शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सिंग इज किंग! मोदी सरकारला उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 05:42 IST

मोजके बोलावे; पण नेटके बोलावे, तसे डॉ. सिंग यांना देशातील जनतेसमोर भूमिका मांडली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांना ‘मौनमोहन सिंग’ म्हणून हिणविण्यात आले होते. सलग दहा वर्षे आघाडीचे सरकार चालविताना डॉ. सिंग यांनी पंतप्रधानपद सांभाळले होते. त्यांनीच अर्थमंत्रिपदी असताना आर्थिक सुधारणा सुरू केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या परिणामांचा आणि अपेक्षित यशाचादेखील अंदाज होता. परिणामी २००८ मधील महामंदीने बलाढ्य देश आर्थिक अडचणीत आलेले असतानाही भारताने त्या संकटावर सहज मात करून विकासाचा अपेक्षित दर कायम ठेवला होता. डॉ. सिंग यांना परखड किंवा तडाखेबंद भाषण करण्याची सवय नाही. तो त्यांचा स्वभावही नाही. आरडाओरडा तर त्यांनी कधी केलाच नाही. राजकीय नेत्यांकडे असावी लागते तशी धडाडी त्यांच्याकडे नसेल. मात्र, ते विचारांचे पक्के होते. भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असणारा समाज आणि अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निश्चित होते. त्याच वेळी सामाजिक सौहार्द टिकून राहील आणि समाजाचा एकोपा वाढीस लागेल याला त्यांनी महत्त्व दिले होते. या सर्व प्रश्नांवर राजकारण करण्यात त्यांना रस नव्हता.

भाजपची सत्ता आल्यानंतर प्रत्येक क्षणी राजकीय आडाखे बांधूनच निर्णय घेण्यात येऊ लागले. प्रतिमांच्या अस्मितांचे उदात्तीकरण करण्यात येऊ लागले. इतिहासातील काही चुका असल्या तरी त्यांवर मात करण्याऐवजी आपल्या चुका लपविण्यासाठी त्यांचा वापर करण्यात येऊ लागला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाची सतरा वर्षे सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची होती. त्यावेळची विकासाची साधने मर्यादित होती. भारत नवस्वतंत्र देश होता. असंख्य समस्यांचे जंजाळ आजूबाजूला होते. त्यातून धरणे उभारणे, मोठ्या पायाभूत उद्योगांची उभारणी करणे यांनाच विकास मंदिरे मानून त्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा कालखंड होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर शीतयुद्धाची गडद छाया होती. उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांंच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने बऱ्याच खंडांनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी जाहीर वक्तव्य केले आहे. एक समर्पक भूमिका मांडली आहे. विशेषत: पंजाबला समोर ठेवून पंजाबी भाषेत संबोधन करताना त्यांनी इतिहासाला दोष देऊन विद्यमान सरकार आपल्या चुकांच्या मागे लपू शकत नाही. त्यांना उत्तरदायित्व स्वीकारावेच लागेल, असे स्पष्टपणे बजावले आहे.

मोजके बोलावे; पण नेटके बोलावे, तसे डॉ. सिंग यांना देशातील जनतेसमोर भूमिका मांडली आहे. नवस्वतंत्र भारताला आकार देण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला तसाच आकार देण्याचा दुसरा प्रयत्न भारताने डॉ. मनमोहन सिंग यांच्या विचाराने १९९१ मध्ये ते अर्थमंत्रिपदावर असल्यावर सुरू झाला. त्या आर्थिक सुधारणांपासून देशातील एकाही राजकीय पक्षाला मागे जाता आले नाही. त्यात भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचादेखील समावेश आहे. पंडित नेहरू यांचा कालखंड जुना असल्याने नव्या पिढीला खोटेनाटे दाखले देण्याचे जोरदार भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असतात. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द ताजी आहे. एकविसाव्या शतकात त्याची फळे मिळू लागली. त्यावर बोलताच येऊ शकत नाही म्हणून त्यांना ‘मौनी मनमोहन’ म्हणून हिणविण्यात आले. त्याला त्यांनी छोटेखानी निवेदनाद्वारे सडेतोड उत्तर दिले आहेच; शिवाय भाजपच्या राजकीय भूमिकेचा समाचार घेतला आहे.

शेतकरी आंदोलनाची नोंद घेत पंजाब राज्याविषयी झालेल्या टीका-टिपणीचा संदर्भही त्यांनी दिला आहे. वास्तविक, काँग्रेसच्या नेत्यांकडून ही बाजू मांडली जात होती. त्याला डॉ. सिंग यांनी नैतिक अधिष्ठान दिले. स्वच्छ चारित्र्याचे आणि देशाप्रति प्रखर भक्ती असणारे डॉ. सिंग यांनी भूमिका मांडणे याला महत्त्व आहे. आपल्या कार्याची वर्तमानात नोंद घेताना टीका करण्यात येईल. मात्र भारतीय इतिहासाच्या पानात आपण उत्तम कार्य केल्याची नोंद होईल; असे एके ठिकाणी डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते ते खरे आहे. सरकार चालविताना अनेक संस्था आणि व्यक्ती सहभागी असतात. त्यांच्यावर सदासर्वकाळ नियंत्रण राहते किंवा ठेवता येतेच असे नाही. त्यांच्याकडून काही गैर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बँकिंग क्षेत्रातील २२ हजार कोटींचा घोटाळा हे त्याचे उदाहरण आहे. याचा अर्थ सर्व भ्रष्ट आहेत, असा होत नाही. हे त्यांना ठासून सांगायचे असणार आहे. अशा पक्षाला पुन:पुन्हा सत्ता देण्याची चूक करू नका, या त्यांच्या आवाहनास एक अर्थ आहे. यासाठीच त्यांना ‘सिंग इज किंग’ म्हणावे लागेल.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा