शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

विदर्भात घोडा अडला; पण भाकरी करपली नाही!

By shrimant maney | Updated: December 15, 2021 08:58 IST

वेळीच सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की राजकारणात बाजी पलटवता येते. नागपुरात भाजपची भाकरी करपली नाही, ती त्यामुळेच!

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी होतील, हे कोणी सांगू शकत नाही. परंतु, त्यांच्या तोंडावर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांचा विजय भाजपला दिलासा देणारा आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र आले, तर भाजपला विजय शक्य नाही, हा गेल्या दोन वर्षांतला दावा खोटा ठरला. आधी तो समज पंढरपूरमध्ये खोडून निघाला. आता विदर्भात धक्का बसला. विदर्भात भाजप व काँग्रेस हेच मुख्य पक्ष असल्याने आणि राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकद कमी असल्यानेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा बोलताहेत व शरद पवार यांच्यासह सगळे त्यांना टोमणे मारताहेत. नागपूरच्या निकालामुळे ते टोमणे वाढतील.

नागपूरमध्ये वर्षभरापूर्वी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला होता. उमेदवाराची निवड चुकल्यामुळे तब्बल ५८ वर्षांनंतर भाजपला या मतदारसंघात पराभव पाहावा लागला. संदीप जोशी यांना पराभूत करून काँग्रेसचे अभिजित वंजारी निवडून आले. या पराभवातून, नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या विसंवादातून भाजपने धडा घेतला. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली गेली. ते गडकरींच्या जवळचे. पण, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन फडणवीसांनी त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. विजय सोपा असूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मताधिक्य वाढावे म्हणून नागपुरात येऊन गेले. या सगळ्याचा परिणाम निकालात दिसला. भाजपच्या तिकिटावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ३२५ असताना, बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. जवळपास दुप्पट मतांच्या फरकाने बावनकुळे विजयी झाले. 

भाजपमधून आयात केलेले रवींद्र भोयर यांना मतदानाच्या आदल्या रात्री बाजूला करून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्याचा काँग्रेसचा निर्णय अजूनही अनाकलनीय आहे. तरीदेखील १८६ मते देशमुखांकडे वळविण्यात आलेले यश हेच काँग्रेसला समाधान. पदवीधरप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही चमत्कार घडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न फसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सोबतच डॉ. नितीन राऊत, सुनील केदार यांचे सगळे डावपेच संख्याबळापुढे फसले. रवींद्र भोयर यांच्या ताकदीबद्दल खूपच अपेक्षा काँग्रेसने बाळगल्या होत्या. प्रत्यक्षात ते काँग्रेसकडे गेल्याने भाजपचे लोक खूश होते. त्यामुळेच ते गेले की पाठविले, यावर जोरदार चर्चा झडल्या. खरे तर माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यारूपाने असा चमत्कार घडवू शकणारा उमेदवार काँग्रेसकडे होता. याआधी त्यांनी तो घडविलाही आहे. पण, मुळक मोठे झाले तर आपले काय होईल, हा विचार करून त्यांचे पंख उमेदवारीआधीच कापण्यात आले.

अकोल्यातील शिवसेनेचा पराभव महाविकास आघाडीच्या अधिक जिव्हारी लागणारा आहे. तीन जिल्ह्यांत मिळून संख्याबळात क्रमांक एकचा पक्ष भाजप असला तरी, दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची एकत्रित ताकद त्यापेक्षा अधिक आहे. अठरा वर्षे विधानपरिषदेत राहिलेले गोपीकिशन बाजोरिया यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात होता. बाजोरिया यांची ताकद यावरूनच स्पष्ट व्हावी, की त्यांनी त्यांचे पुत्र विप्लव यांना बाजूच्या मराठवाड्यातल्या हिंगोली-परभणीमधून निवडून आणले. कदाचित त्यामुळेच ते गाफील राहिले. महाविकास आघाडी एकसंध राहिली नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी नावाला का होईना, तटस्थ राहिली. म्हणजे ती मते वसंत खंडेलवाल यांच्याकडे गेली.

थोडक्यात हे निकाल सांगतात की, घोडा अडला, भाकरी करपली, पाने नासली हे राजकारणात एकाचवेळी घडत नाही. सोंगट्या फिरविण्याचे भान राखले की हे टाळता येते. म्हणूनच नागपूरमध्ये भाजपची भाकरी करपली नाही. वऱ्हाडात मात्र अठरा वर्षे चौखूर उधळलेला शिवसेनेचा घोडा अडला.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक