शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सोलापुरी भाजप प्रासंगिक कराराच्या चक्रव्यूहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:12 IST

काँग्रेसच्या गोटात चाललेल्या खा. राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा प. महाराष्टÑातील साखर पट्ट्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यात सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजप मात्र ‘प्रासंगिक करारा’च्या चक्रव्यूहात अडकलेला आहे.

- राजा मानेकाँग्रेसच्या गोटात चाललेल्या खा. राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा प. महाराष्टÑातील साखर पट्ट्याच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होणार आहे. त्यात सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजप मात्र ‘प्रासंगिक करारा’च्या चक्रव्यूहात अडकलेला आहे.महाराष्टÑाच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याला नेहमीच मोठे महत्त्व राहिलेले आहे. राष्टÑीय राजकारणातील अनेक घडामोडीत नेहमीच अग्रस्थानी राहणाऱ्या शरद पवारांचा हा लाडका जिल्हा! म्हणूनच त्यांनी याच जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून २००९ साली लोकसभेत प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री खा. विजयसिंह मोहिते-पाटील ही वजनदार मंडळी याच जिल्ह्यातील. २०१४ साली देशाला नरेंद्र मोदी लाटेने व्यापले तेव्हा त्या लाटेत सुशीलकुमार शिंदेंसारखे नेतेही स्वत:चा पराभव रोखू शकले नाहीत. अशा संदर्भासह २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांची चाहूल लागलेल्या या जिल्ह्याचे राजकीय चित्र आज मात्र मोठे मनोरंजक बनले आहे.२०१४ साली झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीला ग्रामीण जिल्ह्यात विजयसिंह मोहिते-पाटील तसेच त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील विरुद्ध संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील व राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण तुर्कांच्या आक्रमक गटाची झालर होती. शरद पवार व अजित पवार यांच्या निष्ठावंतांतील अंतर्गत राजकारणाचेच ते फळ होते. त्याही वातावरणात सहकारमहर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील यांची पुण्याई व स्वत: विजयसिंहांबद्दल असणारा आपलेपणा या बळावर माळशिरस तालुक्यातील मतदारांनी त्यांना तारले. ते विजयी झाले, पण मतदान दिवसाच्या तोंडावर सोलापुरात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेने सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव मात्र निश्चित झाला होता. पक्ष कुठलाही असो गटबाजीच्या अशाच समीकरणांभोवती फिरण्याची या जिल्ह्याच्या राजकारणाची परंपरा आहे. राज्यात होणाºया राजकीय उलथापालथीतदेखील अशाच प्रकारचे गणित हा जिल्हा कायम राखत आलेला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आळवलेला ‘मोदीमुक्त’ राजकारणाचा नवा सूर आणि शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांनी खा. राहुल गांधी यांना भेटून काँग्रेसच्या गोटात जाण्याची चालविलेली तयारी या घटनांचा मोठा परिणाम पश्चिम महाराष्टÑ आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही होणार आहे.२०१४ च्या निवडणुकीपासून पवार काका-पुतणे निष्ठावंत मानला गेलेला संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोहिते-पाटील विरोधी गट सरळसरळ भाजप आघाडीत जाऊन बसला. स्वत: अपक्ष राहून शिंदे यांनी भाजपच्या मदतीने जिल्हा परिषद अध्यक्षपदही मिळविले. भाजप प्रवेशाची छोटी लाटच जिल्ह्यात आली होती. या लाटेचा आधार मात्र ‘प्रासंगिक करार’ एवढाच मर्यादित होता, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. राज्यमंत्री असलेले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री असलेले सुभाष देशमुख यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य सदैव कायम राहिले आहे. त्याच कारणाने प्रत्येक तालुक्यातील अनेक नेते भाजपामध्ये गेले, पण त्यांची निष्ठा मात्र पारंपरिक गटबाजीवरच! त्यामुळे तालुका-तालुक्यातील या राजकीय प्रासंगिक करारांच्या चक्रव्यूहात भाजप सापडला आहे. तो भेदण्याची क्षमताही कुणामध्ये दिसत नाही. तो चक्रव्यूह सोलापूर, माढा आणि उस्मानाबादसारख्या तीन-तीन लोकसभा मतदारसंघाने व्यापलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या निवडणुकांवर परिणाम करणार आहे. त्या परिणामाची चिंता मात्र भाजपच्या कुठल्याही नेत्याला दिसत नाही अथवा त्याची त्यांना फिकीर नाही, असेच म्हणावे लागेल. 

टॅग्स :BJPभाजपाSolapurसोलापूर