शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आपल्या देशात भांडवलदारांचेच राज्य कायम झाले आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 02:32 IST

अनिल अंबानीच्या घशात राफेल प्रकरणातील ४० हजार कोटींची दलाली घालून त्याला पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणारे मोदींचे सरकार आता सरकारी मालकीच्या उद्योगांना बुडवून पुन्हा खासगी उद्योगाला तारण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.

अनिल अंबानीच्या घशात राफेल प्रकरणातील ४० हजार कोटींची दलाली घालून त्याला पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणारे मोदींचे सरकार आता सरकारी मालकीच्या उद्योगांना बुडवून पुन्हा खासगी उद्योगाला तारण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. नरेश गोयल या सरकारदरबारी फार मोठी वट असलेल्या उद्योगपतींची जेट ही हवाई कंपनी आकाशात उडण्यापेक्षाही आता जमिनीवरच अधिक राहू लागली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात नागरी उड्डाणमंत्री असलेले प्रफुल्ल पटेल, त्याआधी वाजपेयींच्या सरकारातील प्रमोद महाजन आणि आताचे मंत्री सुरेश प्रभू या तिघांनीही ही कंपनी आकाशात ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यावर खरे तर सुरस कथा लिहिल्या जातील. हे मंत्री या कंपनीच्या विमानातून जगभर फिरून कसल्या मौजा करीत, याची वर्णने जाणकार सांगतात आणि ती या कंपनीच्या मालकांएवढीच या मंत्र्यांची व त्या कंपनीतील स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांची बदनामी करणारी असतात. या कंपनीवर आठ हजार कोटींचे कर्ज आहे आणि तिची स्थिती कर्मचारी व अधिकारी यांना पगार न देण्याएवढी खालावली आहे.

ज्या काळात ती सुरू झाली त्या काळातला तिचा थाट व प्रचार एवढा पराकोटीचा होता, की ती जणू इंग्लंड-अमेरिकेच्या व अमिरातींच्या विमान कंपन्यांनाही काही काळातच मागे टाकील. परंतु अफाट खर्च, सरकारची मर्जी राखण्यासाठी दिले जाणारे श्रीमंत नजराणे आणि त्यांना फुकट पुरवायच्या सेवा यापायी तिचे दिवाळे निघाले. आता या कंपनीला वेगवेगळ्या बँकांकडून कर्जे मिळवून देण्यासाठी, भागीदार जमविण्यासाठी व तिला कर्जाचे हप्ते वाढवून देण्यासाठी सरकारमधील अनेक मंत्री कामाला लागले आहेत. वास्तविक पाहता याच काळात एअर इंडिया ही सरकारी मालकीची कंपनी ५० हजार कोटींच्या कर्जात बुडालेली आहे. पण घरची म्हातारी मेली, तरी तिचा शोक कुणाला नाही. बाहेरची बाहुली अडचणीत आली की तिच्यासाठी मात्र साऱ्यांचे जीव कासावीस!

राहुल गांधी म्हणतात तसे हे सरकार खरोखरीच गरिबांची चिंता करीत नाही. प्रत्यक्ष सरकारी यंत्रणांची सुस्थिती पाहत नाही. तिला अंबानी दिसतात, ती अदानींना विमानतळांचे ठेके देते, मल्ल्याची कंपनी बुडाली तरी त्याची बाकीची मालमत्ता कायम राहील याची सोय पाहते, नीरव मोदीला भारतात आणण्याची नाटके करते. पण ते या कंपनीच्या अध्यक्षांनी केलेल्या उधळपट्टीची व सरकारमधील वरिष्ठांवर केलेल्या ऐषआरामी खर्चाची तपासणी करीत नाही. श्रीमंतांची व धनवंतांची चिंता आणि गरिबांबाबत उदासीनता हीच या सरकारची ओळख असावी, असे दाखवणारे हे चित्र आहे. खरे तर या गोयलांच्या विमानातून किती व कोणत्या मंत्र्यांनी सहकुटुंब विदेशवाºया केल्या, त्यांच्यासोबत घरचे व बाहेरचे कोण होते याचीही यानिमित्ताने एकवार चौकशी व्हावी. त्यातून आपले वजनदार लोकप्रतिनिधी व तेवढेच वजनदार उद्योगपती यांच्या नात्यांचे खरे स्वरूप स्पष्ट होईल. कारभारातील पारदर्शकता समोर येईल.

देशातील किती पुढाऱ्यांनी विजय मल्ल्याच्या हजारो एकरांवर उभ्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील फार्म हाउसवर मेजवान्या झोडल्या? किती मंत्र्यांनी गोयलांच्या विमानांचा खासगीच नव्हे तर गैरवापरही केला? आणि या साºया व्यवहारात डॉ. सिंग यांच्या सरकारांपासून मोदींच्या सरकारापर्यंतचे किती मंत्री व पुढारी सगळे पक्षभेद विसरून सहभागी झाले, याचा अभ्यासही आपल्या राजकारणातील ‘खासगी’ प्रकरणांवरही बराच प्रकाश टाकू शकेल. पण लहानांचे सारे रस्त्यावर येते, त्यांचे धिंडवडे काढले जातात, बँका त्यांच्यामागे तगादे लावतात, मग शेतकरी आत्महत्या करतात आणि सामान्यजन लहान-सहान अडचणींसाठी सडकेवर येतात. या बड्यांना सांभाळायला मात्र बँका व सरकारच पुढे होते, तेव्हा त्याचा समाजावर कसा व केवढा विपरीत परिणाम होत असेल याची चिंता किमान लोकशाहीत किंवा लोकशाहीचा गवगवा करण्याच्या काळात तरी केली जावी की नाही? की आता आपल्या देशात भांडवलदारांचेच वर्चस्व व राज्य कायम झाले आहे?

टॅग्स :MONEYपैसा