शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अशांत बांगलादेश, सावध भारत! नागरिकांचा राेष शेख हसीना, त्यांची धाेरणे अन् सरकार विराेधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 07:58 IST

मागील सहा महिन्यांपासून बांगलादेशात नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदाेलन करीत आहेत.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामाेडींचे अभ्यासक

मुद्द्याची गोष्ट: मागील सहा महिन्यांपासून बांगलादेशात नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदाेलन करीत आहेत. बांगलादेशमध्ये जे घडले ते अरब स्प्रिंगप्रमाणे बांगलादेश स्प्रिंग म्हणजेच नागरिकांची शासनविराेधी प्रतिक्रांती हाेती का? असा प्रश्न निर्माण हाेताे. नागरिकांचा राेष शेख हसीना आणि त्यांची धाेरणे, तसेच सरकारच्या विराेधात हाेता. मात्र, अरब स्प्रिंगनंतर आखाती देशात लाेकशाही पद्धतीचे शासन प्रस्थापित हाेऊन लाेकांचे प्रश्न सुटले असे नाही, तर घराणेशाही, अस्थिरता आली आणि अराजक निर्माण झाले. त्यामुळे बांगलादेशातील अस्थिरतेमुळे भारतासमाेरील आव्हाने वाढणार आहेत.

बांगलादेशची उदारमतवादी इस्लामिक देश अशी मागील काही वर्षांपासून ओळख निर्माण झाली आहे. शेख हसीना यांच्या काळात आर्थिक विकास माेठ्या प्रमाणात झाला. जीडीपी ५ ते ६ टक्क्यांवर पाेहाेचला. देशाचे उत्पादन आणि निर्यातीमध्येही वाढ झाली. मात्र, या विकासाचे लाभ सर्वसामान्यांना मिळाले का? हा प्रश्न उपस्थित हाेताे. सुमारे ७० ते ८० लाख बांगलादेशी नागरिक सहा महिन्यांपासून रस्त्यावर उतरले हाेते. हे सर्वजण भारतविराेधी तसेच केवळ धार्मिक मूलतत्त्ववादी विचाराने प्रभावित हाेते असे नाही. शेख हसीना यांनी  देशाबाहेर पलायन केल्यानंतरही आंदाेलन सुरू आहे. त्याचा अर्थ असा आहे, की आर्थिक विकासाची फळे सर्वसामान्यांपर्यंत पाेहाेचलेली नाहीत. गरिबी, बेराेजगारी माेठ्या प्रमाणात आहे. 

सरकारविराेधी आंदाेलन शांततेच्या मार्गाने थांबविण्याऐवजी शेख हसीना यांनी आंदाेलकांना रझाकार, दहशतवादी म्हणून हिणवले. त्यामुळे असंताेष वाढत गेला. नागरिकांनी कायदा हातात घेतला आणि आंदाेलन तीव्र हाेत गेले. नागरिकांचा राेष राजघराण्याविराेधात असल्याचे दिसून येते. बांगलादेशात दाेन घराणी राजकारणात सक्रिय आहेत. त्यामध्ये एक शेख हसीना यांचे वडील मुजिबूर रहमान हे बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख हाेते, तर खालिदा झिया यांचे पती माजी लष्करप्रमुख हाेते. शेख हसीना यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ हा भारतासाठी चांगला असला, तरी त्यांच्या शासनाची दिशा ही हुकूमशाहीकडे वाटचाल करीत हाेती. गेल्या दाेन निवडणुकांमध्ये विराेधकांचा सहभाग नाही. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी बांगलादेश नॅशनल पार्टी या मुख्य विराेधी पक्षावर बंदी आणून नेत्या खालिदा झिया यांना तुरुंगात टाकले. ‘जमात-ए-इस्लामी’वर बंदी घातली. सर्वसामान्य आंदाेलकांवर गोळीबार करण्याचा आदेश लष्कराला दिला. मात्र, लष्कराने तो धुडकावून लावला. आंदाेलन चिघळले आणि परिणामी शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले. 

भारतविरोध हा हिंदूंविरोधात बदलू नये- बांगलादेशात मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेले आंदाेलन व्यापक कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तान, आयएसआय यांच्यासह चीन, अमेरिकेने आंदाेलकांना समर्थन दिले असण्याची शक्यता आहे.- भारतीय वस्तूंवर बहिष्कार, आरक्षण आणि असहकार चळवळीच्या माध्यमातून सुरू होते. अल्पसंख्याक आणि हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भारतविरोध हा हिंदूविरोध होऊ नये.

शेख हसीनांनंतर पुढे काय? - बांगलादेशाच्या राज्यघटनेनुसार शेख हसीना यांच्यानंतर तीन महिन्यांपर्यंत काळजीवाहू सरकार चालविले जाऊ शकते. त्यानंतर निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.- लष्करप्रमुखांनी निवडणुका घेतल्यावर बांगलादेश नॅशनल पार्टी सत्तेवर येणार आणि त्यांच्या सरकारमध्ये जमात-ए-इस्लामी आणि तहरिक-ए-तालिबान असणार आणि इतर धार्मिक मूलतत्त्ववादी गट असणार आणि त्यांचा शासनावर प्रभाव राहण्याची शक्यता आहे.- शेख हसिनांना भारत राजाश्रय देणार का, हे मोठे आव्हान आहे. 

सीमेवरील गस्त वाढवावी लागणार- भारताच्या पश्चिमेकडे पाकिस्तान आहे. दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर कुंपण घालण्यात आले आहे. त्याप्रमाणे पूर्वेकडे बांगलादेशाला लागून चार हजार किमीची सीमारेषा आहे. - मूलतत्त्ववादी गटाचा प्रभाव वाढला तर पाक पुरस्कृत संघटनेचे दहशतवादी भारतात घुसू शकतात. - बनावट नोटा आणि अमलीपदार्थांची तस्करी वाढू शकते. या प्रकारांमुळे भारताची चिंता वाढणार आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत