शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शिक्षक आमदारांची उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 01:10 IST

शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच उपराजधानीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शिक्षणक्षेत्राला सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत.

शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच उपराजधानीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे शिक्षणक्षेत्राला सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. एके काळी विधान परिषद गाजविलेले व सद्यस्थितीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा खात्याचा कारभार सांभाळणारे नितीन गडकरी यांनी अधिवेशन काळातच शिक्षक आमदारांच्या उदासीनतेवर बोट ठेवले आहे. रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात त्यांनी शिक्षक आमदार ठराविक चौकटीतच राहून काम करतात व गुणवत्तेबाबत कुणीही शब्द काढत नाही, असा चिमटाच उपस्थित शिक्षक आमदारांना काढला. गडकरी यांनी केलेले हे वक्तव्य त्यांच्या अनुभवातूनच आले हे निश्चित. विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदारांकडून शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्दे उपस्थित करण्यात येतात. मात्र त्यातील बहुतांश मुद्दे हे शिक्षकांची वेतनवाढ, विनाअनुदानित महाविद्यालये, बदल्यांमधील घोळ याच्याशीच संबंधित असतात. एका ठराविक चौकटीबाहेर येऊन शिक्षणक्षेत्रातील गुणवत्तेबाबत बोलताना शिक्षक आमदार फारसे दिसत नाही, हे वास्तव आहे. मुळात गडकरी यांनी मांडलेल्या या गोष्टीवर गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शिक्षणक्षेत्राचे व्यावसायिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासकीय शिक्षणसंस्थांमध्ये सुविधांचा अभाव दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शासकीय शाळा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या शाळा, आश्रमशाळा येथे तर पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येते. अनेक ठिकाणी तर अक्षरश: कोंडवाडा झालेला दिसतो. मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत आहे व त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढते आहे. रात्रकालीन शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ आहे. दोन वर्षांपासून तर शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळालेले नाही. गरीब विद्यार्थी शाळेमध्ये फाटके कपडे घालून येतात व तरीदेखील प्रशासनातील अधिकाºयांच्याहृदयाला पाझर फुटत नाही. शहरी भागातदेखील शिक्षणाच्या नावाखाली पैशांचा तमाशा सुरू आहे. या शाळांच्या प्रवेशशुल्कावर कुणाचेही नियंत्रण नाही. नामांकित शाळा, कोचिंग क्लासेसवाल्यांची मनमानी सामान्य जनतेला दिसते. मग या शिक्षक आमदारांना हे वास्तव का दिसत नाही हा कळीचा मुद्दा आहे. शिक्षकांचे वेतन, विनाअनुदानित शाळांचे मुद्दे महत्त्वाचे आहेतच. मात्र आपली ‘व्होटबँक’ वाचविण्याच्या नादात आमदारांनी शिक्षणसम्राटांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना वाचा न फोडणे हा शिक्षणक्षेत्राशीच अन्याय ठरतो. ‘केजी’पासून ते ‘पीजी’पर्यंत गुणवत्तावाढीची आवश्यकता आहे व विधानमंडळाच्या माध्यमातून शिक्षक आमदारांनी यासंदर्भात आग्रह धरला तर निश्चितच शिक्षणाचे चित्र बदलू शकते. ज्याप्रमाणे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी या आमदारांची एकजूट होते, त्याचप्रमाणे शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करून गुणवत्तावाढीसाठीदेखील आमदारांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणTeacherशिक्षकMLAआमदार