शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

भूजल वाचवा, भूमी वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:36 IST

आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते.

आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते. त्यामुळेच भूजल संवर्धनाचा मुद्दा हा गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहेच. हीच बाब लक्षात घेऊन जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयांतर्गत येणाºया केंद्रीय भूमी जल मंडळातर्फे देशातील तिसºया ‘भूजल मंथन’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. केवळ शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील भूजलाची पातळी खालावते आहे. काही वर्षांअगोदर जेथे काही फुटांवर पाणी लागायचे, तेथे आता अनेक मीटर खोल खणावे लागत आहे. आपल्या देशात खरे पाहिले तर पाण्याची कमतरता नाही. परंतु पावसाळ्यात पडणारे पाणी वाचविण्याची किंवा पाणी जमिनीत जिरवण्याची यंत्रणाच आपल्याकडे कार्यरत नव्हती. नदी, नाल्यांमधील बहुतांश पाणी समुद्रात वाहून जाते ही बाब भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी दुर्दैवीच म्हणावी लागेल. परंतु मागील काही काळापासून भूजल संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर कृषीक्षेत्र सिंचनाखाली आलेच. शिवाय त्या त्या परिसरांमध्ये भूजल पातळीदेखील वाढण्यास मदत झाली आहे. आपल्या देशाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाण्याचे संवर्धन करणे ही फारशी कठीण बाब नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि समाजाच्या सहभागाची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर भूजलाची पातळी वाढविण्याची जबाबदारी ही एकट्या सरकारची नाहीच. जोपर्यंत जनमानसातून सहभाग वाढत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणे हे निव्वळ अशक्यच आहे. आजच्या घडीला अनेक सामाजिक संस्था भूजल व्यवस्थापन व नियोजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या प्रयत्नांमधून काही गावांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पाणी केवळ जीवन नाही तर जीवनमान उंचाविण्याचेदेखील साधन आहे. अनेक अविकसित गावांत भूजलाचा योग्य उपयोग केल्यामुळे तेथील लोकांचा विकास झाल्याची उदाहरणे आपल्याच राज्यात आहेत. प्रशासन, जनता, संशोधक, तज्ज्ञ, उद्योगक्षेत्र यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच भूजल संवर्धनासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणीदेखील झाली पाहिजे. असे झाले तर ‘भूजल मंथन’ उपक्रमातून जलामृत निघाले असे म्हणता येईल.

टॅग्स :Waterपाणी