शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
4
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
5
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
6
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
7
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
8
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
9
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
10
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
11
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
12
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
13
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
14
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
15
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
16
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
17
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
18
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
19
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
20
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

खुद्द सुधा मूर्ती जेव्हा भाजीचे ‘दुकान’ लावतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 3:43 AM

साधा सुती सलवार-कमीज घातलेल्या सुधाताई हसतमुखाने भाजी विकत आहेत.. असा एक फोटो गेले दोन दिवस समाजमाध्यमांमध्ये वेगाने ‘व्हायरल’ झाला.

- अपर्णा वेलणकर(फीचर एडिटर, लोकमत)

इन्फोसिस फाउण्डेशनच्या अध्यक्ष, ख्यातनाम लेखिका आणि भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत नाव असलेल्या सुधा मूर्ती रस्त्यावर ताज्या भाजीचे देखणे दुकान मांडून बसल्या आहेत.. साधा सुती सलवार-कमीज घातलेल्या सुधाताई हसतमुखाने भाजी विकत आहेत.. असा एक फोटो गेले दोन दिवस समाजमाध्यमांमध्ये वेगाने ‘व्हायरल’ झाला. मागोमाग जाणकारांनी केलेले ‘फॅक्ट चेक रिपोर्ट’सुद्धा आले. ते रिपोर्ट्स सांगतात, की हा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे आणि सुधाताई भेंडी-भोपळे-काकड्यांच्या गराड्यात दिसत असल्या तरी त्या भाजी विकायला बसलेल्या नसून बंगलोरमध्ये त्यांचे निवासस्थान असलेल्या जयानगर परिसरातल्या राघवेंद्र स्वामींच्या मठाबाहेर बसून त्या साधकांच्या भोजनासाठी आलेल्या भाज्यांची विगतवारी करत आहेत. कारण त्या ‘स्टोअर मॅनेजर’ म्हणून मठात ‘सेवा’ देत आहेत.

या मठात दरवर्षी तीन दिवसांचा ‘राघवेंद्र आराधना महोत्सव’ होतो. त्या महोत्सवात सेवा देण्यासाठी सुधा मूर्ती भल्या पहाटेच मंदिरात जातात. तिथे स्वच्छतागृहांच्या सफाईपासून साधकांच्या स्वयंपाकाची तयारी, भाज्या चिरणे, भांडी घासणे अशी सर्व प्रकारची कामे करतात आणि नऊच्या सुमारास पुन्हा आपल्या कार्यालयात परतून आपल्या नेहमीच्या कामाला लागतात. स्वत:च्या मना-स्वभावाला कुठल्याही प्रकारचा अहंभाव चिकटला असेल, तर तो गळून जावा म्हणून राघवेंद्र स्वामींच्या मठात सेवा देण्याचे काम आपण दरवर्षी करतो, असे सुधातार्इंनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितले असल्याचा दाखलाही कुणीतरी ट्विट केला. राघवेंद्र मठाच्या अधिकाऱ्यांनीही ‘फोटोत दिसतात त्या सुधा मूर्तीच असून, त्या मठासाठी स्टोअर मॅनेजरची जबाबदारी पार पाडताना भाज्यांची देखरेख करत आहेत’, असा निर्वाळा दिल्याचीही बातमी मागोमाग आली.

सध्या अत्र-तत्र-सर्वत्र सगळाच ‘सोशल-चिखल’ उडत असताना अचानक समोर आलेला हा निर्मळ फोटो एक सुखद दिलासा ठरला, हे मात्र खरेच ! सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इन्फोसिसच्या महत्त्वाच्या भागधारक. सध्याची त्यांची व्यक्तिगत संपत्तीच काही हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा तपशील उपलब्ध आहे... पण ही सुधा मूर्ती यांची खरी ओळख नव्हे ! १९९०च्या दशकात वेगाने उदयाला आलेल्या आणि कोणतीही पूर्वपुण्याई, वाडवडिलांचा सांपत्तिक/औद्योगिक वारसा नसताना केवळ स्वत:च्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी साम्राज्ये स्थापन करून यशवंत-कीर्तिवंत-धनवंत झालेल्या भारतीय मध्यमवर्गाचा अग्रणी चेहरा कोणता असे विचारले, तर त्याच्या उत्तरात ‘इन्फोसिस’चा समस्त परिवार येईलच. त्यातही अग्रभागी असेल ते अर्थातच मूर्ती दांपत्य!

