शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

शिक्षकांनाच टीईटीची शिक्षा कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 6:19 AM

राज्यातील १३ फेब्रुवारी २0१३ नंतर सेवेत आलेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाल्यास त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश कालच महाराष्ट्र राज्य ...

राज्यातील १३ फेब्रुवारी २0१३ नंतर सेवेत आलेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाल्यास त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश कालच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना दिले आहेत. यात काही टीईटीची प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्र ारी आल्या असल्याचा उल्लेख आला आहे.

राज्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २0१0 मध्ये आल्यानंतरच खरे तर याबाबत अशा शिक्षक पात्रता परीक्षांचे आयोजन न करता त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी २0१३ मध्ये करण्यात आली. त्यापूर्वीच अनेक शाळांमध्ये महाराष्ट्र खासगी शाळा सेवशर्ती अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ च्या अधीन राहून शिक्षकांची रीतसर भरती केली. संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता दिल्या व शिक्षकांनी ३ वर्षांचा शिक्षणसेवक कालावधी पूर्णदेखील केला. तीन वर्षे समाधानकारक सेवा पूर्ण झाल्यानंतर अनेक शिक्षक सेवासातत्य मिळून सेवेत कायमदेखील झाले असून त्यांना टीईटी करणे बंधनकारक केल्याने अनेकांच्या सेवा संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता अशा शिक्षकांना टीईटीतून वगळणे आवश्यक आहे. कारण १३ फेब्रुवारी २0१३ पूर्वीच्या नियुक्त्या झाल्यावर अशा शिक्षकांना टीईटी लागू केल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असून शिक्षकांना मानसिक धक्का बसला आहे.

बारावीनंतर डीएड व पदवीनंतर बीएडला प्रवेश घेणाऱ्यांना शिक्षण घेत असतानाच अध्यापनाचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष शाळेत घ्यावे लागते. अध्यापनाचे संपूर्ण मानसशास्त्र समजून घ्यावे लागते. असे असताना पुन्हा नियुक्तीसाठी टीईटीचा खडतर प्रवास कशासाठी? इतर कुठल्याही क्षेत्रात अशा अटी नसल्याने शिक्षकांनाच टीईटी कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित होतो. जरी शिक्षणाच्या मोफत व सक्तीच्या अधिनियमात तरतूद असली तरी राज्याने त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

शिक्षकांना १३ फेब्रुवारी २0१३ च्या शासन निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शैक्षणिक वर्ष २0१३, २0१४, २0१५, २0१७ व २0१८ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षांचे आयोजन राज्यात केले होते. त्यात उत्तीर्ण होणारे परीक्षार्थी कमी संख्येने उत्तीर्ण झाले आहेत. सेवेत कायम झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने ३0 मार्च २0१९ पूर्वी टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश शिक्षकांवर अन्याय करणारे आहेत. यात ज्या शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या अधिनियमाचा आधार घेतला जात आहे त्यालाच हरताळ फासला जात आहे. जर शिक्षकांना टीईटी लागू करायची होती तर शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळी करायला हवी होती. शिक्षण सेवक मान्यता देताना सक्ती करायला हवी होती. मुळात शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमाला जसा कायद्याचा आधार आहे तसाच महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती अधिनियमाला देखील कायद्याचा आधार आहे व याचाच आधार घेऊन शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असल्याने त्यांना टीईटी सक्तीची कशी करता येईल? त्यांच्या सेवा संपुष्टात कशा येतील? उद्या न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास टीईटी टिकेल काय, असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करून शिक्षकांना टीईटीमधून वगळावे.- प्रा. अनिल बोरनारे । भाजपा शिक्षक सेल संयोजक

टॅग्स :Teacherशिक्षक