शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

भूजल वाचवा, भूमी वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:36 IST

आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते.

आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते. त्यामुळेच भूजल संवर्धनाचा मुद्दा हा गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहेच. हीच बाब लक्षात घेऊन जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयांतर्गत येणाºया केंद्रीय भूमी जल मंडळातर्फे देशातील तिसºया ‘भूजल मंथन’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. केवळ शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील भूजलाची पातळी खालावते आहे. काही वर्षांअगोदर जेथे काही फुटांवर पाणी लागायचे, तेथे आता अनेक मीटर खोल खणावे लागत आहे. आपल्या देशात खरे पाहिले तर पाण्याची कमतरता नाही. परंतु पावसाळ्यात पडणारे पाणी वाचविण्याची किंवा पाणी जमिनीत जिरवण्याची यंत्रणाच आपल्याकडे कार्यरत नव्हती. नदी, नाल्यांमधील बहुतांश पाणी समुद्रात वाहून जाते ही बाब भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी दुर्दैवीच म्हणावी लागेल. परंतु मागील काही काळापासून भूजल संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर कृषीक्षेत्र सिंचनाखाली आलेच. शिवाय त्या त्या परिसरांमध्ये भूजल पातळीदेखील वाढण्यास मदत झाली आहे. आपल्या देशाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाण्याचे संवर्धन करणे ही फारशी कठीण बाब नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि समाजाच्या सहभागाची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर भूजलाची पातळी वाढविण्याची जबाबदारी ही एकट्या सरकारची नाहीच. जोपर्यंत जनमानसातून सहभाग वाढत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणे हे निव्वळ अशक्यच आहे. आजच्या घडीला अनेक सामाजिक संस्था भूजल व्यवस्थापन व नियोजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या प्रयत्नांमधून काही गावांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पाणी केवळ जीवन नाही तर जीवनमान उंचाविण्याचेदेखील साधन आहे. अनेक अविकसित गावांत भूजलाचा योग्य उपयोग केल्यामुळे तेथील लोकांचा विकास झाल्याची उदाहरणे आपल्याच राज्यात आहेत. प्रशासन, जनता, संशोधक, तज्ज्ञ, उद्योगक्षेत्र यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच भूजल संवर्धनासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणीदेखील झाली पाहिजे. असे झाले तर ‘भूजल मंथन’ उपक्रमातून जलामृत निघाले असे म्हणता येईल.

टॅग्स :Waterपाणी