शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

भूजल वाचवा, भूमी वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:36 IST

आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते.

आजच्या तारखेत देशातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करताना दिसून येत आहे. भूजलाची सातत्याने खालावणारी पातळी ही भविष्यातील धोक्यांचे पूर्वसंकेतच देत आहे. जेथे पाणी नसते तेथील भूमीला सोडून स्थलांतरणाचे प्रमाण वाढते. त्यामुळेच भूजल संवर्धनाचा मुद्दा हा गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहेच. हीच बाब लक्षात घेऊन जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयांतर्गत येणाºया केंद्रीय भूमी जल मंडळातर्फे देशातील तिसºया ‘भूजल मंथन’चे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. केवळ शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील भूजलाची पातळी खालावते आहे. काही वर्षांअगोदर जेथे काही फुटांवर पाणी लागायचे, तेथे आता अनेक मीटर खोल खणावे लागत आहे. आपल्या देशात खरे पाहिले तर पाण्याची कमतरता नाही. परंतु पावसाळ्यात पडणारे पाणी वाचविण्याची किंवा पाणी जमिनीत जिरवण्याची यंत्रणाच आपल्याकडे कार्यरत नव्हती. नदी, नाल्यांमधील बहुतांश पाणी समुद्रात वाहून जाते ही बाब भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशासाठी दुर्दैवीच म्हणावी लागेल. परंतु मागील काही काळापासून भूजल संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर कृषीक्षेत्र सिंचनाखाली आलेच. शिवाय त्या त्या परिसरांमध्ये भूजल पातळीदेखील वाढण्यास मदत झाली आहे. आपल्या देशाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता पाण्याचे संवर्धन करणे ही फारशी कठीण बाब नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि समाजाच्या सहभागाची आवश्यकता आहे. तसे पाहिले तर भूजलाची पातळी वाढविण्याची जबाबदारी ही एकट्या सरकारची नाहीच. जोपर्यंत जनमानसातून सहभाग वाढत नाही, तोपर्यंत उद्दिष्टपूर्ती होणे हे निव्वळ अशक्यच आहे. आजच्या घडीला अनेक सामाजिक संस्था भूजल व्यवस्थापन व नियोजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या प्रयत्नांमधून काही गावांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पाणी केवळ जीवन नाही तर जीवनमान उंचाविण्याचेदेखील साधन आहे. अनेक अविकसित गावांत भूजलाचा योग्य उपयोग केल्यामुळे तेथील लोकांचा विकास झाल्याची उदाहरणे आपल्याच राज्यात आहेत. प्रशासन, जनता, संशोधक, तज्ज्ञ, उद्योगक्षेत्र यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच भूजल संवर्धनासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणीदेखील झाली पाहिजे. असे झाले तर ‘भूजल मंथन’ उपक्रमातून जलामृत निघाले असे म्हणता येईल.

टॅग्स :Waterपाणी