शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

विशेष लेख: श्रीमंत होत चाललेल्या जगातले लोक उपासमार सोसतात, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 09:38 IST

जगभर सत्तासंघर्ष, बदलते हवामान, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतीबरोबरच उपासमार वाढत आहे. जगातल्या सुमारे १.३ अब्ज लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही.

-प्रा. डॉ. नितीन बाबर, अर्थशास्त्र विभाग, सांगोला महाविद्यालय

जगभर उपासमार आणि कुपोषणाचे अरिष्ट  दिवसेंदिवस अधिकच गंभीर होते आहे. २०२३ साली प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांकाने  जगावर भूकसंकट कायम असून, अद्यापही पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी अन्न मिळत असल्याचे  निरीक्षण  नोंदविले आहे.  या यादीत भारताची तब्बल १०७ वरून चार अंकांनी १११व्या स्थानी  घसरण झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होतीच. या अहवालाच्या केंद्रस्थानी शहरीकरणातून येणारी वाढती अन्न असुरक्षितता आहे.  अल्पपोषण, कुपोषण, खुंटलेली वाढ आणि बालमृत्यू या  चार  निकषांच्या आधारे जागतिक भूक निर्देशांक मोजला जातो.

जगभर अनेक देशांतून  सत्तासंघर्ष,  बदलते हवामान, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या  किमतीबरोबरच  उपासमार वाढत आहे. जगातील सुमारे १७.२ टक्के लोकसंख्या किंवा १.३ अब्ज लोकांना नियमित पौष्टिक आणि पुरेसे अन्न मिळत नाही. अन्न असुरक्षिततेच्या मध्यम आणि गंभीर पातळीच्या श्रेणीमध्ये  अंदाजे दोन अब्ज लोकांचा समावेश होतो. लहान बालकांचे जन्मावेळी कमी वजन अजूनही एक मोठे आव्हान असून,  २०१२  पासून त्यामध्ये  कोणतीही प्रगती झालेली नाही. याव्यतिरिक्त, गेल्या सहा वर्षांत स्टंटिंगमुळे प्रभावित झालेल्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या जागतिक स्तरावर १० टक्क्यांनी कमी झाली असली तरी, २०३०  मध्ये स्टंटिंग मुलांची संख्या निम्मी  करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रगतीचा वेग खूपच मंद आहे. शिवाय जगभरामध्ये शालेय मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये वजन आणि लठ्ठपणा वाढत आहे. जवळपास सर्वच देशांमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अन्न असुरक्षिततेची झळ सोसावी लागत आहे.

आर्थिक विकासाच्या बदलत्या संदर्भांमुळे जगाच्या अनेक भागांचे झपाट्याने शहरीकरण होते आहे. २०५० पर्यंत सुमारे दहांपैकी सात लोक शहरांमध्ये राहतील, असा अंदाज असून वाढत्या शहरीकरणामुळे हवामान बदल आणि जैवविविधतेच्या नुकसानामुळे कामाच्या शोधात अनेकांना नाइलाजास्तव स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते. जागतिक लोकसंख्येतील शहरी लोकसंख्येचा  वाटा १९५० ते २०२१ या कालावधीमध्ये ३० वरून ५७  टक्क्यांपर्यंत  वाढला  असून, २०५० पर्यंत तो ६८ टक्क्यांपर्यंत  पोहोचण्याचा अंदाज आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणून जमीन, हवा, पाणी या पर्यावरणीय परिस्थितीचा ऱ्हास आणि हरितगृह वायू उत्सर्जन वाढते आहे.  काही प्रदेश २०३० पर्यंत पोषण लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आहेत. तथापि, अनेक देशांमध्ये आरोग्यदायी व परवडणाऱ्या आहाराची  उपलब्धता पुरेशी नाही. वाढत्या ग्रामीण-शहरी असमानतेतून गरिबी, कुपोषण, बेरोजगारी आणि  पायाभूत सेवा-सुविधांचा अभाव यातून अन्न असुरक्षितता आणखी वाढते आहे.

भारतातील सुमारे एक अब्जाहून अधिक लोक निरोगी आहार घेऊ शकत नाहीत, हे अहवालाचे निरीक्षण केवळ ८१.३ कोटी लोकांना अन्न सहाय्याची आवश्यकता आहे, या  सरकारच्या  दाव्याशी  विसंगत आहे. नीती आयोगाच्या एका अहवालातून सुमारे ७४.१ टक्के भारतीयांना निरोगी अन्न मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे २०२१ वर आधारित एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, सर्वात गरीब २० टक्के  कुटुंबांपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया, अगदी गरोदर स्त्रियादेखील दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत नाहीत. देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला आणि ४० टक्के पुरुष व्हिटॅमिन-ए-युक्त फळे खात नसल्याचेही आढळून आले आहे. त्याचवेळी देशात  दरवर्षी सुमारे ७४ दशलक्ष टन अन्न वाया जाते!

इंधन, अन्न, खतांच्या किमती वाढत असून  अन्नपुरवठ्याच्या वितरणात असमानता वाढते आहे. २०५० पर्यंत ९.७ अब्ज अंदाजित जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी अन्नाची मागणी वाढण्याचा अंदाज आहे.   उपासमारीचे दुष्टचक्र खंडित करण्यासाठी बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या पिकांच्या सुधारित वाणांची निर्मिती आणि वापर, आधुनिक कृषी तंत्र, अचूक शेती व जल व्यवस्थापन, ग्रामीण शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडणे.. हे सारे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय सरकारांना निधीच्या उपलब्धतेसह धोरणात्मक भूमिका बजावावी लागेल.

-nitinbabar200@gmail.com

टॅग्स :foodअन्नIndiaभारत