शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

कहाणी दुधाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 1:04 AM

ऐन उन्हाळ्यात राज्यभर दुधाचा प्रश्न उद्भवला आहे. वास्तविक उन्हाळा म्हटला की दुधाची टंचाई. पण राज्यात अतिरिक्त दूध झाले आणि भाव कोसळले.

ऐन उन्हाळ्यात राज्यभर दुधाचा प्रश्न उद्भवला आहे. वास्तविक उन्हाळा म्हटला की दुधाची टंचाई. पण राज्यात अतिरिक्त दूध झाले आणि भाव कोसळले. त्यामुळे दूध उत्पादक पर्यायाने शेतकरीच पुन्हा अडचणीत आला. कापूस, मका, सोयाबीन पाठोपाठ हा एक फटका त्याला बसला. अतिरिक्त दूध झाल्याने बाजारपेठेच्या नियमानुसार मागणी कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सध्या १०८ लाख लिटर दूध उत्पादन होते. माणशी २४० मिली लिटर गरज लक्षात घेता लोकसंख्येचा विचार केला तर तीसएक लाख लिटर दूध अतिरिक्त झाले. पूर्वीही ते होते आणि या दुधाची भुकटी बनवून ती देश-परदेशात विकली जाते असे. भुकटीचे भाव जागतिक स्तरावर कोसळल्याने हे संकट उद्भवले आणि ते महाराष्ट्रापुरतेच आहे. या प्रश्नाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोनही अनास्थेचा आहे. दूध संघांनी शेतकऱ्यांना गाई दुधाला २७ रु. लिटर भाव द्यावा, असे पूर्वीच ठरले होते. आता या स्थितीत संघ २१ रु. भाव देत असल्याने दूध उत्पादकासाठी हा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला. कमी दराने दूध खरेदी करणाºया संघावर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला असला तरी ते तसे करू शकणार नाही. कारण हे सर्व संघ राजकारणी मंडळीचे आहेत. विरोधाभास म्हणजे दुधाचे भाव कोसळले पण दुग्धजन्य पदार्थ म्हणजे लोणी, तूप, चक्का, चीज या पदार्थाचे भाव पडले नाही. म्हणजे नुकसान दूध उत्पादकांचे होत आहेत. २१ रु. लिटर या दरात हा व्यवसाय करणे परवडणारे नाही. या संपूर्ण प्रश्नाच्या मुळाशी दराचे नियंत्रण आणि विपणन हे दोन प्रश्न आहेत. सरकारने दुधाचे हमी भाव ठरविले असले तरी खासगी संस्थांच्या दरावर सरकारचे नियंत्रण नाही. सरकारच्या वरळी, आरे या संस्था बंद आहेत. त्यामुळे एक टक्का दूध संकलन सरकार करते. तर ७० टक्के संकलन हे खासगी संस्थाचे व २९ टक्के दूध संघांचे असल्याने सरकारने कितीही हमी भाव ठरवला तरी ७० टक्के उत्पादकांना खासगी संस्थाशिवाय पर्याय नाही. एकादृष्टीने दुधाची बाजारपेठ सरकारच्या हातात नाही आणि दूध उत्पादकांच्या भल्यासाठी काही करण्याची तयारी सुद्धा नाही. दुधासाठी राज्याबाहेर बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न होत नाही. शेजारच्या गुजरातमधील अमूल देश-परदेशात पोहचले. त्यांनी दुधाची १८ उत्पादने निर्माण केली आपण, तूप, पनीर, श्रीखंडाच्या पुढे विचार करत नाही. गोकूळसारखे दूध संघ राज्याबाहेर बाजारपेठेचा शोध घेताना दिसतात पण सरकारी पातळीवर मात्र सामसूम आहे. शेजारच्या मध्य प्रदेशात दुधाच्या बाजारपेठेला वाव आहे. गोवा दुधासाठी दुसºयावर निर्भर आहे. तर सरकारने इतर राज्यात आपल्या दुधाची बाजारपेठ तयार करण्यासाठी प्रभावीपणे काम केले पाहिजे. कधी काळी आपल्याकडे दुधाची टंचाई होती; पण ‘आॅपरेशन फ्लडने’ ती स्थिती बदलली आणि आज अतिरिक्त उत्पादन झाले. इतर राज्याचा आपण बाजारपेठ म्हणून विचार केला पाहिजे, परंतु एकेकाळी प्रभावी असलेला ‘दूध महासंघ’ अडगळीत पडलेला दिसतो. एकीकडे अतिरिक्त उत्पादनामुळे शेतकºयांचे नुकसान होत असले तरी या कोसळलेल्या दराचा सामान्य ग्राहकाला कोणताही फायदा नाही. त्यांना आजही त्याच दराने दूध खरेदी करावे लागते. समजा आता शेतकºयांसाठी सरकारने दर वाढवून दिले तरी शेवटी त्याचा बोजा ग्राहकांवरच पडणार. असा हा दुधाचा व्यापार अव्यापारेषु बनला आहे. यावर सरकारच मार्ग काढू शकते.

टॅग्स :milkदूधagricultureशेतीFarmerशेतकरी