प्रचंड धनसंचय म्हटला म्हणजे भारतात गृहीतच धरले गेलेले व्यक्तिगत डामडौलाचे, पेज-थ्री दर्जाच्या चैनचंगळीचे, अति-वैभवशाली जीवनशैलीचे, तामझाम आणि छुप्या मगरुरीचे निकष पहिल्यांदा उतरवून ठेवले ते टाटा कुटुंबाने ! अर्थात, टाटांसारखी मोजकी अभिजात कुटुंबे खानदानी रईस ! नारायण आणि सुधा मूर्ती हे दोघेही कनिष्ठ मध्यमवर्गीय. प्रियाराधनाच्या काळात दोघांसाठी दोन कॉफी आॅर्डर करणेही ज्यांना परवडत नसे असे जोडपे. त्यांनी इन्फोसिसचा पसारा मांडला तो प्रचंड वेगाने बदलत्या काळातली बौद्धिक आव्हाने अंगावर घेण्याची प्रचंड जिजीविषा अंगी होती म्हणून ! काळाने साथ दिली म्हणूनही ! त्यातून कंपनी उभी राहिली. त्या उलाढालीतून कधी कल्पनाही केली नव्हती असा पैसा आला!!

- पैसा आला, मागोमाग ‘स्थान’ आले, ‘जागतिक प्रतिष्ठा’ आली; पण यातले काहीही मूर्ती दांपत्याला ‘चिकटू’ शकले नाही, याचे कारण त्या दोघांनी जिवापाड जपलेली आणि कल्पनेपल्याड आर्थिक ऐपत बदलत गेली तरी सहजतेने कायम राखलेली जीवनमूल्ये! भारतातील नव-मध्यमवर्गाच्या यशाच्या कहाण्या पहिल्या नवलाईने सांगितल्या जात तेव्हा नारायण मूर्ती इन्फोसिसच्या कॅफेटेरियामध्ये लंच अवर सुरू असताना इतर कर्मचाऱ्यांच्या रांगेत कसे आपले ताट घेऊन शांतपणे उभे असतात, अब्जाधीश असूनही छोट्या जुन्याच घरात राहातात, त्यांच्या घरी नोकरचाकर नाहीत, सुधा मूर्ती वर्षातून दोनच साड्या कशा घेतात याचे वर्णन केले जात असे. नंतर सुधा मूर्ती यांनी अचानक आयुष्यात आलेल्या पैशाबरोबरचे आपले नाते आपण कसे विचारपूर्वक बांधत नेले याबाबत विस्ताराने लिहिलेही.

आपण मध्यमवर्गात वाढलो; पण आपली मुले समृद्धीत वाढत होती, त्या वाढीच्या वयात त्यांना श्रमाचे मूल्य समजावे, म्हणून आपल्याला कसे झगडावे लागले, याहीबद्दल सुधाताई सतत मोकळेपणाने बोलत असतात. पुढे ‘इन्फोसिस फाउण्डेशन’ स्थापन करून त्यांनी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा समाजोपयोगी कामांकडेच वळवला. हे जोडपे त्या अर्थाने जागतिकीकरणोत्तर भारताचे ‘कॉन्शस कीपर’ आहे असेच म्हटले पाहिजे. - पण दुर्दैव हे, की मूर्ती दांपत्यासारख्यांनी ‘निर्माण केलेल्या’ संपत्तीतला आपला वाटा उचलायला जीवतोड कष्ट केलेल्या भारतीय मध्यमवर्गाने त्यांची मूल्ये मात्र समाजमाध्यमात कौतुकाच्या पोस्टी पाडण्यापुरतीच वापरली ! नाहीतर घरात आलेल्या पैशाआधी मनात शिरलेली उपभोगाची हाव, मगरुरी आणि बेफिकीर अप्पलपोटेपणा हा भारतीय नवमध्यमवर्गाचा स्वभाव बनता ना ! फोटो जुना का असेना, भाजीच्या गराड्यात बसलेल्या सुधातार्इंच्या डोळ्यातले निखळ, निर्भर सुख आपण कुठे गमावले, हे शोधायचे तर हा हिशेब मांडावा लागेलच !

टॅग्स :Infosysइन्फोसिस