शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

आपल्या देशात भांडवलदारांचेच राज्य कायम झाले आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 02:32 IST

अनिल अंबानीच्या घशात राफेल प्रकरणातील ४० हजार कोटींची दलाली घालून त्याला पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणारे मोदींचे सरकार आता सरकारी मालकीच्या उद्योगांना बुडवून पुन्हा खासगी उद्योगाला तारण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.

अनिल अंबानीच्या घशात राफेल प्रकरणातील ४० हजार कोटींची दलाली घालून त्याला पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न करणारे मोदींचे सरकार आता सरकारी मालकीच्या उद्योगांना बुडवून पुन्हा खासगी उद्योगाला तारण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. नरेश गोयल या सरकारदरबारी फार मोठी वट असलेल्या उद्योगपतींची जेट ही हवाई कंपनी आकाशात उडण्यापेक्षाही आता जमिनीवरच अधिक राहू लागली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात नागरी उड्डाणमंत्री असलेले प्रफुल्ल पटेल, त्याआधी वाजपेयींच्या सरकारातील प्रमोद महाजन आणि आताचे मंत्री सुरेश प्रभू या तिघांनीही ही कंपनी आकाशात ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यावर खरे तर सुरस कथा लिहिल्या जातील. हे मंत्री या कंपनीच्या विमानातून जगभर फिरून कसल्या मौजा करीत, याची वर्णने जाणकार सांगतात आणि ती या कंपनीच्या मालकांएवढीच या मंत्र्यांची व त्या कंपनीतील स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यांची बदनामी करणारी असतात. या कंपनीवर आठ हजार कोटींचे कर्ज आहे आणि तिची स्थिती कर्मचारी व अधिकारी यांना पगार न देण्याएवढी खालावली आहे.

ज्या काळात ती सुरू झाली त्या काळातला तिचा थाट व प्रचार एवढा पराकोटीचा होता, की ती जणू इंग्लंड-अमेरिकेच्या व अमिरातींच्या विमान कंपन्यांनाही काही काळातच मागे टाकील. परंतु अफाट खर्च, सरकारची मर्जी राखण्यासाठी दिले जाणारे श्रीमंत नजराणे आणि त्यांना फुकट पुरवायच्या सेवा यापायी तिचे दिवाळे निघाले. आता या कंपनीला वेगवेगळ्या बँकांकडून कर्जे मिळवून देण्यासाठी, भागीदार जमविण्यासाठी व तिला कर्जाचे हप्ते वाढवून देण्यासाठी सरकारमधील अनेक मंत्री कामाला लागले आहेत. वास्तविक पाहता याच काळात एअर इंडिया ही सरकारी मालकीची कंपनी ५० हजार कोटींच्या कर्जात बुडालेली आहे. पण घरची म्हातारी मेली, तरी तिचा शोक कुणाला नाही. बाहेरची बाहुली अडचणीत आली की तिच्यासाठी मात्र साऱ्यांचे जीव कासावीस!

राहुल गांधी म्हणतात तसे हे सरकार खरोखरीच गरिबांची चिंता करीत नाही. प्रत्यक्ष सरकारी यंत्रणांची सुस्थिती पाहत नाही. तिला अंबानी दिसतात, ती अदानींना विमानतळांचे ठेके देते, मल्ल्याची कंपनी बुडाली तरी त्याची बाकीची मालमत्ता कायम राहील याची सोय पाहते, नीरव मोदीला भारतात आणण्याची नाटके करते. पण ते या कंपनीच्या अध्यक्षांनी केलेल्या उधळपट्टीची व सरकारमधील वरिष्ठांवर केलेल्या ऐषआरामी खर्चाची तपासणी करीत नाही. श्रीमंतांची व धनवंतांची चिंता आणि गरिबांबाबत उदासीनता हीच या सरकारची ओळख असावी, असे दाखवणारे हे चित्र आहे. खरे तर या गोयलांच्या विमानातून किती व कोणत्या मंत्र्यांनी सहकुटुंब विदेशवाºया केल्या, त्यांच्यासोबत घरचे व बाहेरचे कोण होते याचीही यानिमित्ताने एकवार चौकशी व्हावी. त्यातून आपले वजनदार लोकप्रतिनिधी व तेवढेच वजनदार उद्योगपती यांच्या नात्यांचे खरे स्वरूप स्पष्ट होईल. कारभारातील पारदर्शकता समोर येईल.

देशातील किती पुढाऱ्यांनी विजय मल्ल्याच्या हजारो एकरांवर उभ्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील फार्म हाउसवर मेजवान्या झोडल्या? किती मंत्र्यांनी गोयलांच्या विमानांचा खासगीच नव्हे तर गैरवापरही केला? आणि या साºया व्यवहारात डॉ. सिंग यांच्या सरकारांपासून मोदींच्या सरकारापर्यंतचे किती मंत्री व पुढारी सगळे पक्षभेद विसरून सहभागी झाले, याचा अभ्यासही आपल्या राजकारणातील ‘खासगी’ प्रकरणांवरही बराच प्रकाश टाकू शकेल. पण लहानांचे सारे रस्त्यावर येते, त्यांचे धिंडवडे काढले जातात, बँका त्यांच्यामागे तगादे लावतात, मग शेतकरी आत्महत्या करतात आणि सामान्यजन लहान-सहान अडचणींसाठी सडकेवर येतात. या बड्यांना सांभाळायला मात्र बँका व सरकारच पुढे होते, तेव्हा त्याचा समाजावर कसा व केवढा विपरीत परिणाम होत असेल याची चिंता किमान लोकशाहीत किंवा लोकशाहीचा गवगवा करण्याच्या काळात तरी केली जावी की नाही? की आता आपल्या देशात भांडवलदारांचेच वर्चस्व व राज्य कायम झाले आहे?

टॅग्स :MONEYपैसा