शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

SSC Result: दहावीच्या निकालाकडून मुलांच्या भविष्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:10 IST

दहावी हा शालेय शिक्षणातील पहिला महत्त्वाचा टप्पा...

- अनिल गुंजाळ

''हात हातात घेऊनी दहा हिरे, जरा आहा आरशाकडे,

अकरावा दिसेल कोहिनूर, जरा पाहा स्वत:कडे ''

मार्च-एप्रिल २०२२ मधील माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) म्हणजे शालेय शिक्षणातील पहिला टप्पा होय. यावर्षी सुमारे २३ हजार शाळांमधील १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून, एकूण ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी खूप आहे. परंतु, मुलांना मिळालेले गुण कमी आहेत. पुढील काही दिवसांत दहावीचा निकाल लागेल. या निकालाची पालक विद्यार्थी उत्सुकतेने आनंदाने, तर काहीशा तणावात वाट पाहात आहेत. दहावीची परीक्षा म्हणजे सर्वस्व नसून, मुलांमधील जन्मजात गुण, दहावीला मिळालेले टक्के याचा विचार करून मुलांचे पुढील भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी पालक, शिक्षक, समुपदेशक या सर्वांनी विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

दहावीची परीक्षा ६०० गुणांची आहे. मुलांचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह अर्थात पाच विषयांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार करून त्यांची निकालाची टक्केवारी जाहीर केली जाते. दहावीचा ऑनलाईन निकाल मिळाल्यानंतर पालकांनी मुलांवर चिडू नये, एवढेच कमी का जास्त का नाही, अभ्यास का केला नाही, असे प्रश्न विचारू नये. निकालाचा सकारात्मकतेने स्वीकार करावा, मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आपणास याबाबत काही शंका असल्यास उत्तरपत्रिकांची छायाप्रत घेता येते. तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो व आपल्या शंकांचे निरसन करून घेता येते.

मुलांच्या निकालाची तुलना करू नका

प्रत्येक मुलाची क्षमता, विषयांची आवड, त्यामधील गती वेगवेगळी असते. तसेच परीक्षेच्या कालावधीमधील वर्षे, घरातील ताण, केलेला अभ्यास, परीक्षा काळातील प्रसंग, मुलांची मानसिक स्थिती, घरातील वातावरण याचा परिणाम अभ्यासावर होऊन निकालातील गुण कमी-जास्त होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी व स्वतः मुलांनी आपल्या निकालाची नातेवाईकांच्या व मित्र-मैत्रिणींच्या निकालाची तुलना करू नये.

अनुत्तीर्ण ही संधी समजून मुलांना प्रेरणा देणे....

दहावीच्या निकालात चार ते पाच टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे अनुत्तीर्ण होतात, याचा अर्थ ते हुशार नाहीत, त्यांना काही येत नाही, असा होत नाही. विद्यार्थी आजारी असेल, मनस्थिती योग्य नसेल, अंतर्गत गुणांच्या परीक्षा द्यायच्या राहिल्या असतील किंवा एखाद्या विषयातील संकल्पना समजल्या नसतील विशेषत: इंग्रजी किंवा गणित विषय येत नसतील, तर विद्यार्थी या विषयात अनुत्तीर्ण होऊ शकतो. पण, परंतु मुलांनी निराश न होता या निकालाचा स्वीकार करून पुन्हा जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

दहावीनंतर शाखा प्रवेश व करिअरच्या संधी

पालक व विद्यार्थी मित्रांनो, करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. अनेक विद्याशाखांमध्ये प्रवेश घेता येतो. दहावीच्या परीक्षेचा निकाल तुमची आवड, शारीरिक क्षमता, तुमचे छंद, आर्थिक परिस्थिती याचा विचार करून तुम्ही शाखा निवडल्यास यशस्वी होणारच, याची खात्री बाळगणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसह दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग, आयटीआय सर्टिफिकेट कोर्सेस, आरोग्य व तंत्रज्ञानामधील विविध अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्हाला स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडता येते. दहावीच्या मार्कांकडे न पाहता वैयक्तिक गुणांकडे पाहिल्यास आयुष्यातील चांगले करिअर निवडणे शक्य आहे. त्यामुळे करिअर उत्तम होते आणि आयुष्य आनंदी होण्यास मदत होते.

(लेखक - माजी सहाय्यक आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे)

टॅग्स :Puneपुणेssc examदहावी