शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

साईशताब्दी शिर्डीपुरती मर्यादित नको

By सुधीर लंके | Updated: October 12, 2017 00:51 IST

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो.

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. शिर्डीच्या महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात मुंबईत बैठक घेऊन तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या बैठकीला केवळ नगर जिल्ह्यातील तेही शिर्डीच्या आसपासच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जो आराखडा ठरला त्याचीही अंमलबजावणी सुरू नाही.वास्तविकत: शिर्डीत देशभर व जगभरातून भाविक येतात. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा, नाशिक, औरंगाबाद ही शहरे जोडता येणे शक्य होते. शिर्डीला येणारे बहुतांश भाविक हे औरंगाबाद, नाशिकवरूनच शिर्डीत येतात. मुंबईहून साईभक्तांच्या ज्या पदयात्रा येतात त्या नाशिकमधूनच पुढे मार्गस्थ होतात. हैद्राबादचे भाविकही औरंगाबादमार्गे येतात. त्यामुळे साईशताब्दीचा विचार करताना याही शहरांना सोबत व विचारात घेऊन पर्यटन विकासाचे पदर रुंदावता येणे शक्य आहे. तो विचार प्रशासकीय पातळीवर अजूनतरी झालेला दिसत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्याचे नियोजन करताना नाशिकसोबतच आसपासची तीर्थस्थळे व पर्यटन केंद्रांचा विचार होतो. शिर्डी विकसित करतानाही हा दृष्टिकोन समोर ठेवायला हवा. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, नगर शहराबाबत साईशताब्दीच्या आराखड्यात काहीच उल्लेख नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत आग्रही दिसत नाहीत. उत्तर महाराष्टÑात नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार हे जिल्हे आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उत्तर महाराष्टÑ पातळीवर एकत्रित बैठक घेता येणे शक्य आहे. परंतु हे जिल्हे केवळ कागदावर प्रशासकीयदृष्ट्या एकत्र आहेत. विकासासाठी जो आंतरिक संवाद व्हायला हवा तोच नाही. शिर्डीतून विमानांची उड्डाणे सुरू झाली. शिर्डीच नव्हे उत्तर महाराष्टÑात प्रत्यक्षात कार्यरत झालेले हे पहिले विमानतळ आहे. कारण, नाशिक व जळगावला विमानतळ आहे. मात्र तेथून उड्डाणेच होत नाहीत. शिर्डीतून मुंबई, हैद्राबाद ही सेवा सुरू झाली आहे. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणेही होणार आहेत. या विमानतळाचा फायदा नाशिककरांनाही होऊ शकतो. शिर्डीत कार्गो हब झाले तर नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ती उपलब्धी ठरेल. पूर्वी खासदारकीच्या निमित्ताने नगर व नाशिक जिल्ह्यातील तालुके एकत्र होते. अजूनही उत्तर महाराष्टÑाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ एकच आहे. पण, मतदानाच्या पलीकडे हे आदानप्रदान जाणार आहे का? यावर या प्रदेशातील सुविधांचा फायदा एकमेकांना कसा होईल हे ठरेल. तूर्तास तरी संवाद म्हणावा तसा दिसत नाही. साईशताब्दीच्या निमित्ताने तसा प्रयत्न करता येऊ शकेल. सार्इंची पालखी शिर्डीपुरती नको. जयंत ससाणे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असताना नाशिक, नगर, औरंगाबाद हा पर्यटनाचा ‘त्रिकोण’ तयार करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यास मूर्त स्वरूप मिळाले नाही. मुंबईही अकोले, भंडारदरामार्गे शिर्डीशी जोडणे शक्य आहे.sudhir.lanke@lokmat.com