शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

...म्हणून भिन्न विचारसरणी असलेल्या तिन्ही पक्षांचं सरकार टिकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 5:06 AM

कोणत्याही सरकारच्या केवळ १00 दिवसांतील कामगिरीचे मूल्यमापन करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरू शकते.

आपण एकत्र आलो तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असे शरद पवार यांनी शिवसेना व काँग्रेसला पटवून दिले. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या सरकारने १00 दिवस पूर्ण केले आहेत. आतापर्यंत या सरकारची वाटचाल आश्वासक असून, जनतेचीही त्यांना साथ मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारने आज १00 दिवस पूर्ण केले. कोणत्याही सरकारच्या केवळ १00 दिवसांतील कामगिरीचे मूल्यमापन करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरू शकते. त्यात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार तर तीन पक्षांचे आहे. उद्धव ठाकरे यांना सरकार वा प्रशासन चालविण्याचा अजिबातच अनुभव नसताना त्यांची आतापर्यंतची कार्यपद्धती वाखाणण्यासारखीच आहे. परस्परविरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले हे सरकार १00 दिवसांत कुठे गोंधळलेले दिसले नाही. बरेचसे निर्णय सरकारने एकमताने घेतले. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा निर्णय सर्वांत आधी घेऊन, त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने शेतकरी वर्गात त्यांच्याविषयी समाधान दिसून आले. खरेतर, अनेक मुद्द्यांवर शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. राम मंदिराचा विषय असो, मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा असो किंवा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा असो, यांमध्ये दोन्ही काँग्रेसची भूमिका शिवसेनेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. कोरेगाव भीमा दंगल आणि एल्गार परिषद यांवरूनही सत्ताधारी आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याचे दिसले. अशा अनेक कारणांमुळे ठाकरे सरकार टिकणार नाही आणि ते कोसळेल, असे भाजपचे नेते सातत्याने सांगत आहेत. एवढेच नव्हेतर, शिवसेना आणि आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकतो, असेही भाजप नेत्यांनी अनेकदा बोलून दाखविले. शिवसेना गेली ३५ वर्षे भाजपचा मित्र असल्याने उद्धव ठाकरे यांनी घेतलेली वेगळी भूमिका भाजपला आवडलेली नाही.

शिवाय उद्धव ठाकरे यांच्या अनपेक्षित भूमिकेमुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास निसटला, हे दु:खही भाजपला आहे. म्हणूनच भाजप अतिशय आक्रमक होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारची वाट अतिशय बिकट आहे, असे वाटत असताना त्यांनी १00 दिवस सहज पूर्ण केले. अर्थात याचे श्रेयही उद्धव ठाकरे यांनाच द्यायला हवे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एनआरसी, सीएए, राम मंदिर, मुस्लीम आरक्षण या विषयांवर आपली बाजू सातत्याने मांडत असताना उद्धव ठाकरे यांनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकले. पण त्यावरून महाविकास आघाडी व सरकार यांच्यात वाद मात्र होऊ दिला नाही; आणि मुख्यमंत्री म्हणून वेगळे निर्णयही घेऊन दाखविले. दोन्ही काँग्रेसचे नेते विविध प्रश्नांवर पक्षाची भूमिका मांडत असताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री शांत राहिले. उद्धव ठाकरे यांच्याखेरीज इतरांनी बोलायचे नाही, असेच शिवसेनेने ठरविले असावे. सरकार स्थापन होईपर्यंत सतत प्रसिद्धीत असणारे खा. संजय राऊत यांनीही नंतर कायमच गप्प राहण्याचे पसंत केले. वैचारिक मतभेद आणि भाजपला बाजूला ठेवून सरकार चालविण्याबाबत एकमत झाल्याने या १00 दिवसांत सरकारपुढे अडचणी आल्या नाहीत. या काळात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न तिन्ही पक्षांनी केले नाहीत, हेही एक वैशिष्ट्य. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या शब्दाबाहेर न जाण्याचा निर्णय घेतला असल्यानेच हे घडू शकले. साहजिकच हे सरकार स्थापन होण्यापासून आतापर्यंत टिकण्याचे श्रेय शरद पवार यांनादेखील द्यायला हवे.
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने पवार यांचे ऐकल्यामुळे आणखी एका राज्यात तो पक्ष सत्तेत आला आहे, याची जाणीव त्या पक्षाच्या मंत्र्यांनाही आहे. त्यामुळे हे सरकार चालेल, असे लोकांनाही वाटू लागले आहे. भविष्यात तिन्ही पक्षांनी समजुतीने घेतले, तर ते सुसह्य ठरेल. आता १00 दिवस पूर्ण होत असताना उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, आपण व शिवसेनेनेही राम मंदिराचा अजेंडा सोडलेला नाही आणि तिथे मंदिर उभारणे ही एकट्या भाजपची मक्तेदारी नाही, हे ठणकावून सांगणार आहेत. त्यांचे अयोध्येला जाणे सत्तेतील दोन्ही मित्रपक्षांना आवडणार नाही. पण सरकारच्या स्थैर्याला त्यामुळे धोका नाही, हेही ते जाणून आहेत. सत्तेत राहायचे असेल तर शिवसेनेला दुखावून चालणार नाही, हे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना माहीत आहे आणि भाजपविरोधात लढण्यासाठी त्यांना सत्ता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी