शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

ग्रहण काळात शुक्लकाष्ट

By सचिन जवळकोटे | Published: July 26, 2018 6:10 AM

ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक.

‘उद्या काय हाय रं बंड्याऽऽ’ पारावर बसल्या-बसल्या कानात काडी फिरवत गुंड्यानं विचारलं. ‘उद्या का नाऽऽय पोरनिमा हाय पोरनिमा.. खाटखूटवाली आषाढी पोरनिमा,’ बंड्यानंही डोक खाजवत उत्तर दिलं. तसा गण्या खेकसला, ‘खाटखूटवाली गटारी अमावश्या असतीयाऽऽ’‘मग काय हाय रं उद्या?’ महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण, या गहन प्रश्नासारखंच कोडं बंड्याला पडलं.‘उद्या गिºहान हाय गिºहानऽऽ लई सावध ºहायचं असतंया उद्या,’ गुंड्यानं नवी माहिती पुरविताच पारावरच्या चर्चेला लागले ग्रहणाचे वेध. या ग्रहणकाळात राजकीय नेते नेमकं काय करणार, याचाही शोध घेण्यासाठी बनले सारेच उत्सुक. सर्वप्रथम ही सारी मंडळी ‘कृष्णकुंज’वर गेली, तेव्हा खर्ज्या आवाजात अन् फर्ड्या भाषेत ‘राज’ सांगू लागले, ‘मी माझ्या तमाम मनसैनिकांना सांगितलंय की मुंबईच्या खड्ड्यातल्या पाण्यात ग्रहण बघा अन् माझ्या फेसबुक वॉलवर टाका.’.. नंतर भेटले रौतांचे संजय. ते ‘उद्धों’शी मोबाईलवरून बोलत होते, ‘आपण असं करू या का साहेब... इतकी वर्षे देवेंद्रांच्या चंद्राला आपण खंडग्रास ग्रहणाइतका त्रास दिला. आता सावज दमलं असेल तर आपण थेट खग्रासच बनू या,’ हे ऐकून मंडळी दचकली. ‘सत्तेचा सूर्य’ देऊनही ‘मातोश्री’कार केवळ ‘ग्रहणाऽऽ ग्रहणी’मध्येच अडकलेत, हे ध्यानात येताच मंडळींनी चंद्रकांतदादांना गाठलं. मात्र, ‘सार्वजनिक बांधकाम’च्या कृपेनं चौका-चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांची पाठ दुखू लागल्याचा निरोप यल्लपानं देताच मंडळी पुढे सरकली.आता गाठ पडली जळगावच्या नाथाभाऊंशी. ग्रहणाविषयी विचारताच त्यांनी रागारागानं खडसावलं, ‘इथं मलाच ग्रहण लागून राहिलेऽऽ तिथं तुम्ही मला काय नवीन विचारून राहिले?’ हिरमुसल्या चेहऱ्यानं मंडळी सदाभाऊंना भेटली. ते पांढºया दुधातले काळे बोके हुडकत बसलेले. त्यांना विचारताच दाढी खाजवत त्यांनी दोन-तीन कृषी अधिकाºयांना धडाऽऽ धड फोन केले, ‘दिवाळी खुशीसारखी ग्रहणाची काही स्पेशल गिफ्ट-बिफ्ट असते की नाही?’ अशी विचारणा करताच तिकडचे आवाजच बंद झाले.मग मंडळी अशोकराव नांदेडकरांना भेटली. ते मात्र, भलतेच खुशीत दिसले. ‘आता आमचं ग्रहण सुटायची वेळ झालीय,’ असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगून त्यांनी ‘राहुल बाबां की जादू की झप्पी’ हा व्हिडीओ बघण्यास सुरुवात केली. विरोधकांना ‘झप्पी’ देण्यापेक्षा सहकाºयांना ‘प्रेमाची मिठी’ मारली तर अडथळे दूर होतील, हे या ‘हात’वाल्यांना कधी कळणार, असं एकमेकांना विचारत मंडळी बारामतीला पोहोचली.तिथं ‘मीडियासोबत आक्रमक संवाद कसा साधावा?’ हे पुस्तक वाचण्यात सुप्रियाताई दंग होत्या तर ‘मीडियासमोर कसं तोलून-मापून बोलावं?’ याचे धडे चिरंजीवांना देण्यात अजितदादा रमले होते. थोरल्यां काकांना मंडळी भेटली, तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘ग्रहणकाळात कमळाची पूजा करावी, मात्र देवेंद्राचं दर्शन घेऊ नये, अशी इच्छा असली तरी मी पडलो ‘पुरोगामी’ विचारसरणीचा. विरोधकांची ‘जात’ बघून राजकीय भूमिकेचा ‘धर्म’ ठरविणारा. त्यामुळे ग्रहणकाळात विरोधकांमागे नसती शुक्लकाष्ट लावण्याचा नवा प्रयोग करावा म्हणतोय.’ 

 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणSadabhau Khotसदाभाउ खोत chandrakant patilचंद्रकांत पाटील