शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सोनियांची विराट सभा व कद्रु माध्यमे

By admin | Updated: April 13, 2016 03:47 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नेते त्यांच्या लक्षावधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नेते त्यांच्या लक्षावधी अनुयायांसह नागपुरात एकत्र आले तेव्हा त्यांच्या विराट सभेची दृश्ये जनतेपर्यंत पोहोचणार नाहीत याची जी काळजी देशातल्या इंग्रजी व हिंदीसकट काही मराठी प्रकाशमाध्यमांनी घेतली ती त्यांची सरकारसमोरची जी-हुजुरी आणि गळचेपी सांगणारी होती. ज्या एक-दोन मराठी वाहिन्यांनी ती दाखविली त्यांनीही ती सगळी व सभेतील उपस्थितीच्या दृश्यांसह जनतेपर्यंत जाणार नाहीत याची व्यवस्था केली. देशात एकपक्षीय राजवट आणि अघोषित आणीबाणी असल्याचे व त्यांनी प्रसिद्धी माध्यमांची मान आपल्या ताब्यातील भांडवलदार मालकांच्या हातून आवळली असल्याचेच चित्र त्यातून जनतेसमोर आले. २०१४ च्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आपल्या सर्व नेत्यांसह प्रथम ठामपणे जनतेसमोर येऊन सत्तेला आव्हान देत असल्याचे व ते देत असताना भारतीय राज्य घटनेने स्वीकारलेल्या व डॉ. आंबेडकरांनी पुरस्कृत केलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व धर्मनिरपेक्षता या मूल्यांसाठी लढायला तो पुन्हा सिद्ध झाला असल्याचे या सभेने देशाला दाखविले. नरेंद्र मोदींचे सरकार शेतकरीविरोधी, स्त्रीविरोधी, विद्यार्थीविरोधी आणि दलित व आदिवासीविरोधी असल्याचा हल्ला या सभेत सोनिया गांधींनी पुरावे देऊन चढविला. संघाने आरक्षण थांबविण्याची भाषा बोलायची आणि भाजपाच्या एखाद्या मंत्र्याने तसा आमचा विचार नाही असे दुसऱ्या दिवशी जाहीर करायचे ही बाब संघ व भाजपा यांचा इरादा आरक्षणाची व्यवस्था थांबविण्याचा आहे असा आरोप त्यांनी केला तेव्हा सभेने त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. देशाची धर्मबहुलता, भाषाबहुलता व सांस्कृतिकबहुलता घालवून त्याला एकारलेले व भगवे स्वरूप देण्याचा संघ परिवाराचा प्रयत्न लोकशाही व उदारमतवादी विचारांना मारणारा तर आहेच, शिवाय तो डॉ. आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध जाणारा आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या. ज्या डॉ. आंबेडकरांच्या विचारांची संघाने त्याच्या जन्मापासून अवहेलना केली त्यांनाच आता आपलेसे करण्याचा व त्यांचे सोहळे माजविण्याचा त्याचा प्रयत्न हे ढोंग असल्याचे सांगून घटनेची मूल्ये व गांधी-आंबेडकर यांचे विचार हीच देशाच्या एकात्मतेची आधारशिला असल्याचेही यावेळी सोनियांनी स्पष्ट केले. राहुल गांधींनी आपल्या भाषणात विद्यार्थी व तरुणांची या सरकारने चालविलेली धार्मिक व जातीय कोंडी उघड करताना हैदराबादच्या रोहित वेमुलाने केली ती आत्महत्त्या नसून ते त्याचे बलिदान होते असे म्हटले. या सभेसाठी महाराष्ट्रासह साऱ्या देशातून काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते एकत्र आले होते. पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, खासदार, आमदार व चाहत्यांसह मोठा वर्ग व्यासपीठावर आणि सभेत हजर होता. शिवाय या सोहळ्याला जोडून आंबेडकरांच्या श्रद्धांजलीची झालेली सभा काँग्रेसच्या नव्या उभारीची व त्या पक्षाने सत्तेला दिलेल्या नव्या आव्हानाची तयारी दाखविणारी होती. स्वाभाविकच कोणत्याही फालतू मंत्र्याची व्याख्याने बळजबरीने लोकाना ऐकविणारी माध्यमे ही सभा देशाला दाखवतील असे साऱ्यांना वाटले होते. मात्र राजकारणाची वाकडी वाटचाल, माध्यमांवर ताबा असणाऱ्यांची सरकारसमोरची लाचारी आणि त्यातल्या अनेकांनी वाहत्या वाऱ्यानुसार घेतलेले भित्रे पवित्रे यामुळे ही सभा देशाला पाहाता आली नाही. माध्यमे ही लोकशाहीतील चौथ्या क्रमांकाची ताकद आहे हे खरेच. पण त्या ताकदीचे बळ तिच्यावरील लोकांवरील विश्वासात दडले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात स्थिरावू पाहणारी दूरचित्रवाणी अशी एकतर्फी व एकपक्षीय भूमिका घेऊन देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या राष्ट्रीय पक्षाला अशी जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करणारी असेल तर हा प्रयत्न त्यांच्याही ताकदीचा अंत ठरेल हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. एक गोष्ट मात्र खरी. काँग्रेस पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी सामान्य काँग्रेसजन तसाच शाबूत व पक्षनिष्ठ असल्याची ग्वाही ह्या सभेने देशाला दिली. सोनिया गांधींचा उत्साह, राहुल गांधींचे आक्रमक नेतृत्व आणि त्या दोघांवर पक्षाची असलेली अविचल निष्ठाही या सभेने अधोरेखित केली. ज्या गोष्टी उघड करायला बाकीचे लोक कचरतात किंवा मोदींवर टीका करताना ज्यांची जीभ अडखळते त्या साऱ्यांना या सभेने लोकशाहीत विरोधी पक्षाला हवे असलेले टीकेचे सामर्थ्य व ती करण्याची प्रेरणा दिली यात शंका नाही. माध्यमांची या सभेने घालविलेली विश्वसनीयता परत मिळवायला त्यांनाही बरेच दिवस लागतील यात शंका नाही. एकटे सरकार प्रसन्न राहून चालत नाही, माध्यमांसोबत लोकही असावे लागतात. त्या दृष्टीने या सभेने माध्यमांची घालविलेली पत मोठी आहे आणि ती परत मिळविण्यासाठी त्यांना सरकार व मालकांचीच नव्हे तर सच्चाईची आणि जनतेची कास धरावी लागणार आहे.