस्ता खाल्ल्या, पण आपण त्यांचे फक्त पुतळे उभारले. त्यांची शिकवण, त्यांचे विचार आपण कधी अंगिकारणार आहोत?

टॅग्स :Educationशिक्षण