शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

र}ागिरी-सिंधुदुर्ग प्रश्नच प्रश्न

By admin | Updated: November 29, 2014 23:39 IST

रोजगारनिर्मिती होणा:या गौणखनिज उत्खननाबाबतची सरकारची तळय़ात-मळय़ात भूमिका, हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत.

गाळाने भरलेली बंदरे, अर्धवट राहिलेले पाटबंधारे प्रकल्प, अनेक वर्षाची मागणी असलेले वैद्यकीय महाविद्यालय आणि मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होणा:या गौणखनिज उत्खननाबाबतची सरकारची तळय़ात-मळय़ात भूमिका, हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. किमान आता या नव्या सरकारकडून तरी त्यावर निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.
परदेशी चलन मिळवून देऊ शकणारी अनेक मासेमारी बंदरे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. केवळ मासेमारीच नाही तर व्यापारी जलवाहतुकीसाठी सक्षम अशी बंदरे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. मात्र गाळ ही तेथील मुख्य समस्या आहे. वर्षानुवर्षे त्यावर चर्चाच होत आहे. दोन्ही जिल्ह्यांत वाळू उपसा करण्यासाठी सरकारने ड्रेझर दिला आहे. मात्र अजून तो तसाच पडून आहे. तो निरुपयोगीच आहे.
दोन्ही जिल्ह्यांत अनेक पाटबंधारे प्रकल्पांचे काम कूर्मगतीने होत आहे. काही ठिकाणी निधीची तर काही ठिकाणी पुनर्वसनाची समस्या मोठी आहे. पुनर्वसन झाल्याखेरीज प्रकल्प सुरू करणार नाही, अशा वल्गना अनेक नेत्यांनी केल्या आहेत; तरीही पुनर्वसनाच्या समस्येमुळे अनेक प्रकल्प अधांतरी लटकले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाची मागणीही गेली अनेक वर्षे तशीच पडून आहे. रायगड जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंधुदुर्गात होऊ घातलेले वैद्यकीय महाविद्यालय वगळले तर कोकणाची ही गरज अजून पूर्णत्वास गेलेली नाही. गेल्या दोन वर्षात गौणखनिज उत्खननाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्खनन बंदीमुळे हजारो लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार त्यात कोणतीही ठाम भूमिका घेत नाही, म्हणूनच हा प्रश्न रेंगाळत पडला आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीसाठीही सरकारी पातळीवरून पुढाकार घेणो अपेक्षित आहे. आंब्याची प्रतवारी, साठवणूक, निर्यतीसाठी आवश्यक प्रक्रियांची केंद्रे अशा अनेक गोष्टी कोकणातच होणो आवश्यक आहे. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. नव्या सरकारकडून या प्रश्नांचा विचार होईल, अशी आशा त्या त्या क्षेत्रतून व्यक्त 
होत आहे. (प्रतिनिधी)