शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

साईशताब्दी शिर्डीपुरती मर्यादित नको

By सुधीर लंके | Updated: October 12, 2017 00:51 IST

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो.

शिर्डीच्या साईशताब्दी महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने शिर्डीतून विमानसेवाही सुरू झाली आहे. मात्र, हा महोत्सव केवळ शिर्डीपुरता मर्यादित करावयाचा आहे काय? हा प्रश्न उपस्थित होतो. शिर्डीच्या महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात मुंबईत बैठक घेऊन तीन हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या बैठकीला केवळ नगर जिल्ह्यातील तेही शिर्डीच्या आसपासच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत जो आराखडा ठरला त्याचीही अंमलबजावणी सुरू नाही.वास्तविकत: शिर्डीत देशभर व जगभरातून भाविक येतात. यानिमित्ताने अहमदनगर जिल्हा, नाशिक, औरंगाबाद ही शहरे जोडता येणे शक्य होते. शिर्डीला येणारे बहुतांश भाविक हे औरंगाबाद, नाशिकवरूनच शिर्डीत येतात. मुंबईहून साईभक्तांच्या ज्या पदयात्रा येतात त्या नाशिकमधूनच पुढे मार्गस्थ होतात. हैद्राबादचे भाविकही औरंगाबादमार्गे येतात. त्यामुळे साईशताब्दीचा विचार करताना याही शहरांना सोबत व विचारात घेऊन पर्यटन विकासाचे पदर रुंदावता येणे शक्य आहे. तो विचार प्रशासकीय पातळीवर अजूनतरी झालेला दिसत नाही. नाशिकच्या कुंभमेळ्याचे नियोजन करताना नाशिकसोबतच आसपासची तीर्थस्थळे व पर्यटन केंद्रांचा विचार होतो. शिर्डी विकसित करतानाही हा दृष्टिकोन समोर ठेवायला हवा. नगर हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. मात्र, नगर शहराबाबत साईशताब्दीच्या आराखड्यात काहीच उल्लेख नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याबाबत आग्रही दिसत नाहीत. उत्तर महाराष्टÑात नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार हे जिल्हे आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उत्तर महाराष्टÑ पातळीवर एकत्रित बैठक घेता येणे शक्य आहे. परंतु हे जिल्हे केवळ कागदावर प्रशासकीयदृष्ट्या एकत्र आहेत. विकासासाठी जो आंतरिक संवाद व्हायला हवा तोच नाही. शिर्डीतून विमानांची उड्डाणे सुरू झाली. शिर्डीच नव्हे उत्तर महाराष्टÑात प्रत्यक्षात कार्यरत झालेले हे पहिले विमानतळ आहे. कारण, नाशिक व जळगावला विमानतळ आहे. मात्र तेथून उड्डाणेच होत नाहीत. शिर्डीतून मुंबई, हैद्राबाद ही सेवा सुरू झाली आहे. भविष्यात आंतरराष्टÑीय उड्डाणेही होणार आहेत. या विमानतळाचा फायदा नाशिककरांनाही होऊ शकतो. शिर्डीत कार्गो हब झाले तर नगर, नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ती उपलब्धी ठरेल. पूर्वी खासदारकीच्या निमित्ताने नगर व नाशिक जिल्ह्यातील तालुके एकत्र होते. अजूनही उत्तर महाराष्टÑाचा पदवीधर व शिक्षक मतदारसंघ एकच आहे. पण, मतदानाच्या पलीकडे हे आदानप्रदान जाणार आहे का? यावर या प्रदेशातील सुविधांचा फायदा एकमेकांना कसा होईल हे ठरेल. तूर्तास तरी संवाद म्हणावा तसा दिसत नाही. साईशताब्दीच्या निमित्ताने तसा प्रयत्न करता येऊ शकेल. सार्इंची पालखी शिर्डीपुरती नको. जयंत ससाणे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष असताना नाशिक, नगर, औरंगाबाद हा पर्यटनाचा ‘त्रिकोण’ तयार करण्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्याबाबत बैठकाही झाल्या होत्या. मात्र, त्यास मूर्त स्वरूप मिळाले नाही. मुंबईही अकोले, भंडारदरामार्गे शिर्डीशी जोडणे शक्य आहे.sudhir.lanke@lokmat.com