शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे ‘गुरुजी’ गेले! त्यांची उंची कोणालाही गाठता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 09:17 IST

Shibu Soren Death: यापुढेही आदिवासी समुदायात अनेक नेते होतील; पण गुरुजींची उंची कोणालाही गाठता येणार नाही. गुरुजी म्हणजे झारखंडी जनतेच्या हृदयावर कोरलेली एक अमिट खूण आहे!

केवळ गृहराज्य झारखंडमध्येच नव्हे, तर उभ्या देशात ‘गुरुजी’ म्हणून ख्यात असलेल्या शिबू सोरेन यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. झारखंडसाठी ते केवळ एक नेता नव्हते, तर संपूर्ण प्रदेशाच्या अस्मितेचे, संघर्षाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या इहलोकाच्या प्रवासाची अखेर ही एका राजकीय नेत्याच्या मृत्यूपेक्षा अधिक काही तरी आहे. तो झारखंडच्या युगपुरुषाच्या निघून जाण्याचा क्षण आहे. देश पारतंत्र्यात असताना, झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील नेमरा या छोट्याशा गावात जन्म झालेल्या शिबू सोरेन यांनी त्यांच्या बालपणापासूनच भोवतालच्या आदिवासी समाजातील अन्याय, शोषण आणि असमानतेचे चित्र पाहिले होते.पेशाने शिक्षक असलेल्या वडिलांची हत्या झाल्यानंतर त्यांचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि अभिजन वर्गाच्या विरोधात धनकटनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात धनुष्यबाण हाती घेतलेले आदिवासी युवक अभिजन वर्गातील लोकांच्या धानाच्या शेताभोवती कडे करत आणि धानाचे पीक कापून नेत. त्या आंदोलनातूनच सामाजिक अन्यायाविरोधात लढण्याची दिशा शिबू सोरेन यांना गवसली. त्यातूनच पुढे झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) या संघटनेचा उगम झाला. झामुमोच्या झेंड्याखाली त्यांनी केलेला संघर्षच पुढे झारखंड राज्यनिर्मितीच्या लढ्यात परावर्तित झाला. 

झारखंड हा नैसर्गिक साधनसंपत्तीने अत्यंत समृद्ध असा प्रदेश; पण राजकीय नेते आणि नोकरशहांना खुश ठेवत, खनन कंपन्यांनी दशकानुदशके प्रदेशाचे आणि भूमिपुत्र आदिवासींचे शोषण केले. शिबू सोरेन यांनी खनन कंपन्यांच्या शोषणाविरोधात आदिवासींना संघटित केले, शोषित जमातींना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहायला शिकवले. त्यांच्या नेतृत्वाखालील चळवळींनी आधी तत्कालीन अखंड बिहार आणि मग स्वतंत्र झारखंडमध्ये खळबळ माजवली. ‘भूमी आपली, हक्कही आपलाच’ हे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात बिंबवले. त्या बळावर त्यांनी झारखंडी जनतेच्या, विशेषतः आदिवासी समुदायाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळेच त्यांना तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवता आले. केंद्र सरकारमध्येही त्यांनी कोळसा खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली; परंतु त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांचेच खासगी सचिव शशिनाथ झा यांच्या १९९४ मधील हत्या प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षाही ठोठावली होती. पुढे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली, हा भाग वेगळा! त्याशिवाय गाजलेल्या ‘कॅश फॉर व्होट्स’ प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. या सर्व वादळांतूनही ते पुन्हा उभे होत गेले. त्यांच्या समर्थकांसाठी ते नेहमीच एक अजोड प्रेरणास्थान राहिले. 

स्वतंत्र झारखंड राज्यासाठीचा त्यांचा लढा राजकारणापुरताच मर्यादित नव्हता. त्यांनी भूमकाल आंदोलन, संथाली हक्कांची लढाई, आदिवासी सांस्कृतिक ओळखीचा आग्रह, यामधून झारखंडी जनतेच्या हक्कांचा आवाज बुलंद केला. झारखंड हा केवळ एक भूभाग नसून, एक संस्कृती, एक जीवनपद्धती आहे, हे त्यांनी ठसवले. आज झारखंडमधील लाखो आदिवासींच्या घरात शिबू सोरेन हे नाव श्रद्धेने घेतले जाते. त्यांच्या निधनामुळे झारखंडच नव्हे, तर संपूर्ण देश अशा प्रखर आदिवासी जननेत्याला मुकला आहे, ज्याने दिल्लीच्या दरबारात आदिवासींना आवाज मिळवून दिला! 

ते केवळ एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष नव्हते, तर संघर्षशील नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृती जपणे हे केवळ राजकीय कर्तव्य नाही, तर ती झारखंडी अस्मितेची खरी सेवा ठरेल. त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखे आहे. अन्यायाविरोधात झुकायचे नाही, अपयश आले तरी पुन्हा उभे राहायचे आणि आपल्या लोकांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहायचे, ही त्यांची शिकवण प्रत्येकाने अंगी बाणवली पाहिजे. शिबू सोरेन हे आता इतिहासाचा भाग झाले आहेत; पण त्यांच्या विचारांचा प्रकाश झारखंडच्या  पिढ्यान‌्पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या जाण्याने एक पर्व संपले; पण त्यांनी निर्माण केलेली चळवळ आजही जिवंत आहे आणि तीच त्यांची खरी विजयगाथा आहे! यापुढेही आदिवासी समुदायात अनेक नेते होतील; पण गुरुजींची उंची कोणालाही गाठता येणार नाही. गुरुजी म्हणजे झारखंडी जनतेच्या हृदयावर कोरलेली एक अमिट खूण आहे!

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण