शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

विखार, विभाजन आणि द्वेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 08:10 IST

‘पीपली लाइव्ह’ नावाचा चित्रपट आला, त्याला बारा वर्षे झाली. नाथा नावाचा कोणी गरीब शेतकरी मरतो आहे, यापेक्षाही त्याची आत्महत्या ...

‘पीपली लाइव्ह’ नावाचा चित्रपट आला, त्याला बारा वर्षे झाली. नाथा नावाचा कोणी गरीब शेतकरी मरतो आहे, यापेक्षाही त्याची आत्महत्या ‘लाइव्ह’ कशी दाखवता येईल, याचाच विचार करणारे दूरचित्रवाणी माध्यम! कोणतीही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण दाखवायची आणि सर्वाधिक ‘टीआरपी’ मिळवायचा, याशिवाय अन्य बांधिलकी नसलेल्या टीव्ही माध्यमांनी काय आरंभले आहे, याचा अंदाज येण्यासाठी तो चित्रपट पुरेसा होता. मात्र, ‘पीपली लाइव्ह’ही सामान्य भासावा, अशा वळणावर आज आपण आलो आहोत. अनिर्बंध आणि अविचारी टीव्ही माध्यमे आज जे काही करत आहेत, त्याची चिंता साक्षात सर्वोच्च न्यायालयाला वाटू लागली आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने या स्वरूपाचे मत व्यक्त केले होते. विविध न्यायालयांनीही वेळोवेळी कानउघाडणी केली होती. मात्र, तरीही दूरचित्रवाणी माध्यमे बदलत नाहीत.

उलटपक्षी अधिकच विखारी होत चालली आहेत. वाहिन्या आणि धर्मसंसदेमधील द्वेषपूर्ण भाषा या संदर्भातील चार याचिकांवर न्या. के. एम. जोसेफ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायाधीशांचा एक मुद्दा फारच महत्त्वाचा. वृत्तपत्रांसाठी असलेल्या ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’प्रमाणे वाहिन्यांसाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे या वाहिन्या बेताल आहेत. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ‘आपल्याला भाषण स्वातंत्र्य हवे आहे; पण कोणती किंमत मोजून?’ असा सवाल न्यायालयाने केला आहे. यापूर्वी अनेकदा न्यायालयांनी माध्यमांना फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोरोनाविषयक वृत्तांकनाबद्दल टीव्ही माध्यमांना जबाबदार धरले होते. ज्या पद्धतीने दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे वृत्तांकन वाहिन्यांनी केले, ते भयंकर होते. ‘कोरोना’च्या निमित्ताने देशभर भयाचे वातावरण तयार करण्यातही या माध्यमांचा मोठा वाटा होता. कधी ‘यूपीएससी जिहाद’ तर कधी ‘कोरोना जिहाद’, कधी ‘तबलिगी जमात’ अशा मुद्द्यांवर ज्या स्वरूपाचे डिबेट शो टीव्हीवर होतात, त्यात ‘डिबेट’ काहीच नसते. वेगळा मुद्दा मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जातो. सगळ्यांना आपल्या भूमिका मांडता यायला हव्यात. सगळे आवाज ऐकू यायला हवेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये हे अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणसाला माध्यमांनी आवाज द्यायला हवा.

माणसांना अधिक सजग आणि विचारी करणे हे खरे तर माध्यमांचे काम. अशावेळी विचार पसरवण्याऐवजी विखार पसरवला जातो. एके काळी सकाळी सकाळी घरात येणारे वर्तमानपत्र हाच जगाची बित्तंबातमी कळण्याचा खात्रीचा मार्ग होता. बातमीसोबत विश्लेषण, अग्रलेख यामुळे वर्तमानपत्रांनी वाचकांच्या कक्षा रुंद केल्या. जागतिकीकरणानंतर माध्यमांचे स्वरूप आमूलाग्र बदलत गेले. चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या आणि दिवसभर ताज्या घडामोडी कळू लागल्या. बातम्या ‘दिसू’ लागल्या. त्यानंतरच्या डिजिटल माध्यमांनी त्यात आणखी भर घातली. बातमी प्रत्येकाच्या हातात आली आणि माध्यमही कवेत आले. या प्रवासामध्ये नेमके काय बदलले, काय हरवले, याचा जमाखर्च मांडण्याची वेळ आलेली आहे. या प्रवासाचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने केला आहे. माध्यमे बदलत गेली. पण, जी विश्वासार्हता वर्तमानपत्रांची आहे, तशी अन्य माध्यमांची, त्यातही दूरचित्रवाणी माध्यमांची का नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. विखार, विभाजन आणि द्वेष हीच नव्या जगाची भाषा होत चाललेली असताना, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली चिंता स्वाभाविक मानायला हवी.

राजकारण असो, टीव्हीवरील डिबेट शो असोत अथवा ओटीटीवरील मालिका. हिंसाचार, दहशत, द्वेष याच भाषेत सगळी पात्रे बोलत आहेत. सामंजस्य, सामोपचार, सद्भावना, सहकार्य, सुसंवाद हे शब्द हद्दपार होत चालले आहेत. धर्मनिरपेक्ष भारताच्या संविधानिक मूल्यांवरच आघात होत आहेत. ‘सत्य’ जणू पडद्याआड गेले आहे. अपवाद नाहीत असे नाही; पण त्याने नियमच सिद्ध होतो. आपल्या कार्यक्रमांमधून द्वेष पसरवणाऱ्या वृत्तनिवेदकांना पडद्यावरून दूर केले पाहिजे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. ते तर सोडाच, उलटपक्षी संवेदनशील पद्धतीने ‘ग्राउंड रिपोर्ट’ करणाऱ्या प्रगल्भ अँकरलाच पडद्यावरून हटवले जावे, असा हा काळ आहे. वाहिन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना, या वास्तवाकडेही डोळेझाक करून चालणार नाही.

टॅग्स :Journalistपत्रकार