शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म - नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:13 IST

‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही़ काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले.

- डॉ. गोविंद काळे‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही. काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले़ मूर्खांचेही नंदनवन असते तर? शेजारच्या पाटील काकांनी जुना वाडा नेस्तनाबूत करून भला मोठा बंगला, सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा बांधला़ चार मुलांसाठी चार स्वतंत्र खोल्या़ ऐश्वर्याचे प्रदर्शन तर बंगल्यात जागोजागी़ बंगल्याचे नाव होते नंदनवन. पाटीलसाहेब फार भाग्यवान माणूस असे सारेच गाववाले म्हणत़ पुढे मुलांची लग्ने झाली, सुना आल्या़ कधी न बोलणारे शांत नंदनवन बडबडू लागले़ रोज सुनांचे भांडणतंटे़ गावभर बभ्रा झाला. पाटील साहेबांनी तर धसकाच घेतला. त्यातच त्यांचे देहावसान झाले. नंदनवनाचे सारे गणित चुकले. आयुष्यातील गणिते चुकण्यासाठीच असतात तर?आद्य शंकराचार्यांनी नंदनवनचे गणित कायमचेच सोडवून टाकल्याचा प्रत्यय आला.‘संपूर्णं जगदेव नन्दनवनं सर्वेऽपि कल्पद्रुमागांगं वारि समस्तवारिनिवह: पुण्या: समस्ता: क्रिया:।वाच: प्राकृत संस्कृता: श्रुतिशिरो वाराणसी मेदिनीसर्वावस्थितरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणि॥ज्याला परब्रह्मरूपाचा साक्षात्कार झाला त्याला सर्व जगच नंदनवनासारखे दिसते़ सर्वच वृक्ष कल्पवृक्षासारखे होतात. जगातील सारे जलाशय त्याला गंगोदक बनतात व त्याची सर्व कर्मे ही पुण्यकारकच होतात़ त्याचे बोलणे संस्कृत असो अथवा प्राकृत, ते उपनिषदांसारखे बोधप्रद असते़ संपूर्ण पृथ्वी ही त्याची वाराणसी म्हणजे मुक्तिक्षेत्र असते व तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याची ती अवस्था समाधिस्थिती अथवा ब्रह्मस्वरूपी एकरूप होऊन राहणेच होय.आचार्यांची ही प्रचिती सामान्य जीवाला कशी आणि कधी येणार? कोणते मठ आणि पीठ हा अद्वैताचा साक्षात्कार घडविणार? तरुणाईला हा नंदनवनाचा अर्थ आकलनात आला तर विश्वकल्याण दूर नाही. क्षणाक्षणाला कालबाह्य होणाऱ्या असंख्य गोष्टींचे निरुपायाने का होईना आपण मूक साक्षीदार असतो. संस्कारी बालवयात हा श्लोक भेटला तर जगाकडे बघण्याची दृष्टी आमूलाग्र बदलून जाईल. आचार्य भटाब्राह्मणांचे, छत्रपती मराठ्यांचे, फुले माळ्यांचे आणि आंबेडकर दलितांचे हे सवतेसुभे जन्मालाच आले नसते. प्रश्न आहे तो पण परंतुचा. विश्वाचे नंदनवन ह्या कल्पनेलाच मनोभावे नमस्कार.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHomeघरFamilyपरिवार