शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
3
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
4
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
5
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
6
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
7
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
8
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
9
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
10
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
11
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
12
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
13
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
14
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
15
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
16
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
17
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
18
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
19
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक

विशेष लेख: महाराष्ट्राचा नवा अभ्यासक्रम आराखडा निषेधार्हच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 11:03 IST

Maharashtra's New Syllabus: पश्चिमेतील वर्णभेद, गुलामी, शोषणावर बोलायचे; पण आपल्याकडची जातिव्यवस्था, अस्पृश्यता आणि महिलांच्या शोषणावर मौन बाळगायचे ?

- डॉ. सुखदेव थोरात(माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग)

२०२० च्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला असला तरी महाराष्ट्रातील अनेक शिक्षणतज्ज्ञांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत. अभ्यासक्रमाच्या आराखड्यात प्रत्यक्ष काय शिकवायचे दिलेले नाही; परंतु अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. अभ्यासक्रमाचा आराखडा शिक्षणाची उद्दिष्टे सूचित करत असतो. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काय शिकवायचे हे सांगतो. बुद्धिप्रामाण्य आणि विज्ञान तसेच रोजगारक्षमता वाढवणे, चांगले नागरिक घडवण्यासाठी तरुण पिढीमध्ये नैतिक मूल्ये बिंबवणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आलेली आहेत. मात्र ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आराखडा काय शिकवायला सांगतो?

- इतर काही घटकांसोबत भारतीय ज्ञान परंपरा शिकवा असे त्यात म्हटले आहे. परंतु भारतीय पद्धतीनुसार वेद, पुराण, उपनिषद, मनुस्मृती आणि गीता ही तत्वज्ञानांची ब्राह्मणी परंपरा या आराखड्याला सुचवायची आहे. जैनिझम, बुद्धिझम, शिखीझम, लोकायत आणि इतर अनेक परंपरांकडे त्यात दुर्लक्ष करण्यात आले आहे. गीतेच्या कर्मसिद्धांताचा त्यात विशेषत्वाने उल्लेख येतो. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक १ ते २५ तिसरी ते पाचवीपर्यंत, २६ ते ५० सहावी ते आठवीपर्यंत शिकवावे असे प्रस्तावित आहे. नववी ते बारावीसाठी गीतेचा १२ वा अध्याय नेमण्यात आला आहे. ‘नॉलेज ट्रॅडिशन ॲण्ड प्रॅक्टिसेस ऑफ इंडिया’ या विषयात गुरुशिष्य परंपरा शिकवणे अभिप्रेत आहे. पुरोगामी महाराष्ट्र विद्यार्थ्यांना शिकवा असे प्रस्तावित असले तरीही त्यात केवळ मध्ययुगीन संत परंपरेचा समावेश आहे. एकोणिसाव्या शतकातील सुधारणा, फुले, रानडे, आंबेडकर, शिंदे यांचे कार्य वगळण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या व्यक्तींची नावेही कोठे दिसत नाहीत.

मूल्यशिक्षण हे एक उद्दिष्ट असून त्यात शांतता, समता, बंधुत्व, सर्वसमावेशकता, घटनेची तत्वे, लोकशाही अशा अनेक गोष्टी येतात. परंतु मूल्यसंकल्पना भारतीय ज्ञान परंपरेतून उचलण्यात आली आहे. त्यामुळे गीतेतील निष्कर्म सिद्धांत तेवढा शिकवला जाईल. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मूल्य हे वेद, पुराणे, स्मृती, मनुस्मृती आणि उपनिषदातून घेण्यात आले आहे. मूल्यांविषयीचे प्रकरण मनुस्मृतीतील वचनाने सुरू होते. गीतेतील निष्कर्म सिद्धांत, फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहा असे सांगतो. त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना असा शिकवला जाईल की त्यांनी काम करावे पण (शिकत असताना) गुणांची आणि पुढे फळाची अपेक्षा ठेवू नये.

समता त्याग अहिंसा ही जैनिझम, बुद्धिझम आणि शिखीझममधील शिकवण मात्र पूर्णपणे दुर्लक्षिलेली आहे. समता, भेदभाव आणि दारिद्र्य या प्रश्नांविषयी विद्यार्थ्यांना जाणीव देणे हे एक उद्दिष्ट असले तरी अस्तित्वात असलेली जातिव्यवस्था, लिंग विषमता याविषयी मुलांना सांगणे टाळले आहे. एकंदर ३२७ पानांच्या अभ्यासक्रमात कुठेही जात किंवा अस्पृश्यतेचा उल्लेखही आलेला नाही हे अत्यंत धक्कादायक होय. शालेय विद्यार्थ्यांना नेमके काय सांगायचे आहे हे या खोटेपणातून स्पष्ट होते. जातिव्यवस्था ब्राह्मणांनी तयार केलेली नाही तर ती ब्रिटिश सरकारने आणली असे हा अभ्यासक्रम  म्हणतो  ब्रिटिशांनी जात जनगणना केली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या ‘रिडल्स ऑफ हिंदुइझम’ या पुस्तकात पुरावे दिले, की जातिव्यवस्था ब्राह्मणी समाजाची सामाजिक निर्मिती होती. वेद, पुराणे, उपनिषदे, स्मृती, गीता, रामायण आणि महाभारत अशा सर्व ब्राह्मणी साहित्याने तिचे समर्थनच केलेले आहे . भारतीय संस्कृती स्त्रियांचा मोठा आदर करते असे या अभ्यासक्रमाने खोटे सांगितले आहे. बालविवाह, सतीची प्रथा, महिलांवर होणारे अत्याचार या गोष्टी दुर्लक्षिल्या आहेत. पश्चिमी देशातील वर्णभेद, गुलामी, शोषण याविषयी हा अभ्यासक्रम बोलतो, पण आपली जातव्यवस्था,अस्पृश्यता आणि महिलांचे शोषण यावर मौन बाळगतो. उपरोल्लेखित मुद्दे लक्षात घेता हा अभ्यासक्रम अजिबात पुढे रेटला जाता कामा नये. त्यावर व्यापक चर्चा व्हायलाच हवी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार