शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: तुम्ही ‘भारताचे नागरिक’ आहात का? कशावरून? नागरिकत्व सिद्ध होणार तरी कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 10:54 IST

आधार, पॅन, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड अशी वेगवेगळ्या ओळखपत्रांची चळत तुमच्याकडे असली, तरी तुमचे ‘नागरिकत्व’ सिद्ध करण्यासाठी ते पुरेसे नाहीच!

प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार

मी भारतीय नागरिक आहे का?- हा प्रश्नच मनाला टोचतो ना? स्वातंत्र्य ७८ वर्षांचे झाले. आधुनिक भारताच्या डिजिटल उभारणीत अब्जावधी रुपये खर्चले गेले. परंतु आजही भारतीय नागरिक ओळखपत्रांची चळत हातात घेऊन उभा आहे. भर पावसात विरघळून जाणाऱ्या कागदांसारखी दशा झालीय  त्या ओळखपत्रांची! सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेला इशाराच मुंबई उच्च न्यायालयाने प्रतिध्वनित केला आहे. आधार, पॅन, निवडणूक ओळखपत्र ही कागदपत्रे आजवर आपण आपल्या ओळखीची प्रतीके मानली जात; परंतु ती काही आपल्या नागरिकत्वाचा पुरावा नव्हेत, असे सांगून न्यायालयाने आपल्या भ्रमाचा भोपळा फोडून टाकला आहे. प्रत्येकाकडून घेतलेले बोटांचे ठसे, बुबुळांचे फोटो या नोकरशाहीने गोळा केलेल्या क्षुद्र नोंदी ठरल्या आहेत. ही कागदपत्रे आपल्या भारतीयत्वाची खूण असतील, असे सांगितले गेले होते. एकाएकी ती निरर्थक बनली आहेत. म्हणूनच एक प्रश्न फणा काढून उभा राहतो : ही कागदपत्रेही माझे नागरिकत्व सिद्ध करत नसतील तर मग ते सिद्ध होणार तरी कसे? मुंबई उच्च न्यायालयातील न्या. अमित बोरकर यांनी ताज्या निकालपत्रात म्हटले, ‘केवळ आधार, पॅन किंवा निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे आहेत म्हणून कुणी भारतीय नागरिक ठरत नाही. ही कागदपत्रे केवळ विविध सेवा मिळवण्यासाठी किंवा ओळख पटवण्यासाठी आहेत. नागरिकत्व कायदा १९५५ नुसार ती नागरिकत्व सिद्ध करत नाहीत.’ त्याच दिवशी एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, आधार कार्ड हे नागरिकत्वाचा निर्णायक पुरावा म्हणून स्वीकारता येणार नाही. त्याची स्वतंत्रपणे पडताळणी करावी लागेल.

असे असेल, तर भारतीय नागरिकत्वाचा पुरावा शोधायचा कुठे? निवडणूक आयोगाने भारतीय व्यक्तीस मताधिकार देण्याबाबतची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. फक्त भारतीय नागरिकच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकत असल्याने  नागरिकत्वाच्या नोंदणीची जबाबदारी निवडणूक आयोगाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. मतदार होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाकडे हा आयोग ११ पैकी एका दस्तऐवजाची मागणी करत आहे. जन्मदाखला, मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याचे- अधिवासाचे किंवा विवाहाचे प्रमाणपत्र, आई-वडिलांचा जन्मदाखला आदी कागदपत्रे आता निवडणूक आयोग मागत आहे. परंतु आश्चर्य म्हणजे आधार, पॅन, निवडणूक ओळखपत्र अशा डिजिटल ओळखपत्रांना मात्र नागरिकत्वाचा पर्याप्त  आणि  ठोस पुरावा मानले गेलेले नाही. असे का व्हावे? याबद्दल कोणतेही सुसंबद्ध स्पष्टीकरण दिलेले नाही. केवळ ६.५ टक्के भारतीय नागरिकांकडे पासपोर्ट आहे. केवळ १४.७ टक्के लोकांकडे शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र आहे. जन्मदाखला किती लोकांकडे असेल, याचा अंदाज करणेही कठीण आहे. आधार ही अद्वितीय ओळख प्रणाली तयार करण्यासाठी २०२३ पर्यंत सरकारने १२,००० कोटी एवढी प्रचंड रक्कम खर्च केली आहे. बँक खाती, कर, मालमत्ता व्यवहार, अगदी विमानतळासारख्या संवेदनशील जागी प्रवेश, अशा साऱ्या व्यवहारांसाठी ‘आधार’ नावाचा ‘बायोमेट्रिक चित्रगुप्त’ ही गुरुकिल्ली ठरेल असे सांगण्यात येत होते. तुमच्या बोटांचे ठसे, बुबुळांचे फोटो आणि वैयक्तिक माहिती घेऊन ‘आधार’ क्रमांक तुमचे कुटुंब, तुमचा पत्ता आणि तुमच्या  अस्तित्वाशी तुम्हाला जोडून घेतो. गाडी घेताना, घर भाड्याने घेताना  किंवा कर भरणा करताना आधार क्रमांक देणे सक्तीचे असते. आणि तरीही तुमचे भारतीय असणे सिद्ध करताना त्याला काडीची किंमत नाही. निवडणूक आयोगाच्या मते मतदार यादीत तुमचे नाव नोंदवण्यासाठी ते पुरेसे नाही;  पण मग नागरिक नेमके कुणाला म्हणावे हे आयोग किंवा सरकार स्पष्टपणे का सांगत नाही? एकही कामी येत नसताना आपण आधार, पॅन, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड अशी वेगवेगळी ओळखपत्रे का नाचवत बसलो आहोत?

ही कोंडी कशी फुटेल? नागरिकत्व, मताधिकार आणि ओळख अशा तिन्ही बाबी पूर्ण करणारे नागरिकत्वाचे सार्वत्रिक ओळखपत्र भारतीयांना मिळाले पाहिजे. नागरिकत्वाच्या कायद्याखाली सरकारने  मार्गदर्शक सूत्रे  जारी करून कागदपत्रांची सुलभ पूर्तता शक्य करून नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवायला हवी. ९५ कोटी मतदारांच्या  ओळखीबाबत अनिश्चितता निर्माण करणारा सध्याचा गोंधळ चालणार नाही. नागरिकत्वाची निश्चिती करताना चाचपडणारा भारत हे हास्यास्पद आणि लोकशाहीची मान खाली करणारे चित्र आहे. 

तर मग खरोखरच मी भारतीय नागरिक आहे का? बायोमेट्रिक्स कोरलेले आधार कार्ड, मतदानाने पुनीत झालेले मतदार ओळखपत्र, वेळोवेळी करभरणा करताना वापरलेले पॅन कार्ड हे सारे मी मिरवीत असतो. आणि तरीही माझा जन्म सध्याच्या राष्ट्रीय सीमेपलीकडे पाकिस्तानात झालेला असल्याने आणि माझ्या आई-वडिलांची कागदपत्रे काळाच्या ओघात नष्ट झालेली असल्यामुळे, हवेतून काही पुरावा मिळवून मी तो दाखवू शकत नाही तोवर कोर्टाच्या मते मी एक नामहीन, राष्ट्रहीन शून्य आहे. 

ही माझी एकट्याचीच कर्मकहाणी नाही. हे प्रचंड सामूहिक  दुखणे आहे. जे आपण देऊच शकत नाही, याचे पूर्ण भान राज्यसंस्थेला आहे, नेमके तेच  पुरावे ती आपल्याकडे मागत आहे. सरकारने ही बतावणी मोडीत काढायला हवी. नागरिकत्वाचे एकच एक सर्वस्पर्शी ओळखपत्र बनवायला हवे.

टॅग्स :Indiaभारत