शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

शनिशिंगणापूर ते हाजी अली

By admin | Updated: February 2, 2016 03:15 IST

शनिशिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी हिंदू स्त्रियांनी आंदोलन सुरू केले असतानाच मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश द्या अशी मागणी करीत मुसलमान समाजाच्या स्त्रियाही पुढे आल्या

शनिशिंगणापूरच्या मंदिरात प्रवेश मिळविण्यासाठी हिंदू स्त्रियांनी आंदोलन सुरू केले असतानाच मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश द्या अशी मागणी करीत मुसलमान समाजाच्या स्त्रियाही पुढे आल्या आहेत. एका चांगल्या व पुरोगामी पावलासाठी ही राष्ट्रीय पथावर सुरू झालेली स्वागतार्ह वाटचाल आहे. ती तत्काळ यशस्वी होईल याची चिन्हे अर्थातच कमी आहेत. कोणतेही पुरोगामी पाऊल सहजासहजी पुढे पडणार नाही अशी सनातनी मानसिकता हिंदूंएवढीच अन्य धर्मीयातही आहे. या धर्मांचे मुखंड आपल्या जुन्या व सनातन परंपरांना घट्ट चिकटून असणारे आणि त्या परंपरांसमोर येणारे प्रत्येकच पुरोगामी आव्हान प्राणपणाने थोपवून धरणारे आहेत. अतिशय साधे, शैक्षणिक व सामाजिक अधिकार आपल्या समाजातील स्त्रियांना मिळावे यासाठी हमीद दलवाई यांनी आयुष्यभर दिलेला लढा येथे साऱ्यांना आठवावा. मुळात सारेच धर्म परंपरानिष्ठ व जुन्या रूढींनी बांधलेले असतात. नवऱ्यामागून स्त्रीने सती जाण्याची परंपरा हिंदू धर्मात होती. ती संपविण्यासाठी राजा राममोहन राय यांना केवढे कष्ट घ्यावे लागले याची कहाणी मुळातून वाचण्यासारखी आहे. वपनासारख्या क्रूर रूढी मोडायला महाराष्ट्राला किती वर्षे लागली आणि अल्पवयीन मुलींची लग्ने करू नये यासाठी किती सुधारकांना लढे द्यावे लागले याचा इतिहासही साऱ्यांना ठाऊक आहे. दलिताना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून गांधी, आंबेडकर आणि साने गुरुजी यांनी अपार कष्ट घेतले. आताचे शनिशिंगणापूरचे आव्हानही तसेच आहे. मंदिर प्रवेश हा आजच्या काही टीकाकारांना वाटतो तसा सांकेतिक प्रकार नाही. स्त्रियांच्या अधिकारांशी संबंध असणारा तो सैद्धांतिक व प्रगतिशील विचार आहे. शनी मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या हिंदूंमधील सनातनपासून किती संघटना उभ्या झाल्या आहेत आणि त्यांनी नाशिकसारख्या शहरात मेळावे भरविण्याचे राजकारण कसे उभे केले आहे ते पाहिले की एका क्षणात सोडविता येणारे सामाजिक प्रश्नही प्रसंगी केवढे बिकट होतात याची कल्पना येते. शनी मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या स्त्रियांबाबत द्वारकापीठाच्या शंकराचार्याने काढलेला एक फतवाही येथे नोंदविण्याजोगा आहे. ‘या स्त्रियांना प्रवेश देण्याऐवजी शिंगणापूरच्या शनीलाच तेथून पळवून द्या’ असा उपदेश त्यांनी आपल्या अनुयायांना केला आहे. अलीकडच्या शंकराचार्यांनी त्यांच्या मूळ श्रीमद् आद्यशंकराचार्यांची कीर्ती व प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचेच काम आताशा चालविले आहे. नेमके तेच काम हाजी अली दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करणारे मुस्लिम धर्मगुरू करीत आहेत. राष्ट्र ही धर्माहून श्रेष्ठ कल्पना आहे आणि माणुसकी हाच जगातला सर्वात मोठा धर्म आहे. त्या दिशेने होणारी वाटचाल रोखणारेच खरे धर्मविरोधी व समाजविरोधी आहेत हे अशावेळी लक्षात घेतले पाहिजे. विद्यापीठात पीएच.डी.चे शिक्षण घेणारे विद्यार्थी आत्महत्त्या करतात आणि त्यांना तसे करायला भाग पाडणारेही तेथेच असतात. साध्या वैचारिक मतभेदाचे व संशयाचे पर्यवसान खुनात होते आणि विचार मागे पाडला जातो ही उदाहरणे आपण अलीकडे अनुभवत आहोतच. या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूरच्या मंदिरातील प्रवेशाचे हिंदू स्त्रियांचे व हाजी अलीच्या दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणून पुढे झालेल्या मुस्लिम स्त्रियांचे सगळ्या उदारमतवादी व पुरोगामी भारतीयांनी स्वागतच केले पाहिजे. सनातनी माणसे फार हटवादी असतात. त्यांना कोणतेही नवे पाऊल चांगले दिसत नाही. ते पुढे आले तर त्यात बेड्या अडकविण्याचाच प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो. शनी मंदिरात स्त्रियांनी प्रवेश केल्याने शनी देवाचे पावित्र्य अडचणीत येत नाही कारण चांगल्या व पुढे पडणाऱ्या पावलात बेड्या अडकविणारा देव वा अल्ला नसतो. त्याच्या नावाने आपली पुरोहितशाही वा मौलवीपण मिरविणारेच तसली कामे करीत असतात. एक बाब मात्र येथे महत्त्वाची आणि विशेषत्वाने नोंदविण्याजोगी आहे. आपल्या धार्मिक वा सामाजिक अधिकारांसाठी मुस्लिम स्त्रियांनी आंदोलनाचे पाऊल उचलणे ही गोष्ट भारतात तरी प्रथमच घडत आहे. भारतातील स्त्रियांच्या सबलीकरणाच्या व हक्कांच्या प्रस्थापनेसाठी लढणाऱ्या संघटना प्रामुख्याने हिंदू समाजातच आहे. हमीद दलवार्इंनी मुस्लिम स्त्रियांसाठी उभारलेल्या अशा आंदोलनांना अतिशय अल्पसा प्रतिसाद मिळाला. उलट त्यांच्या विरोधातच धर्मगुरुंनी मोठाले मोर्चे संघटित केलेले देशाने पाहिले. हमीद भार्इंना मुस्लिम कब्रस्तानात जागा मिळू न देण्याएवढे हे प्रतिगामी आंदोलन मोठे आणि दुष्ट होते. हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याहून मुस्लिम समाजात बदल घडविणे जास्त अवघड व जिकिरीचे काम आहे. मात्र पुरोगामी चळवळींना विरोध करणाऱ्या सर्वच धर्मातील सनातन्यांनी एक गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे. त्यांचे विजय नेहमीच अल्पजीवी असतात. याउलट पुरोगामी आंदोलनाचे पहिलेच पाऊल महत्त्वाचे असते. पुढची पावले मग आपोआपच पडत राहतात.