शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातला ‘सुकामेवा’ रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 04:34 IST

प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल.

 - हरीष गुप्ता(राष्ट्रीय संपादक, लोकमत समूह)अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाकडे दिल्लीतील सत्ता वर्तुळात बारकाईने लक्ष ठेवले जात असून, ‘सीबीआय’ व ‘ईडी’ ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळत आहेत त्याने या वर्तुळात कमालीची नाराजी आहे. या दोन्हीही केंद्रीय तपासी यंत्रणा अजूनही अंधारात चाचपडत आहेत. प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल.पण ‘सीबीआय’ने एखाद्या निरपराध व्यक्तीला मुद्दाम एखाद्या प्रकरणात कधी गोवल्याने गेल्या ४० वर्षांच्या अनुभवावरून मला तरी आठवत नाही. ‘ईडी’ सध्या प्रकाशझोतात असली तरी तपास करून यशस्वी अभियोग चालविल्याचे त्यांचे रेकॉर्ड काही फारसे चांगले नाही. शेवटी आता थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असलेला ‘अंमली पदार्थविरोधी ब्युरो’ (एनसीबी) मैदानात उतरला आहे. या ब्युरोचे सध्याचे प्रमुख राकेश अस्थाना अमित शहा यांचे अत्यंत विश्वासू आहेत. सुशांत सिंहच्या प्रकरणात एखाद्या रोमांचकारी बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे व्यसनाधीनता, लैंगिक संबंध, पैशाचा खेळ व परदेश वाºया असा सर्व प्रकारचा मसाला आहे. तात्काळ अटक करण्याचे अनिर्बंध अधिकार ‘एनसीबी’ला आहेत.या प्रकरणात ‘सुकामेवा’ खरेदी करण्याच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांना लाखो रुपये दिल्याचे सुगावे चॅट््सच्या रूपाने उपलब्ध आहेत. शिवाय याला साथ द्यायला रिया आणि मंडळीही आहेत. ‘सीबीआय’ व ‘ईडी’ यांनी ‘आम्ही काही करू शकत नाही’, असे म्हणून हात झटकले की, ‘एनसीबी’ लगेच पुढे सरसावेल. किंवा ‘एनसीबी’ त्यांच्याकडचे डग्जचे प्रकरण तपासासाठी ‘सीबीआय’कडे सोपवेल, असे समजते.तसे झाले तर ‘सीबीआय’ सर्व मुख्य संशयिताना अटक करेल व त्याने देशाच्या ‘दुखºया मना’वर फुंकर घातली जाईल. अशा ड्रग्जच्या प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही व अपिलही करता येत नाही!काँग्रेसमधील संकटाचे ‘फॅमिली कनेक्शन’

काँग्रेसमधल्या अंतर्गत संकटाशी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा काय संबंध असू शकतो? गांधी व बच्चन कुटुंबांचे ३० वर्षांपूर्वीच बिनसले आहे; पण काँग्रेसमधील सध्याचे संकट अनाहूतपणे या माजी बॉलिवूड अभिनेत्रीमुळे उभे ठाकलेले असू शकते. गेल्या वर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या एका खासदाराने राज्यसभेत व्यक्तिगत चारित्र्यहनन होईल अशा प्रकारे राहुल गांधी यांच्यावर असंसदीय भाषेत टीका करायला सुरुवात केली. त्यावेळी जया बच्चन सभागृहात हजर होत्या. त्यांनी तो सदस्य वापरत असलेल्या भाषेला जोरदार आक्षेप घेतला. त्या उठून विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या आसनापर्यंत गेल्या व त्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. आझाद यांनी जया बच्चन यांच्या सांगण्याकडे बहुधा फारसे लक्ष दिले नाही. मग जया बच्चन यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून पीठासीन अधिकाºयांना त्या वक्त्याला थांबविणे भाग पाडले. दुसºया दिवशी सोनिया गांधींनी मुद्दाम भेटून जया बच्चन यांचे आभार मानले. पण त्याचबरोबर आझाद यांच्या बेफिकिरीवर सोनियाजी खूप नाराज झाल्या होत्या. काही महिन्यांनी मल्लिकार्जुन खारगे यांना अचानकपणे राज्यसभेवर निवडून आणले गेले. आझाद यांनाही पुन्हा उमेदवारी दिली गेली नाही. आझाद यांची विरोधी पक्षनेतेपदाची मुदत येत्या फेब्रुवारीत संपली की ते पद खारगे यांच्याकडे जाईल, असे समजते. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते होऊ हे आनंद शर्मा यांचे स्वप्नही धुळीला मिळाले आहे. आता गांधी घराण्याच्या नेतृत्वाविरुद्ध ज्या २३ काँग्रेस नेत्यांनी (जी-२३ क्लब) सोनियाजींना पत्र लिहिले त्यात आझाद व शर्मा हे दोघेही नाराज आत्मे आहेत. हे सर्व होण्यात जया बच्चन यांचा म्हटले तर थेट काहीच संबंध नाही. पण त्यांनी अनाहुतपणे सोनियाजींच्या दुखºया नसेवर बोट ठेवले व त्याची किंमत आझाद यांना मोजावी लागली. पुढच्या वर्षी ते खºया अर्थाने ‘आझाद’ होतील!भाजपची फेररचना बारगळली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा नाराज असण्याची अनेक कारणे आहेत. अध्यक्ष होऊन वर्ष झाले; पण त्यांना अजून हवे तसे पक्ष संघटनेत बदल करता आलेले नाहीत. राजस्थानमध्ये ‘बंडा’च्या माध्यमातून काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेणे त्यांना जमले नाही. राजस्थानचे प्रकरण थेट ते हाताळत नव्हते व अशा नाजूक गोष्टी शेवटी ‘नॉर्थ ब्लॉक’मध्ये बसलेली व्यक्ती काय करते यावरच बव्हंशी अवलंबून असतात. पक्षातील संघटनात्मक फेररचनेचाही मंत्रिमंडळात होणाºया फेरबदलांशी संबंध असतो. बहुधा मोदींनी आपल्या ६५ मंत्र्यांच्या टीमची फेररचना करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय केला नसावा. आजपासून ‘पितृपक्ष’ सुरू होईल व आणखी काही दिवसांनी संसदेचे पावसाळी अधिवेशनही सुरू होईल. प. बंगालमधील वजनदार नेते मुकुल रॉय, मध्य प्रदेशचे ‘सिंह’ ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव व जद (यू)मधील काही जण मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. पण त्यांनाही काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. राज्यसभेचे विद्यमान उपसभापती हरिवंश यांची याच पावसाळी अधिवेशनात पुन्हा त्या पदावर फेरनिवड होईल की बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत त्यांनाही थांबावे लागेल, हेही अद्याप नक्की नाही.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतcongressकाँग्रेसBJPभाजपा