शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result: दहावीच्या निकालाकडून मुलांच्या भविष्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:10 IST

दहावी हा शालेय शिक्षणातील पहिला महत्त्वाचा टप्पा...

- अनिल गुंजाळ

''हात हातात घेऊनी दहा हिरे, जरा आहा आरशाकडे,

अकरावा दिसेल कोहिनूर, जरा पाहा स्वत:कडे ''

मार्च-एप्रिल २०२२ मधील माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) म्हणजे शालेय शिक्षणातील पहिला टप्पा होय. यावर्षी सुमारे २३ हजार शाळांमधील १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून, एकूण ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी खूप आहे. परंतु, मुलांना मिळालेले गुण कमी आहेत. पुढील काही दिवसांत दहावीचा निकाल लागेल. या निकालाची पालक विद्यार्थी उत्सुकतेने आनंदाने, तर काहीशा तणावात वाट पाहात आहेत. दहावीची परीक्षा म्हणजे सर्वस्व नसून, मुलांमधील जन्मजात गुण, दहावीला मिळालेले टक्के याचा विचार करून मुलांचे पुढील भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी पालक, शिक्षक, समुपदेशक या सर्वांनी विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे.

दहावीची परीक्षा ६०० गुणांची आहे. मुलांचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह अर्थात पाच विषयांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार करून त्यांची निकालाची टक्केवारी जाहीर केली जाते. दहावीचा ऑनलाईन निकाल मिळाल्यानंतर पालकांनी मुलांवर चिडू नये, एवढेच कमी का जास्त का नाही, अभ्यास का केला नाही, असे प्रश्न विचारू नये. निकालाचा सकारात्मकतेने स्वीकार करावा, मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आपणास याबाबत काही शंका असल्यास उत्तरपत्रिकांची छायाप्रत घेता येते. तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो व आपल्या शंकांचे निरसन करून घेता येते.

मुलांच्या निकालाची तुलना करू नका

प्रत्येक मुलाची क्षमता, विषयांची आवड, त्यामधील गती वेगवेगळी असते. तसेच परीक्षेच्या कालावधीमधील वर्षे, घरातील ताण, केलेला अभ्यास, परीक्षा काळातील प्रसंग, मुलांची मानसिक स्थिती, घरातील वातावरण याचा परिणाम अभ्यासावर होऊन निकालातील गुण कमी-जास्त होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी व स्वतः मुलांनी आपल्या निकालाची नातेवाईकांच्या व मित्र-मैत्रिणींच्या निकालाची तुलना करू नये.

अनुत्तीर्ण ही संधी समजून मुलांना प्रेरणा देणे....

दहावीच्या निकालात चार ते पाच टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे अनुत्तीर्ण होतात, याचा अर्थ ते हुशार नाहीत, त्यांना काही येत नाही, असा होत नाही. विद्यार्थी आजारी असेल, मनस्थिती योग्य नसेल, अंतर्गत गुणांच्या परीक्षा द्यायच्या राहिल्या असतील किंवा एखाद्या विषयातील संकल्पना समजल्या नसतील विशेषत: इंग्रजी किंवा गणित विषय येत नसतील, तर विद्यार्थी या विषयात अनुत्तीर्ण होऊ शकतो. पण, परंतु मुलांनी निराश न होता या निकालाचा स्वीकार करून पुन्हा जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

दहावीनंतर शाखा प्रवेश व करिअरच्या संधी

पालक व विद्यार्थी मित्रांनो, करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. अनेक विद्याशाखांमध्ये प्रवेश घेता येतो. दहावीच्या परीक्षेचा निकाल तुमची आवड, शारीरिक क्षमता, तुमचे छंद, आर्थिक परिस्थिती याचा विचार करून तुम्ही शाखा निवडल्यास यशस्वी होणारच, याची खात्री बाळगणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसह दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग, आयटीआय सर्टिफिकेट कोर्सेस, आरोग्य व तंत्रज्ञानामधील विविध अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्हाला स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडता येते. दहावीच्या मार्कांकडे न पाहता वैयक्तिक गुणांकडे पाहिल्यास आयुष्यातील चांगले करिअर निवडणे शक्य आहे. त्यामुळे करिअर उत्तम होते आणि आयुष्य आनंदी होण्यास मदत होते.

(लेखक - माजी सहाय्यक आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे)

टॅग्स :Puneपुणेssc examदहावी