शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

नाती ठिसूळ झाली!

By किरण अग्रवाल | Updated: November 29, 2018 09:03 IST

माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत.

-किरण अग्रवाल

माणसांमध्ये ‘मी’तले अडकलेपण अलीकडच्या काळात वाढल्याची तक्रार असून, ती खरीही आहे. हल्ली प्रत्येकजण ‘मी’ व ‘माझ्या’पुरता पाहू लागला आहे. इतरांशी काही देणे-घेणे न ठेवता या असल्या आपापल्या कुटुंबात रममाण होण्यातून खरे तर नाती दृढ व्हायला हवीत. पण या नात्यांनाच नख लावणाऱ्या व प्रसंगी काळिमा फासणा-या घटना समोर येतात तेव्हा त्या नात्यांमधली वाढती ठिसूळता विषण्ण करून गेल्याशिवाय राहात नाही. नात्यांची वीण उसवण्यामागील कारणांचा शोध घेतला जाणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे, कारण असले प्रकार हे केवळ संबंधित कुटुंबातलेच नाही तर समाजव्यवस्थेतील किडकेपण अधोरेखित करून देत असतात.आजची तरुणपिढी मोबाइलवरील सोशल नेटवर्किंगमध्ये अशी वा इतकी काही गुंतली आहे की, त्यांना शेजार-पाजारचे भानच उरलेले नाही, अशी ओरड अलीकडे वाढली आहे. या गुंतलेपणातून स्वकेंद्रितपणा आकारास येत असून, प्रत्येकजण आपल्यापुरता मर्यादित अगर ज्याला संकुचित म्हणता यावे, असा होत आहे. ही अवस्था खरे तर मनुष्याला मनुष्यापासून, समाजापासून दूर नेणारी आहे. पण त्यातही कुटुंबातले, नात्यांमधले का होईना संबंध या आपल्यापुरते पाहण्यातून दृढ होण्याची अपेक्षा केली जाते. चला, माणूस इतरांपासून दुरावला; परंतु स्वकीयांसोबत तरी जोडला गेला ना, म्हणून त्याकडे पाहिले जाते. मात्र हल्ली हे आपल्यातले नात्यांचे बंध तरी कुठे संवेदनक्षम उरले आहेत? आपलेच आपल्याचा जीव घ्यायला उतावीळ झाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. कधी संपत्तीच्या वाटे-हिस्स्यातून ते घडून येताना दिसते, तर कधी परस्परांमधील ईर्षेतून अगर व्यावसायिक स्पर्धेतून घडून येते. शिवाय जन्मदात्या माता-पित्यांना वृद्धावस्थेत अनाथाश्रमाच्या पाय-यांवर सोडून येणारे दिवटे जिथे निपजतात, तिथे अन्य नात्यांचा आब राखला जाण्याची अपेक्षा तरी कशी करायची? नात्यांची वीण उसवत चालल्याचे चित्र यातून प्रकर्षाने दिसून येणारे आहे.महत्त्वाचे म्हणजे, पै-पैशातून होणा-या भानगडी किंवा कोर्ट-कज्जे तर सुरू असतातच; पण नात्यांना कलंक लावणारे अमानवीय व अनैतिक प्रकारही अलीकडे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. समाजाचा किंवा वडीलधा-यांचा धाक उरला नाही म्हणून असो, की बदलत्या जीवनशैलीमुळे जागलेल्या अतृप्त विषय वासनांमुळे; विचार वा बुद्धी गहाण टाकून भलतेच काही करून बसणारे लोक नात्यांमधील नाजूक नजाकतीचा व भावबंधाचाच पार चेंदामेंदा करून टाकत असतात. पित्याकडूनच मुलीवर केले जाणारे अत्याचार हे असेच नात्याला बट्टा लावणारे. अधून-मधून अशा दुर्दैवी घटना समोर येतात तेव्हा सुजाणांच्या मेंदूला झिणझिण्या आल्याखेरीज राहात नाही. याच मालिकेत मोडणारे, म्हणजे सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची एक तक्रार नाशकातील उपनगर पोलीस ठाण्यात, तर एका माता-पित्यानेच आपल्या मुलीला मसाज पार्लरमध्ये कामास पाठवून वेश्या व्यवसायात ढकलल्याची तक्रार खुद्द या अभागी मुलीनेच पुण्यात दिल्याचे प्रकार समोर आले होते.नैतिकतेच्या अध:पतनाचा प्रत्यय घडवणारा असाच एक प्रकार अलीकडेच ठाणे जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्यात नोंदविला गेला तो म्हणजे, नात्याने चुलत बंधू असलेल्यासोबतच पळून जाऊन एका विवाहितेने संसार थाटला व या अनैतिक संबंधात आडकाठी ठरणा-या आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीला तापत्या सळईने चटके दिले. ‘मम्मी व मामा’ने दिलेले चटके या अजाण बालिकेच्या मनावर जो आघात करून गेले आहेत, त्याचे व्रण भरून निघणे कसे शक्य आहे? नात्यांच्या मर्यादा, सन्मानाला खुंटीवर टांगून प्रसवणारी ही अनैतिकता, अघोरीपण ‘नरेची केला किती हीन...’ याचा प्रत्यय आणून देणारे आहे. कशातून व कशामुळे घडून येते हे सारे, हा खरेच अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. पापपुण्याच्या कल्पनेवर विश्वास असो अगर नसो; पण पापाच्या घडे भरणीलाही ही लोकं घाबरणार नसतील तर समाजानेच अशा सडक्या मानसिकतेला लगाम घालण्याच्या दृष्टीने पाऊले उचलायला हवीत.

टॅग्स :Rapeबलात्कारrelationshipरिलेशनशिप