शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

विखार, विभाजन आणि द्वेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 08:10 IST

‘पीपली लाइव्ह’ नावाचा चित्रपट आला, त्याला बारा वर्षे झाली. नाथा नावाचा कोणी गरीब शेतकरी मरतो आहे, यापेक्षाही त्याची आत्महत्या ...

‘पीपली लाइव्ह’ नावाचा चित्रपट आला, त्याला बारा वर्षे झाली. नाथा नावाचा कोणी गरीब शेतकरी मरतो आहे, यापेक्षाही त्याची आत्महत्या ‘लाइव्ह’ कशी दाखवता येईल, याचाच विचार करणारे दूरचित्रवाणी माध्यम! कोणतीही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण दाखवायची आणि सर्वाधिक ‘टीआरपी’ मिळवायचा, याशिवाय अन्य बांधिलकी नसलेल्या टीव्ही माध्यमांनी काय आरंभले आहे, याचा अंदाज येण्यासाठी तो चित्रपट पुरेसा होता. मात्र, ‘पीपली लाइव्ह’ही सामान्य भासावा, अशा वळणावर आज आपण आलो आहोत. अनिर्बंध आणि अविचारी टीव्ही माध्यमे आज जे काही करत आहेत, त्याची चिंता साक्षात सर्वोच्च न्यायालयाला वाटू लागली आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने या स्वरूपाचे मत व्यक्त केले होते. विविध न्यायालयांनीही वेळोवेळी कानउघाडणी केली होती. मात्र, तरीही दूरचित्रवाणी माध्यमे बदलत नाहीत.

उलटपक्षी अधिकच विखारी होत चालली आहेत. वाहिन्या आणि धर्मसंसदेमधील द्वेषपूर्ण भाषा या संदर्भातील चार याचिकांवर न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायाधीशांचा एक मुद्दा फारच महत्त्वाचा. वृत्तपत्रांसाठी असलेल्या ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’प्रमाणे वाहिन्यांसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे या वाहिन्या बेताल आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ‘आपल्याला भाषण स्वातंत्र्य हवे आहे; पण कोणती किंमत मोजून?’ असा सवाल न्यायालयाने केला आहे. यापूर्वी अनेकदा न्यायालयांनी माध्यमांना फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोरोनाविषयक वृत्तांकनाबद्दल टीव्ही माध्यमांना जबाबदार धरले होते. ज्या पद्धतीने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वृत्तांकन वाहिन्यांनी केले, ते भयंकर होते. ‘कोरोना’च्या निमित्ताने देशभर भयाचे वातावरण तयार करण्यातही या माध्यमांचा मोठा वाटा होता. कधी ‘यूपीएससी जिहाद’ तर कधी ‘कोरोना जिहाद’, कधी ‘तबलिगी जमात’ अशा मुद्द्यांवर ज्या स्वरूपाचे डिबेट शो टीव्हीवर होतात, त्यात ‘डिबेट’ काहीच नसते. वेगळा मुद्दा मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. सगळ्यांना आपल्या भूमिका मांडता यायला हव्यात. सगळे आवाज ऐकू यायला हवेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये हे अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणसाला माध्यमांनी आवाज द्यायला हवा.

माणसांना अधिक सजग आणि विचारी करणे हे खरे तर माध्यमांचे काम. अशावेळी विचार पसरवण्याऐवजी विखार पसरवला जातो. एके काळी सकाळी सकाळी घरात येणारे वर्तमानपत्र हाच जगाची बित्तंबातमी कळण्याचा खात्रीचा मार्ग होता. बातमीसोबत विश्लेषण, अग्रलेख यामुळे वर्तमानपत्रांनी वाचकांच्या कक्षा रुंद केल्या. जागतिकीकरणानंतर माध्यमांचे स्वरूप आमूलाग्र बदलत गेले. चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या आणि दिवसभर ताज्या घडामोडी कळू लागल्या. बातम्या ‘दिसू’ लागल्या. त्यानंतरच्या डिजिटल माध्यमांनी त्यात आणखी भर घातली. बातमी प्रत्येकाच्या हातात आली आणि माध्यमही कवेत आले. या प्रवासामध्ये नेमके काय बदलले, काय हरवले, याचा जमाखर्च मांडण्याची वेळ आलेली आहे. या प्रवासाचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने केला आहे. माध्यमे बदलत गेली. पण, जी विश्वासार्हता वर्तमानपत्रांची आहे, तशी अन्य माध्यमांची, त्यातही दूरचित्रवाणी माध्यमांची का नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. विखार, विभाजन आणि द्वेष हीच नव्या जगाची भाषा होत चाललेली असताना, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली चिंता स्वाभाविक मानायला हवी.

राजकारण असो, टीव्हीवरील डिबेट शो असोत अथवा ओटीटीवरील मालिका. हिंसाचार, दहशत, द्वेष याच भाषेत सगळी पात्रे बोलत आहेत. सामंजस्य, सामोपचार, सद्भावना, सहकार्य, सुसंवाद हे शब्द हद्दपार होत चालले आहेत. धर्मनिरपेक्ष भारताच्या संविधानिक मूल्यांवरच आघात होत आहेत. ‘सत्य’ जणू पडद्याआड गेले आहे. अपवाद नाहीत असे नाही; पण त्याने नियमच सिद्ध होतो. आपल्या कार्यक्रमांमधून द्वेष पसरवणाऱ्या वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. ते तर सोडाच, उलटपक्षी संवेदनशील पद्धतीने ‘ग्राउंड रिपोर्ट’ करणाऱ्या प्रगल्भ अँकरलाच पडद्यावरून हटवले जावे, असा हा काळ आहे. वाहिन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना, या वास्तवाकडेही डोळेझाक करून चालणार नाही.

टॅग्स :Journalistपत्रकार