शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: पुस्तकं समाेर ठेवली पण उत्तरे कशी शाेधणार? ‘ओपन बुक एक्झाम’चा असाही एक पैलू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 11:41 IST

अर्थातच हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही

सुरेंद्र दिघे, विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाणे

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि वैज्ञानिक यश पाल यांचे ‘ते’ विधान विचारप्रवण करणारे आहे. २००५मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा समितीचे ते अध्यक्ष होते. आराखड्याच्या प्रास्ताविकात त्यांनी ते विधान लिहिले होते. त्याचे स्मरण होण्याचे निमित्त असे की, चारच दिवसांपूर्वी  केंद्रीय शालेय अभ्यास मंडळाने (सीबीएसई) एक सूचना जाहीर केली. त्यानुसार नववीच्या भाषा, सामाजिक शास्त्र, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षा पुढील वर्षापासून ‘ओपन बुक’ पद्धतीने होतील. या निर्णयाचे मूळच मुळात पाल यांच्या ‘त्या’ विधानात आहे. ते विधान आहे - “आपण आपल्या मुलांना आकलनशक्ती दिली पाहिजे. त्या शक्तिद्वारे मिळणाऱ्या अनुभवातून ती स्वत:ची ज्ञानसंरचना करण्यास शिकतील. ही ज्ञाननिर्मिती आनंददायी असेलच, पण ती सर्वांगीण आणि सर्जनशील असेल.” म्हणूनच या विधानाशी सुसंगत धाडसी निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंडळाचे अभिनंदन!

अर्थातच हा निर्णय घाईघाईत घेतलेला नाही. नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट हे शिक्षण प्रणाली अधिक समावेशक, लवचीक व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाभिमुख करणे हे आहे. नवीन धोरणाअंतर्गत, ‘राष्ट्रीय शालेय शैक्षणिक आराखड्या’त ही बाब स्पष्ट केली आहे. “विद्यार्थ्यांनी, पाठांतर आणि स्मरणशक्तीवर अवलंबून न राहता,  आकलन, चौकस, चिकित्सक आणि विश्लेषणबुद्धी वृद्धिंगत आणि विकसित करण्याचे  प्रयत्न  केले पाहिजेत.” पण केंद्रीय शालेय शिक्षण मंडळाचा  ‘ओपन बुक’ परीक्षा घेण्याचा हा पहिलाच प्रयोग नाही.   

‘ओपन बुक एक्झाम’ कशी?

‘ओपन बुक एक्झाम’ ही संकल्पना जुनी व पाश्चात्य जगात रूजलेली आहे. परंतु, इथे मुद्दामहून नमूद करावेसे वाटते की, ही पद्धत साधारणत: उच्च शिक्षणात वापरली जाते. शालेय शिक्षणात ही परीक्षा पद्धत  का वापरली जात नाही. याचे कारण समजून घेण्यासाठी ‘ओपन बुक’ संकल्पना काय ते समजून घेऊ. आपण सर्वांनी पहिलीपासून सर्व लेखी परीक्षा दिल्या आहेत. परीक्षेआधीचे टेन्शन, वर्गात प्रवेश केल्यापासून ते प्रश्नपत्रिका हातात येईपर्यंतची आणि प्रश्नपत्रिकेवर नजर टाकून श्वास सोडेपर्यंतची अवस्था अनुभवली आहे. विद्यार्थ्यांचा हा मानसिक ताणतणाव कमी व्हावा आणि त्याने मोकळ्या मनाने, शांत चित्ताने उत्तर पत्रिका लिहावी, या उद्देशाने ‘ओपन बुक एक्झाम’ संकल्पना आली. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना आपली आकलन, चौकस चिकित्सक, विश्लेषणात्मक, तुलनात्मक  बुद्धी वापरून स्वत:च्या  शब्दात मुद्देसूद लिहिणे, अशी अपेक्षा असते.

विद्यार्थी परीक्षेत नोट्स, पाठ्यपुस्तके, परवानगी असल्यास गॅजेटचा वापर करू शकतात, परंतु हे वापरताना, आपली  सर्जनशीलता व कल्पकता वापरून,  दिलेल्या प्रश्नाचे उत्तर अधिक व्यापक (सिन्थेसाइझ) आणि सर्वांगीण (सिनर्जिक) असावयास हवे. या सर्व गोष्टी आत्मसात करण्यास परिपक्वता लागते, ती शालेय वयात कठीण आहे. यामुळे ही परीक्षा जास्त गुण मिळवण्याचा शॉर्ट कट नाही, हे लक्षात येईल. महत्त्वाचे म्हणजे ही पद्धत यशस्वी करण्यासाठी अध्ययन, अध्यापन आणि मूल्यांकनाचा दर्जा तितका उंचीचा असणे अत्यावश्यक आहे. तो आहे का? आपले शैक्षणिक, सामाजिक व मानसिक वातावरण या सर्व  गोष्टींसाठी  पोषक आहे का, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

आक्षेप का घेतले जात आहेत?

सीबीएसईने २०१४  ते २०१७ या कालावधीत  ‘ओपन बुक एक्झाम’ हा उपक्रम राबविला होता. तो बंद का केला, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. गेली दोन वर्षे काही शाळांमध्ये हा उपक्रम ‘प्रयोग’ म्हणून राबविण्यात आला होता. या प्रयोगाची निरीक्षणे, विश्लेषण आणि निष्कर्ष यांचा विचार तज्ज्ञांनी निश्चित केला असणार. तरीही काही तज्ज्ञ आक्षेप घेत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या वेबसाइटनुसार देशभर त्यांच्या २६,७४०हून जास्त शाळा संलग्न आहेत. त्यात लाखो मुले शिकत आहेत.

देशभर कोट्यवधी मुले शालेय शिक्षण घेत आहेत. ओपन बुक परीक्षेला अपेक्षित असलेली आदर्श साधने, सुविधा आणि मुख्य म्हणजे या परीक्षेला अपेक्षित असलेला प्रशिक्षित शिक्षकवर्ग आज देशात उपलब्ध नाही आणि नजीकच्या काळात तो तयार होणे शक्य नाही. ज्याप्रमाणे ‘सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा सोयीस्कर अर्थ, ‘आठवीपर्यंत नापास करावयाचा नाही’,  असा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी काढला होता, तसेच ‘ओपन बुक एक्झाम म्हणजे कॉपी करण्याचा खुला परवाना’ असा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे. दुर्दैवाने असे घडले, तर देशातील संपूर्ण  शिक्षण व्यवस्था कोलमडून पडेल, याचा विचार सीबीएसई, केंद्र व राज्य शासनाने करावा.

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी