शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सत्य हे काही काळ लपवता आले तरी ते नष्ट करता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 07:53 IST

गुरुवारी (१६ डिसेंबर) बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा झाला. काॅंग्रेस पक्षाने यानिमित्त जाे आक्षेप नाेंदविला आहे, ताे महत्त्वाचा आहे.  पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानबरोबरच्या युद्धात मिळविलेल्या देदीप्यमान विजयाच्या शिल्पकार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हाेत्या.

सत्य हे काही काळ लपवता आले तरी ते नष्ट करता येत नाही, हे जगाच्या इतिहासात आजवर अनेकवेळा दिसून आले आहे. परवा गुरुवारी (१६ डिसेंबर) बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा झाला. काॅंग्रेस पक्षाने यानिमित्त जाे आक्षेप नाेंदविला आहे, ताे महत्त्वाचा आहे.  पन्नास वर्षांपूर्वी पाकिस्तानबरोबरच्या युद्धात मिळविलेल्या देदीप्यमान विजयाच्या शिल्पकार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हाेत्या. त्यांच्या धाडसामुळेच दक्षिण आशियाचा भूगाेल आणि इतिहास बदलून गेला. हे सत्य नजरेआड करून केंद्रातले भाजप सरकार विजयदिन साजरा करण्याचा प्रयत्न करीत असेल तर या आंतरराष्ट्रीय विषयावर आक्षेप घेण्याचा हक्क काॅंग्रेस पक्षाला जरूर आहे. 

फिल्ड मार्शल जनरल सॅम माणकेशा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय लष्कराने पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेश स्वतंत्र केला, एवढेच नव्हे तर हुकूमशाही पद्धतीने तीस लाख लाेकांचा संहार करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकविला हाेता. तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये शेख मुजीबूर रहेमान यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणुकीत प्रचंड यश मिळाले हाेते. सामान्य जनतेचा मुक्ती वाहिनीच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा हाेता. भारताने पाकिस्तानवर युद्ध लादले नव्हते, तर बांगलादेश निर्मितीसाठी लढणाऱ्या नागरिकांवर हाेणाऱ्या अत्याचाराचा प्रतिकार केला हाेता. या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण होताना इंदिरा गांधी यांनी जे धाडस दाखविले त्याचे मूल्यमापन तत्कालीन जगाच्या राजकीय भूगाेलाची स्थिती पाहून करावे लागेल. 

अमेरिका आणि चीन पाकिस्तानच्या बाजूने उभे हाेते. शीतयुद्धाचा काळ हाेता. इंदिरा गांधी यांनी मुत्सद्देगिरी दाखवून साेव्हिएत रशियाशी करार केला. त्याच्या आधारे भारताविरोधातील कोणतीही कारवाई रशियाविरुद्ध आहे, असे समजले जाईल, असा दम रशियाने दिला होता. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विराेधात तीन वेळा ठराव आणले हाेते. तिन्ही वेळेला साेव्हिएत रशियाने नकाराधिकार वापरला. ठराव हाणून पाडला. रशियाच्या मदतीने एका देशातील वंचितांच्या मुक्ती लढ्यासाठी भारत संघर्ष करताे आहे, हे इंदिरा गांधींनी जगाला दाखवून दिले. हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला नाही, तर निर्वासितांच्या लोंढ्यांमुळे भारतात नवे प्रश्न उभे राहिलेत, हे त्यांनी वारंवार जगाला सांगितले.

मुक्ती वाहिनीने उठाव मार्चमध्ये केला. परंतु, युद्ध डिसेंबरमध्ये झाले. फिल्ड मार्शल जनरल सॅम माणेकशा यांना युद्धाची तयारी करण्यासाठी नऊ महिन्यांचा वेळ मिळाला. पावसाळ्यात युद्ध टाळता आले. त्यांचा सल्ला इंदिरा गांधी यांनी मानला. संपूर्ण तयानिशी युद्धात उतरून केवळ दहा दिवसांत १६ डिसेंबर १९७१ राेजी भारताने पाकिस्तानला शरण येण्यास भाग पाडले. पाकिस्तानातील अनेक विचारवंत, लेखक आणि अभ्यासकांनी या युद्धावर खूप लिखाण केले आहे. त्यात पाकिस्तानी लष्कराच्या अपयशाला दाेष दिला आहे; पण अपेक्षेनुसार इंदिरा गांधी यांनी दाखविलेल्या धाडसाचे मात्र पुरेसे  आणि उचित काैतुक केलेले नाही. 

आताच्या राजकीय परिस्थितीत तसाच प्रकार चालला आहे. ज्या कठीण आंतरराष्ट्रीय कालखंडात श्रीमती इंदिरा गांधी यांनी धाडस दाखविले ते काैतुकास्पद आहे. त्या काॅंग्रेसच्या नेत्या असल्या तरी भारताच्या पंतप्रधान हाेत्या. भारत देशाचे ते धाेरण हाेते आणि त्या धाेरणानुसार भारतीय लष्कराने कारवाई केली हाेती. अखेर ताे देशाच्या अस्मितेचा लढा हाेता. भारताने आपल्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील उपेक्षित, शाेषित सामान्य माणसासाठी स्वातंत्र्य हवे, असाच आग्रह धरला हाेता.

वसाहतवादी राजकारणामुळे अनेक देशांवर अन्याय झाला आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या जनतेला पाठिंबा नेहमीच दिला गेला. ती भारताची वैचारिक बैठक हाेती आणि असायला हवी आहे. हा सर्व इतिहास विसरून किंवा लपवून ठेवता येणार नाही. कारण ते सत्य आहे. बांगलादेश हा नवा देश जगाच्या क्षितिजावर उदयाला आला हेदेखील ढळढळीत सत्य आहे. पश्चिम पाकिस्तानच्या दडपशाहीमुळे लाखाे लाेक जिवास मुकले, हे सत्य आहे. सुमारे एक काेटी जनतेला भारतात आश्रय घ्यावा लागला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. या सर्व मुक्ती लढ्यात भारताची भूमिकाच निर्णायक ठरली. त्यासाठी बांगलादेशाच्या बाजूने भारताखेरीज अन्य काेणी उभे राहिले नव्हते. ते धाडस इंदिरा गांधी यांनी दाखविले. आपल्या शेजारी देशाला जन्म देणाऱ्या या युद्धात पन्नासावा विजय दिवस साजरा करताना विद्यमान भारत सरकारला त्यांचा विसर पडत असेल, तर ते सर्वथा अनुचितच आहे. इतिहास लपवता येत नसतो.

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीBangladeshबांगलादेशIndiaभारत