शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

देवा तू तरी सांग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:56 AM

देव देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनात भाव असला तरी पावतो. मनी नाही भाव तरी देवा मला पाव, असा अट्टाहास करणा-यांना देव कधीच पावत नसतो !

देव देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा मनात भाव असला तरी पावतो. मनी नाही भाव तरी देवा मला पाव, असा अट्टाहास करणा-यांना देव कधीच पावत नसतो ! मुळात विज्ञानयुगात ‘देव’ यावर चर्चा न केलेलीच बरी. मात्र देशात स्मार्ट सिटीच्या कामात नंबर वन असलेल्या नागपुरात अनधिकृत धार्मिक अतिक्रमणामुळे महापालिका आयुक्त आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींना त्यांचे देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे ! महापालिका आणि सुधार प्रन्यास या दोन्ही यंत्रणा अनधिकृत धार्मिक अतिक्रमणे हटविण्यात अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संस्थांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांना न्यायासनापुढे उभे केले. अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात या संस्थांना तंबी देत कारवाईचा अ‍ॅक्शन प्लॅन सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार महापालिका क्षेत्रात २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची १५२१ अनधिकृत धार्मिकस्थळे होती. सर्वेक्षणानंतर त्यापैकी १८ धार्मिक स्थळांना ‘अ’ गटात तर, १५०३ धार्मिकस्थळांना ‘ब’ गटात टाकण्यात आले. ‘अ’ गटातील धार्मिक स्थळे नियमित केली जाणार आहेत. आतापर्यंत ‘ब’ गटातील केवळ ५४ धार्मिकस्थळे तोडण्यात आली आहेत. १ मे १९६० पूर्वी बांधण्यात आलेली ‘ब’ गटामधील अनधिकृत धार्मिक स्थळे तोडण्यासाठी राज्यस्तरीय समितीची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे ‘ब’ गटामधील ११५ धार्मिकस्थळे पाडण्याची परवानगी मिळण्यासाठी २१ एप्रिल २०१८ रोजी राज्यस्तरीय समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. २९ सप्टेंबर २००९ नंतरची ५५ अनधिकृत धार्मिकस्थळे असून त्यापैकी ५१ धार्मिकस्थळे आतापर्यंत तोडण्यात आली आहेत. सुधार प्रन्यासच्या हद्दीत २७५ अनधिकृत धार्मिकस्थळे आहे. मुळात समाजसुधारकांची थोर परंपरा असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात धार्मिकस्थळांच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर न्यायालयाला वेळ वाया घालवावा लागतो, ही निश्चितच चिंतनाची बाब आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी अनधिकृत धार्मिकस्थळे आणि त्यांच्या अतिक्रमणासंदर्भात राज्य सरकारला ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरी प्रशासकीय यंत्रणा राजकीय आणि धार्मिक दबावापोटी यासंदर्भात कारवाई करताना हात आखडता घेताना दिसून येतात. मुळात शहरांचा विकास करायचा असल्यास अतिक्रमणे हटविणे आवश्यकच आहे. मग ते कोणतेही असो. आजच्या ‘समाज’सुधारकांना मात्र पुरोगामी विचारसरणीचा विसर पडलेला दिसतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नव्या युगाचा मंत्र देताना ‘साधन अब बदलाना होगा. घर घर यही गाना होगा. एक जमाना था, जपतप का, यज्ञयागतिरथका अब तो श्रम देकर ग्रामोंको, ठीक बनाना होगा.’ हे कधीच सांगितले आहे. तरीही आम्ही धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणाच्या मुद्यावर थांबलो आहे. त्यामुळे न्यायदेवतेवर ‘देवा आता तू तरी सांग’ यांना हे म्हणण्याची निश्चितच वेळ आली आहे.