शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

By रवी टाले | Updated: November 14, 2018 19:02 IST

स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळतात.

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा तर भारतीयांना जणू काही आजारच जडलेला आहे.जे तंबाखू, गुटखा, खर्रा, पान खातात त्यांना तर कुठेही पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळालेला असतो.जे उपरोल्लेखित पदार्थांचे सेवन करीत नाहीत अशाही अनेकांना ऊठसूठ कुठेही थुंकण्याची सवय असते.

नकारात्मक बातम्यांच्या धबधब्यात मध्येच एखादी खूप छान बातमी वाचण्यात येते. दुर्दैवाने अनेकदा प्रसारमाध्यमेही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करतात किंवा उचित स्थान देत नाहीत. अनेकदा उचित स्थान न मिळाल्यामुळे सर्वसामान्य वाचकांचेही अशा बातम्यांकडे दुर्लक्ष होते. पुणे महापालिकेने गत आठ दिवसात रस्त्यांवर थुंकणाऱ्या १६० जणांना दंड ठोठावला आणि एवढेच नव्हे तर त्यांना त्यांनी केलेली घाण साफ करायला लावली, ही अशीच एक बातमी! पुणे महापालिकेने त्यासाठी १६ पथके गठित केली आहेत. ही कारवाई किती सातत्यपूर्ण रीतीने होते आणि पुणेकरांमध्ये त्यामुळे किती सुधारणा होते, हे कळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल; पण सर्वच पालिकांनी या बाबतीत पुणे पालिकेचा कित्ता गिरविणे खूप गरजेचे आहे.स्वच्छतेचे भारतीयांना काय वावडे आहे कुणास ठाऊक? जे वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष करतात, त्यांच्या बाबतीत बोलायलाच नको; पण जे वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही दिसतात, असेही अनेक लोक सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत मात्र कमालीची हलगर्जी करताना आढळतात. ज्यांना परदेश गमनाची संधी मिळते ते तर मायदेशी परतल्यानंतर तेथील स्वच्छता आठवून उसासे सोडतातच; पण ज्यांना तशी संधी मिळत नाही तेदेखील चित्रपटांमध्ये किंवा दूरचित्रवाणीवर परदेशातील प्रसंग बघून आमचा देश असा स्वच्छ का नाही, म्हणून हळहळतात! दुर्दैवाने बहुतेकांचे उसासे आणि हळहळणे तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. उसासे सोडून किंवा हळहळून झाल्यावर लगेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविताना त्यांना त्याची आठवणही नसते!सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचा तर भारतीयांना जणू काही आजारच जडलेला आहे. जे तंबाखू, गुटखा, खर्रा, पान खातात त्यांना तर कुठेही पिचकारी मारण्याचा जणू परवानाच मिळालेला असतो; पण जे उपरोल्लेखित पदार्थांचे सेवन करीत नाहीत अशाही अनेकांना ऊठसूठ कुठेही थुंकण्याची सवय असते. पिंक टाकणाºयांकडे तुच्छ नजरेने बघणारे अनेक उच्चभ्रू तोंडातील च्युर्इंग गम कुठेही थुंकतात, तेव्हा कुठेही थुंकणाºया ‘डाऊन मार्केट’ लोकांपेक्षा आपणही काही कमी नाही, याची जाणीवही त्यांना नसते!काही दिवसांपूर्वी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका खासदारांनी भारत हा थुंकणारा देश आहे, या शब्दात संपूर्ण देशाच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते. ते म्हणाले होते, ‘‘आम्हाला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा आम्ही थुंकतो, आम्ही थकतो तेव्हा आम्ही थुंकतो आणि हे असंच सुरू असतं.’’ त्या खासदार महोदयांनी कोणत्याही प्रकारे अतिशयोक्ती केलेली नव्हती. खरोखरच काहीही कारण नसताना नाहक थुंकणारे अनेक लोक आपण रोज आपल्या अवतीभोवती बघत असतो. खेदाची बाब ही आहे, की तसे करताना आपण काही चूक करतोय, हे त्यांच्या गावीही नसते. त्यांच्या अशा वर्तणुकीवर कुणी आपत्ती प्रकट केलीच, तर आपत्ती प्रकट करणारा कुणी परग्रहवासी आहे की काय, अशा प्रकारचे भाव चेहºयावर आणत निर्लज्जासारखे हसून मोकळे होतात. अशा वेळी एखाद्याने पोलिसांकडे तक्रार करायचा विचार केल्यास, पोलीसच त्याची खिल्ली उडवण्यास मागेपुढे बघणार नाहीत आणि स्वत:च पिंक टाकून अशा तक्रारीचा कसा काहीही उपयोग होत नाही, हे समजावून सांगायला लागतील!तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणल्यास वाट्टेल तिथे थुंकण्याच्या भारतीयांच्या सवयीला बराच आळा बसू शकतो, असे अनेकदा सुचविण्यात येते; मात्र अशा प्रकारे बंदी आणून कोणत्याही पदार्थाच्या सेवनास अटकाव केला जाऊ शकत नाही, हा अनुभव संपूर्ण जगाने घेतला आहे. गुटखा या तंबाखूजन्य पदार्थाचेच उदाहरण घ्या! काय फायदा झाला गुटख्यावर बंदी आणून? उलट माफियांमध्ये गुटखा माफिया ही नवी जमात उदयास आली. दुसरी गोष्ट म्हणजे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांवरील करांमधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने सरकारी पातळीवर अशी बंदी आणण्यासाठी पुढाकार घेतला जाण्याची सुतराम शक्यता नाही. तंबाखू हे एक नगदी पीक आहे. अफूप्रमाणे तंबाखूच्या शेतीवर बंदी आणल्यास मोठ्या संख्येतील शेतकºयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाय बºयाच औषधींमध्ये उपयोगी रसायन म्हणून तंबाखूचा वापर होतो. त्यामुळे तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी आणणे हा उपाय ठरू शकत नाही.या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेप्रमाणे दंडात्मक कारवाई करणे आणि जनजागृती घडवून आणणे हे दोनच उपाय व्यवहार्य दिसतात. दंडात्मक कारवाईमुळे लाचखोर प्रवृत्तीच्या कर्मचाºयांना आणखी एक कुरण उपलब्ध होईल हे खरे; पण किमान सार्वजनिक ठिकाणी तरी थुंकण्यास काही प्रमाणात का होईना अटकाव निश्चितच होईल. भावी पिढ्यांमध्ये जागृती घडवून आणण्याचे लाभ दृष्टीस पडण्यास वेळ लागेल; पण तो लाभ कायमस्वरूपी ठरेल. हल्ली सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत शाळकरी मुलांमध्ये बरीच जागृती दिसून येते. जोडीला तंबाखूचे दुष्परिणाम आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीमुळे जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा कशी डागाळते, यासंदर्भात शाळकरी मुलांना जागृत केल्यास एक-दोन पिढ्यांनंतर का होईना, फरक निश्चितच दिसू लागेल!

 

टॅग्स :AkolaअकोलाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक