शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: केजरीवाल आणि सोरेन- दोन अटक, एक अर्थ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 09:50 IST

Arvind Kejriwal and Hemant Soren Arrest: निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक म्हणजे आपल्या लोकशाहीत काहीतरी बिनसलंय याची खूणच आहे.

कपिल सिब्बल(राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ)झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची अटक ही एक अभूतपूर्व घटना होती. ईडीच्या मते ही अटक त्यांच्या राजीनाम्यानंतर केली गेली. मात्र हे पूर्ण सत्य मुळीच नाही. सोरेन आपल्या निवासस्थानात असतानाच ईडीने त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्ष अटक मात्र राजभवनाच्या परिसरात झाली. पदाचा राजीनामा देण्यासाठी सोरेन तिथं गेले होते. मात्र आपल्याच पक्षावर विधानसभेचा विश्वास कायम असल्याचा दावाही त्यांनी त्याचवेळी तिथं केला.

अरविंद केजरीवालांना मात्र मुख्यमंत्रिपदावर असतानाच अटक केली गेली आणि विशेष न्यायालयानं त्यांना सहा दिवसांची ईडीची कोठडी सुनावली असली तरी आजही ते आपल्या पदावरच आहेत. सर्वच विरोधी नेते २००२ च्या मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) आपल्याला अटक होईल की काय या भीतीच्या छायेखाली आज वावरत आहेत. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत खटले दाखल करून किंवा तशा धमक्या देत पक्षांतरे घडवून सरकारे अस्थिर करण्यासाठी सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचा वापर या सरकारने वारंवार केला आहे.

भारताच्या इतिहासात राजकीय सत्ता आणि अन्वेषण यंत्रणा एवढ्या व्यापक प्रमाणात जोडीनं काम करताना प्रथमच दिसत आहेत. २०१४ पूर्वी सीबीआयशी असल्या संगनमताच्या फुटकळ घटना दिसल्याही असतील, पण इतकी विकराळ आणि घातक रीत प्रथमच अनुभवाला येत आहे. एक तर अशा खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे बंद असतात. जामिनासाठी विशेष न्यायालयातच जायला सांगितलं जातं. दुसरं म्हणजे आरोपीला तत्काळ दिलासा मिळणं जवळपास अशक्य असतं. विशेष न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात जायला दोन तरी महिने लागतातच. सोरेन यांना ३१ जानेवारीला अटक झाली. आजही ते न्यायालयीन कोठडीतच आहेत. प्रक्रिया हीच शिक्षा ठरते. शेवटी दिलासा मिळालाच तरी तो अर्थहीन ठरतो.

केजरीवालांचेच उदाहरण घ्या. तथाकथित मद्य घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोणत्याही आर्थिक देवाण-घेवाणीशी त्यांचा संबंध जोडता येईल असे काहीही झडतीच्या वेळी त्यांच्याजवळ सापडलेले नाही, हे सर्वमान्य आहे. किंबहुना यातील कुठल्याच आरोपीला दोषी ठरवता येईल अशा कोणत्याही रकमेचा पत्ताच नाही. शिवाय एकामागून एक असे वेगवेगळे जबाब दिल्यानंतरच अखेरीस काही आरोपी माफीचे साक्षीदार झालेले आहेत. अशा ‘नंतर’ माफीचे साक्षीदार झालेल्या या लोकांच्या जबाबाच्या आधारावरच केजरीवाल वगैरेंना अटक करण्यात आली आहे. 

माफीचा साक्षीदार बना आणि स्वतःविरुद्धचा खटला टाळा हे प्रलोभन इतरांना यात गोवण्यासाठी त्यांना पुरेसं ठरलं. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच्या कितीतरी निकालात असं म्हटलं आहे की माफीच्या साक्षीदारांचे जबाब हा क्षीण पुरावा असल्याने असे जबाब त्यांना बळकटी देणारा अन्य स्वतंत्र पुरावा समोर आल्याशिवाय शिक्षेसाठी आधारभूत मानू नयेत. प्रस्तुत खटल्यात असा कोणताही स्वतंत्र पुरावा समोर आलेला नाही.

खटल्यामागील हेतू दूषित आहे, तथाकथित पुरावा सदोष आहे आणि अटकेची वेळ राजकीय सोयीनुसार साधलेली आहे. अशा परिस्थितीत आरोपीला विशेष न्यायालयात जायला सांगणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याच्या अधिकारापासून त्याला वंचित ठेवणे होय. विशेषत: आरोपी राजकीय पक्षाचा अध्यक्ष असेल तर हे अधिकच खरे ठरते. इथे तर आरोपी हा विद्यमान मुख्यमंत्रीसुद्धा आहे. याचा निवडणूक निकालावर परिणाम होणार हे उघडच आहे. ही प्रक्रिया पूर्वग्रहदूषित असून तिच्यामुळे मुळातच असमान असलेली मैदानी परिस्थिती सरकारच्या बाजूने अधिकच झुकलेली राहील.

दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पीएमएलए कायद्यानुसार न्यायालय आरोपी निर्दोष असल्याच्या निष्कर्षाला येत असेल तरच जामीन देता येतो. खटल्याची सुनावणीच झालेली नसताना न्यायालय अशा निष्कर्षाला कसे काय येऊ शकेल हेच मला कळत नाही. कायद्यातील अशी सकृतदर्शनी असंवैधानिक तरतूद सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. 

जामीनाबाबतचा निर्णय देण्याचा आपला अधिकार बजावताना ट्रायल कोर्ट्स जामीन क्वचितच मंजूर करतात, याबद्दलची खंत दुसऱ्या-तिसऱ्या कुणी नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे. लक्षणीय बाब अशी की, अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्धच्या ज्या ज्या पुराव्याबद्दल ईडी बोलत आहे ते सारे पुरावे २०२३ च्या ऑगस्टपासूनच त्यांच्याकडे आहेत. माफीच्या साक्षीदाराचा एकही जबाब त्यानंतर आलेला नाही. मग त्यांना या मार्चमध्येच अटक करण्याची अशी कोणती गरज पडली? त्याचवेळी अटक करता आली असती, पण नाही केली. कारण त्यावेळी अटक केली असती तर निवडणूक जाहीर होईस्तोवर त्यांना जामीन मिळून ते बाहेर आले असते. कायद्यातील कठोर तरतुदी वापरत विरोधी आवाज दडपून टाकण्यासाठी हीच पद्धत देशभर राबवली जात आहे. यापैकी काही कायदे तर वसाहत काळाचे काटेरी अवशेष आहेत. अत्यंत जुलमी आणि असंवैधानिक कार्यपद्धतीचा अवलंब करून आमच्या प्रजासत्ताकाचे अपहरण केले जात आहे. आमच्या संस्थांची गळचेपी होत आहे. अंमलबजावणी करणाऱ्या आमच्या यंत्रणांना गुलाम बनवले जात आहे. आमच्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी केली जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आपले दरवाजे बंद ठेवलेत. आणि तरीही आपली ही मायभूमी लोकशाहीची जन्मदात्री आहे!

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलArvind Kejriwalअरविंद केजरीवाल