शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अध्यात्म - नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:13 IST

‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही़ काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले.

- डॉ. गोविंद काळे‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही. काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले़ मूर्खांचेही नंदनवन असते तर? शेजारच्या पाटील काकांनी जुना वाडा नेस्तनाबूत करून भला मोठा बंगला, सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा बांधला़ चार मुलांसाठी चार स्वतंत्र खोल्या़ ऐश्वर्याचे प्रदर्शन तर बंगल्यात जागोजागी़ बंगल्याचे नाव होते नंदनवन. पाटीलसाहेब फार भाग्यवान माणूस असे सारेच गाववाले म्हणत़ पुढे मुलांची लग्ने झाली, सुना आल्या़ कधी न बोलणारे शांत नंदनवन बडबडू लागले़ रोज सुनांचे भांडणतंटे़ गावभर बभ्रा झाला. पाटील साहेबांनी तर धसकाच घेतला. त्यातच त्यांचे देहावसान झाले. नंदनवनाचे सारे गणित चुकले. आयुष्यातील गणिते चुकण्यासाठीच असतात तर?आद्य शंकराचार्यांनी नंदनवनचे गणित कायमचेच सोडवून टाकल्याचा प्रत्यय आला.‘संपूर्णं जगदेव नन्दनवनं सर्वेऽपि कल्पद्रुमागांगं वारि समस्तवारिनिवह: पुण्या: समस्ता: क्रिया:।वाच: प्राकृत संस्कृता: श्रुतिशिरो वाराणसी मेदिनीसर्वावस्थितरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणि॥ज्याला परब्रह्मरूपाचा साक्षात्कार झाला त्याला सर्व जगच नंदनवनासारखे दिसते़ सर्वच वृक्ष कल्पवृक्षासारखे होतात. जगातील सारे जलाशय त्याला गंगोदक बनतात व त्याची सर्व कर्मे ही पुण्यकारकच होतात़ त्याचे बोलणे संस्कृत असो अथवा प्राकृत, ते उपनिषदांसारखे बोधप्रद असते़ संपूर्ण पृथ्वी ही त्याची वाराणसी म्हणजे मुक्तिक्षेत्र असते व तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याची ती अवस्था समाधिस्थिती अथवा ब्रह्मस्वरूपी एकरूप होऊन राहणेच होय.आचार्यांची ही प्रचिती सामान्य जीवाला कशी आणि कधी येणार? कोणते मठ आणि पीठ हा अद्वैताचा साक्षात्कार घडविणार? तरुणाईला हा नंदनवनाचा अर्थ आकलनात आला तर विश्वकल्याण दूर नाही. क्षणाक्षणाला कालबाह्य होणाऱ्या असंख्य गोष्टींचे निरुपायाने का होईना आपण मूक साक्षीदार असतो. संस्कारी बालवयात हा श्लोक भेटला तर जगाकडे बघण्याची दृष्टी आमूलाग्र बदलून जाईल. आचार्य भटाब्राह्मणांचे, छत्रपती मराठ्यांचे, फुले माळ्यांचे आणि आंबेडकर दलितांचे हे सवतेसुभे जन्मालाच आले नसते. प्रश्न आहे तो पण परंतुचा. विश्वाचे नंदनवन ह्या कल्पनेलाच मनोभावे नमस्कार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHomeघरFamilyपरिवार