शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तब्बल सात शेतक-यांनी पत्करला आत्महत्येचा मार्ग, बळीराजासाठी ठरली काळी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:02 AM

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा उत्सव! यावर्षी मात्र या उत्सवाच्या धामधुमीतच, विदर्भात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे कुटुंबीयांना दिवाळीसारखा सणही साजरा करता येत नसल्याच्या वैफल्यापोटी त्यांनी शेवटी मृत्यू जवळ केला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील वरुड बिहाडे गावातील दोन, यवतमाळ जिल्ह्यातील वाठोडा गावातील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कृषी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये घालण्यात आलेला घोळ आणि त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात झालेला विलंब, या सात शेतकºयांच्या मृत्यूसाठी नक्कीच कुठे तरी कारणीभूत ठरला आहे. कधी काळी अवघ्या देशासाठी आदर्श ठरलेल्या महाराष्ट्रास सुमारे दोन दशकांपासून शेतकरी आत्महत्यांचा फास लागला आहे. अवर्षण, अतिवृष्टी, नापिकी, कर्जाचा बोजा, कृषिमालास योग्य दर न मिळणे, गाठीशी पैसा नसल्याने औषधोपचार न घेता येणे, आदी कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन आजवर हजारो शेतकºयांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. त्यांची संख्या एव्हाना दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. या काळात राज्याने दोन्ही प्रमुख राजकीय विचारधारांची सरकारे अनुभवली. विरोधात असताना शेतकरी हिताच्या गप्पा मारणाºयांना सत्तेची ऊब मिळाली, की त्यांना शेतकºयांचा विसर पडतो आणि सत्तेतून पायउतार झालेल्यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे येतात! शेतकºयांच्या स्थितीत मात्र काहीही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी अमरावती येथे कृषी मालास दीडपट भाव देण्याची मागणी केली. तसे झाल्यास कुणीही कर्जमाफी मागणार नाही, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेमके हेच आश्वासन दिले होते. दुर्दैवाने ना पवारांनी त्यांच्या कारकिर्दीत दीडपट भावाची मागणी पूर्ण केली, ना मोदींनी सत्तेत आल्यावर आश्वासनाची पूर्तता केली! कृषी मालास योग्य भाव मिळाला, तर शेतकरी ना आत्महत्या करेल, ना कर्जमाफी मागेल! हे तर शाळकरी पोरांनाही कळते. त्यासाठी मोदी व पवारांसारख्या धुरंधरांची गरजच काय? त्यांच्याकडून अपेक्षा असते, ती अपेक्षापूर्तीची! जेव्हा पद असते तेव्हा काही करायचे नाही आणि पद नसताना मागण्या करायच्या किंवा आश्वासने द्यायची, ही राजकारण्यांची सवयच शेतकºयांच्या मुळावर उठली आहे. त्यांची ही सवय मोडेल तो शेतकºयांसाठी सुदिन असेल!

टॅग्स :Farmerशेतकरी