शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
5
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
6
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
7
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
8
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
9
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
10
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
11
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
12
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
13
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
14
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
15
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
16
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
17
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
18
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
19
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
20
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांच्या शौर्याला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 00:25 IST

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे नाव कालपर्यंत सर्वांना अपरिचित होते, पण आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रातल्या नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला.

मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर हे नाव कालपर्यंत सर्वांना अपरिचित होते, पण आज त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रातल्या नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचा भंग करून भारतीय लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्यांना चोख प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आले.मोहरकर हे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोना या गावचे मूळ रहिवासी होते. त्यांचे वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले तर आई नोकरीवर आहे. पवनीतील वैनगंगा शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते आधी नागपूर आणि नंतर पुण्याला गेले. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांनी चांगल्या पगाराची, सर्व सुखसोई देणारी, सतत समाधानी ठेवणारी नोकरी करावी अशी सर्वांची इच्छा होती. सामाजिक परंपरा लक्षात घेता त्यांनी असा विचार करणे चुकीचेही नव्हते. कारण, उच्च शिक्षण घेणारे असंख्य तरुण असेच करीत असतात. परंतु, मोहरकर यांच्या मनात देशसेवेची ऊर्मी होती. त्यामुळे ते सर्वांच्या अपेक्षांविरोधात जाऊन भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. त्यानंतर पदोन्नती होऊन मेजर पदावर पोहोचले. ते गेल्या आठ वर्षांपासून देशाची सेवा करीत होते. केवळ तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. अशा परिस्थितीत त्यांचे शहीद होणे मनाला चटका लावून गेले. त्यांचे पार्थिव काल विमानाने नागपूर येथे आणण्यात आले असता अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन मानवंदना दिली. त्यात राजकीय नेते, शासकीय अधिकारी आदींसह मोहरकर यांच्या पत्नी अबोली यांचाही समावेश होता. त्यांचा हा धीरोदत्तपणा खरंच फार मोठा आणि वीरपत्नीला शोभणारा आहे. प्रफुल्ल मोहरकर हे नाव आता येणाºया पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. मोहरकर यांनी देशाची सेवा करताना आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जीवाची आहुती दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी सर्वांवर आली आहे. अनेकदा शहीद जवानांना शासकीय इतमामात निरोप दिला जातो. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना विविध मदत मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. मंत्रालयात याबाबत स्वतंत्र विभाग असला तरी, ते कर्तव्यात कसूर करीत असल्याचे बरेचदा आढळून आले आहे. मोहरकर यांच्या बाबतीत असा प्रकार घडू नये. शासनाने या वीर कुटुंबाची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून येणाºया पिढीला देशाकरिता लढताना कुटुंबाचा विचार करावा लागणार नाही. आपल्यानंतर आपले कुटुंब सुरक्षित आहे ही भावना त्यांना शत्रूंचा बीमोड करण्याची ताकद देईल. मोहरकर हे शत्रूंशी लढताना केवळ देशाच्या सुरक्षेचा विचार करीत होते. अशा वीरपुत्रांमुळेच हा देश स्वत:ला सुरक्षित मानतो. त्यांच्या शौर्याला सलाम!