शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

स्थानिक स्वराज्यात एवढा गोंधळ की, यंत्रणाच कोलमडून पडायची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 07:48 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना संसर्गामुळे वर्ष-दीड वर्ष लांबल्या आहेत. त्या तातडीने घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयास द्यावा लागला, तेव्हा पावसाळ्याचे कारण देण्यात आले.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा इतका गोंधळ चालू आहे की, संपूर्ण राज्याची यंत्रणा कोलमडून पडायची वेळ आली आहे. काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने महापालिका, नगरपालिका ते जिल्हा परिषदा तसेच तालुका पंचायत समित्यांचे प्रभाग किंवा गट-गण बदलण्याचा निर्णय घेतला. लोकसंख्येच्या आधारे ते किती असावेत वगैरे ठरले. थेट नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडीचा निर्णय पूर्वीच बदलून टाकला होता. शिवसेनेत फूट पडली तसे आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. नवे सरकार येऊन सव्वा महिना होत आला. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे द्विसदस्यीय सरकार सत्तेवर आहे. दोघांचेच सरकार असल्याने असावे कदाचित, सुमारे पावणेआठशे महत्त्वाचे निर्णय जेमतेम ३६ दिवसांत घेऊन टाकले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एवढी मिनिटे मंत्रालयात बसलेसुद्धा नसतील ! महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय फिरवणे हेच राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय मानले जात आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोना संसर्गामुळे वर्ष-दीड वर्ष लांबल्या आहेत. त्या तातडीने घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयास द्यावा लागला, तेव्हा पावसाळ्याचे कारण देण्यात आले. अतिपावसाळा आणि कमी पावसाळा असे महाराष्ट्राचे दोन भाग करून निवडणुका घ्या, असा सर्वोच्च न्यायालयाने पर्याय दिला.  या संस्थांची सदस्य संख्या वाढविल्याने मतदारसंघ तयार करण्याची कसरत महसूल विभागाला करावी लागली. त्याप्रमाणे मतदार याद्या बनवाव्या लागल्या. तेवढ्यात ओबीसी आरक्षणाचा वाद आला. त्यावर न्यायालयानेच तोडगा काढला. ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर विनाआरक्षण निवडणुका घेण्याचे फर्मान निघाले, त्याप्रमाणे निवडणुका घेण्याचे ठरते ना ठरते तोवर दोन सदस्यीय राज्य मंत्रिमंडळाने महाविकास आघाडी सरकारने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतलेला निर्णय फिरविला. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत समित्यांची सदस्यसंख्या २०१७ च्या निवडणुकीत होती तेवढीच करण्यात आली. हा काय खेळखंडोबा आणि गोंधळ आहे? छत्तीस जिल्ह्यांच्या या महाराष्ट्रातील सरकारी  यंत्रणा या निवडणुकांची तयारी- फेरतयारी करण्यातच अडकवून ठेवायची आहे का?  निधी मिळत नाही म्हणून विकास होत नाही, अशी आरोळी देत थेट गुवाहाटीपर्यंत गेलेल्या लोकप्रतिनिधींना आता यंत्रणा ठप्प पडल्याने विकास ठप्प झाला आहे, असे कसे वाटत नाही..?

महाविकास आघाडी सरकारने राजीनामा देण्यापूर्वी अनेक निर्णय घेतले. त्यासंबंधीचे अध्यादेश काढले म्हणून आरडाओरडा सुरू होता. राजभवनानेदेखील लक्ष घालून सरकारने जाता-जाता कोणकोणते निर्णय घेतले, याची यादी मागविली होती. आता मंत्रिमंडळाची रचनाही न करता केवळ दोघांनी एकत्र बसून बारा कोटी जनतेच्या भवितव्याचे निर्णय घेतले  आहेत. यात  धोरणशून्यतेचे कोणतेही लक्षण घटनेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असणाऱ्यांना दिसत नसेल? महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम अनेक वेळा केलेले आहे. याच स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, जलयुक्त शिवार, राेजगार हमी योजना, बेघरांना घरकुल देणारी आवास योजना आदींची आदर्श अंमलबजावणी करून देशात डंका पिटवला आहे. असे योगदान देणाऱ्या राज्यातील सुमारे २८ हजार स्थानिक स्वराज्य संस्थांचे धोरण ठरविताना राज्यकर्ते किती धरसोड वृत्तीने वागतात, याची प्रचिती येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे ठाणे तसेच नागपूर महापालिकेत नगरसेवक-महापौर म्हणून काम केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणती भूमिका असते, याची त्यांना उत्तम जाण आहे, असे गृहीत तरी धरायला हरकत नाही. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशपातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सारखेपणा आणण्यासाठी तसेच त्यांच्या निवडणुका नियमित घेण्यासाठी पुढाकार घेऊन घटनादुरुस्ती केली.  या संस्थांच्या कारभाराशी राजकारण खेळणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी देशपातळीवरच निर्णय घेण्याची गरज आहे. अध्यक्षपदासाठी थेट निवडणुका हा पोरखेळही थांबविण्याची गरज आहे. यासाठी पुन्हा एकदा पंचायत राज व्यवस्थेची रचना, तिची कार्यपद्धती आणि जबाबदारी याचा फेरआढावा घेऊन राज्या-राज्यांतील हा राजकीय खेळखंडोबा बंद केला पाहिजे.

टॅग्स :ElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस