शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्या शौर्याला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 00:25 IST

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे नाव कालपर्यंत सर्वांना अपरिचित होते, पण आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रातल्या नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला.

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे नाव कालपर्यंत सर्वांना अपरिचित होते, पण आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रातल्या नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आले.मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना या गावचे मूळ रहिवासी होते. त्यांचे वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले तर आई नोकरीवर आहे. पवनीतील वैनगंगा शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते आधी नागपूर आणि नंतर पुण्याला गेले. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांनी चांगल्या पगाराची, सर्व सुखसोई देणारी, सतत समाधानी ठेवणारी नोकरी करावी अशी सर्वांची इच्छा होती. सामाजिक परंपरा लक्षात घेता त्यांनी असा विचार करणे चुकीचेही नव्हते. कारण, उच्च शिक्षण घेणारे असंख्य तरुण असेच करीत असतात. परंतु, मोहरकर यांच्या मनात देशसेवेची ऊर्मी होती. त्यामुळे ते सर्वांच्या अपेक्षांविरोधात जाऊन भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. त्यानंतर पदोन्नती होऊन मेजर पदावर पोहोचले. ते गेल्या आठ वर्षांपासून देशाची सेवा करीत होते. केवळ तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अशा परिस्थितीत त्यांचे शहीद होणे मनाला चटका लावून गेले. त्यांचे पार्थिव काल विमानाने नागपूर येथे आणण्यात आले असता अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन मानवंदना दिली. त्यात राजकीय नेते, शासकीय अधिकारी आदींसह मोहरकर यांच्या पत्नी अबोली यांचाही समावेश होता. त्यांचा हा धीरोदत्तपणा खरंच फार मोठा आणि वीरपत्नीला शोभणारा आहे. प्रफुल्ल मोहरकर हे नाव आता येणाºया पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. मोहरकर यांनी देशाची सेवा करताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जीवाची आहुती दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे. अनेकदा शहीद जवानांना शासकीय इतमामात निरोप दिला जातो. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना विविध मदत मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. मंत्रालयात याबाबत स्वतंत्र विभाग असला तरी, ते कर्तव्यात कसूर करीत असल्याचे बरेचदा आढळून आले आहे. मोहरकर यांच्या बाबतीत असा प्रकार घडू नये. शासनाने या वीर कुटुंबाची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून येणाºया पिढीला देशाकरिता लढताना कुटुंबाचा विचार करावा लागणार नाही. आपल्यानंतर आपले कुटुंब सुरक्षित आहे ही भावना त्यांना शत्रूंचा बीमोड करण्याची ताकद देईल. मोहरकर हे शत्रूंशी लढताना केवळ देशाच्या सुरक्षेचा विचार करीत होते. अशा वीरपुत्रांमुळेच हा देश स्वत:ला सुरक्षित मानतो. त्यांच्या शौर्याला सलाम!